शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

-तर विदर्भात येताच कशाला ? : यंदाचे हिवाळी अधिवेशन केवळ सहाच दिवस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 20:19 IST

महाविकासआघाडीच्या शासनकाळातील पहिले अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. याचा कालावधी सहा दिवसाचाच राहण्याची दाट शक्यता आहे.

ठळक मुद्देहा तर केवळ औपचारिकतेचा ‘फार्स’ विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळणार कसा ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील सहा दशकांपासून उपेक्षित असलेल्या विदर्भाला कधीतरी ‘अच्छे दिन’ येतील व ‘मायबाप सरकार’ येथील जनता व शेतकऱ्यांना न्याय देईल, अशी अपेक्षा दर हिवाळी अधिवेशनात व्यक्त होते. परंतु दरवेळी वैदर्भीयांच्या पदरी निराशाच येते. नागपूर कराराला हरताळ फासत अधिवेशनाचा कालावधी दोन किंवा जास्तीत जास्त तीन आठवडे इतकाच राहतो. त्यामुळे यात विधायक बाबींवर चर्चेसाठी पुरेसा वेळच मिळत नाही. महाविकासआघाडीच्या शासनकाळातील पहिले अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. याचा कालावधी सहा दिवसाचाच राहण्याची दाट शक्यता आहे. अवघ्या सहा दिवसात सभागृहाचे कामकाज होणार तरी किती आणि विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळणार तरी किती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ सहा दिवसासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन जर जनतेच्या पदरी काहीच आश्वासक पडत नसेल तर मग विदर्भात येताच कशाला, केवळ सहलीसाठीच का, असा प्रश्न वैदर्भीयांनी उपस्थित केला आहे. अधिवेशनातील औपचारिकतेचा ‘फार्स’ असेच याला म्हणावे का, असा सवालही केला जात आहे.१९५३ साली विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात सामील करुन घेण्यासाठी २८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारानुसार उपराजधानीत वर्षातून एक अधिवेशन घेणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे हे अधिवेशन महिनाभराचे तरी असले पाहिजे. मात्र सुरुवातीच्या काळापासून सर्वच शासनकर्त्यांनी हिवाळी अधिवेशनाला फारसे गंभीरतेने घेतलेच नाही. गुलाबी थंडीत दोन आठवड्यांची ‘पिकनिक’ अन् हुरडा पार्टी असेच स्वरुप याला आले. दरवर्षी हिवाळ्यात नागपुरात अख्खे मंत्रालय येते. सचिवालयाचे कामकाज सुरू होण्यापासून ते अगदी ‘व्हीव्हीआयपी’ नेत्यांच्या येण्यापर्यंत नागपुरात अधिवेशनाची धूम असते. परंतु मागील काही वर्षांत एकदाही अधिवेशनाचे कामकाज २० दिवसाहून अधिक काळ झाले नाही. त्यातही विविध मुद्यांवरुन होणाऱ्या गोंधळात दोन्ही सभागृहांचे कामकाज अनेकदा तहकूब होते. अशा स्थितीत मूळ मुद्यांवर चर्चाच होत नाही.हिंमत असेल तर करा नागपूर कराराचे पालननागपूर करारानुसार अधिवेशन हे सहा आठवड्यांचे व्हावे असे ठरले होते. पहिले हिवाळी अधिवेशन तर १० नोव्हेंबर ते १६ डिसेंबर १९६० इतक्या काळासाठी चालले होते. नंतर त्याचा कालावधी कमी होत गेला. दुसरा आठवडा संपून तिसऱ्या आठवड्यात कामकाज व्हावे, अशी ना सत्ताधारी ना विरोधकांची इच्छा असते. हिवाळी अधिवेशन म्हणजे वैदर्भीयांचा पाहुणचार अशी विशेषणे वापरली जातात. परंतु पाहुणचारासाठी सहा दिवसांचा कालावधी पुरेसा पडत नाही. मग कामकाजाला हा वेळ कसा काय पर्याप्त राहणार आहे. त्यामुळेच हिंमत असेल तर नव्या सरकारने नागपूर कराराचे पालन करून एक नवा पायंडा पाडला पाहिजे.नागपुरात आजवर झालेली अधिवेशने व कामकाजाचे दिवस१९६० (२७ दिवस), १९६१ (२५ दिवस ), १९६४ (२३ दिवस )१९६५ ( १५ दिवस ), १९६६ (२४ दिवस), १९६७ (१७ दिवस) , १९६८ (२८ दिवस) , १९६९ (२४ दिवस), १९७० ( १८ दिवस), १९७१ (२६ दिवस), १९७२ (२० दिवस) , १९७३ (२५ दिवस), १९७४ (२५ दिवस), १९७५ (१७ दिवस), १९७६ (१५ दिवस), १९७७ (१४ दिवस), १९७८ (१४ दिवस), १९८० (९ दिवस) १९८१ (१५ दिवस), १९८२ (१० दिवस), १९८३ (१५ दिवस), १९८४ (६ दिवस), १९८६ (१५ दिवस), १९८७ (१५ दिवस), १९८८ (१५ दिवस), १९८९ (५ दिवस) , १९९० (१४ दिवस) , १९९१ (१४ दिवस), १९९२ (६ दिवस), १९९३ (१४ दिवस), १९९४ (८ दिवस), १९९५ (१४ दिवस), १९९६ (१० दिवस), १९९७ (८ दिवस), १९९८ (१२ दिवस), १९९९ (१० दिवस), २००० (१५ दिवस), २००१ (१० दिवस), २००२ (८ दिवस), २००३ ( १० दिवस), २००४ (११ दिवस), २००५ (१० दिवस), २००६ ( १० दिवस), २००७ ( ११ दिवस), २००८ (१२ दिवस),२००९ (१० दिवस), २०१० (१२ दिवस), २०११ (११ दिवस), २०१२ (१० दिवस), २०१३ (१० दिवस), २०१४ (१३ दिवस), २०१५ (१३ दिवस), २०१६ (१० दिवस), २०१७ (१० दिवस), २०१८ (एकमेव पावसाळी अधिवेशन -१३ दिवस)सचिवालय सोमवारपासून नागपुरातहिवाळी अधिवेशनला येत्या १६ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. मुंबई विधिमंडळातील कर्मचारी व आवश्यक कागदपत्र नागपुरात पोहोचले आहेत. शुक्रवारी जवळपास ५०० कर्मचारी दाखल झाले. उद्या व परवा अधिकारीही दाखल होतील. येत्या सोमवारपासून विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरु होईल.हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरु आहे. सोमवारपासून विधिमंडळ सचिवालयातील सुरक्षारक्षक विधानभवनाचा ताबा घेतील. सचिवालयाच्या कामकाजाला सुरूवात होईल. विधानसभा अध्यक्षांकडून हिवाळी अधिवेशनाची घोषणा झाल्यापासून येथील स्थानिक प्रशासनाच्या कामालाही गती आली आहे. शुक्रवारी विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी तयारी व सुरक्षेचा आढावाही घेतला. सोमवारी ९ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर व उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडून विधिमंडळ अधिवेशनाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहेत.शुक्रवारी दुपारच्या सुमारास मुंबईहून विधिमंडळ सचिवालयातील बहुतांश कर्मचारी नागपुरात पोहोचले. त्यांच्यासह महत्त्वाची विविध कागदपत्रे, फायलीही ट्रकच्या माध्यमातून पोहचले असून, विधिमंडळात फाईली, कागदपत्रे लावणे सुरू करण्यात आली आहे. शनिवार व रविवार या दोन दिवसात संपूर्ण कामे आटोपली जातील आणि सोमवारपासून सचिवालयाच्या कामाला सुरुवात होईल.विधिमंडळातील अधिकारी उद्या घेणार आढावाहिवाळी अधिवेशनाच्या तयारी संदर्भातील आढावा घेण्यासाठी मुंबई विधिमंडळातील अधिकारी हे येत्या रविवारी, ८ तारखेला नागपुरात येणार असल्याची माहिती आहे. नागपुरातील अधिकारी हे मुंबईतील विधिमंडळ सचिवालयतील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळेच ७ तारखेपर्यंत सर्व कामे आटोपण्यासाठी सर्व कामाला लागले आहेत.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर