शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

महाराष्ट्रात सत्तेत असताना भाजपने भोंगे का हटविले नाहीत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 18:23 IST

Nagpur News काही दिवसांपासून महाराष्ट्रात भोंग्यावरून राजकारण तापले असताना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

ठळक मुद्दे भाजपशासित राज्यांमधील भोंगे अगोदर हटवावे

 

नागपूर : काही दिवसांपासून महाराष्ट्रात भोंग्यावरून राजकारण तापले असताना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात भोंगे हे आजपासून नाही तर अनेक वर्षांपासून आहेत. महाराष्ट्रात तर भाजपची सत्ता असतानादेखील भोंगे होतेच. भाजपशासित राज्यांतील भोंग्यांबाबत मौन बाळगून महाराष्ट्रात आंदोलनाची भाषा सुरू आहे. सत्तेत असताना भाजपने भोंगे का हटविले नाहीत, असा सवाल त्यांनी केला. मंगळवारी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की, रात्री १० वाजेनंतर सकाळी सूर्योदयापर्यंत भोंगा वाजवू शकत नाही. या आदेशांचे पालन सर्व राज्य शासनांनी करणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

सरसंघचालकांनी पीओकेमध्ये शाखा लावावी

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले की, १५ वर्षांत अखंड भारत होईल. या वक्तव्याचे स्वागत व समर्थन करतो. सत्तेत नसताना आश्वासन दिले जाते, सत्तेत असताना करून दाखवावे लागते. सत्ता स्वयंसेवकांकडे आहे, तर त्वरित पावले उचलली गेली पाहिजे. ७ वर्षांत काश्मीरमधील हिंदूंना परत आणता आले नाही. आता एका महिन्यात त्यांना परत आणावे, तसेच सरसंघचालकांनी स्वत: एक रात्र तरी काश्मीरमधील हिंदूंसोबत राहावे, तसेच सरकारने पीओकेवर ताबा मिळवावा व सरसंघचालकांनी तेथे जाऊन शाखा लावावी, असा चिमटा डॉ. तोगडिया यांनी काढला.

रिक्त पदे त्वरित भरा

केंद्र व राज्य शासनात एक कोटी पदे रिक्त आहेत. ही पदे त्वरित भरण्यात यावी. जर असे झाले नाही तर बेरोजगारांना एकत्रित करून मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. तोगडिया यांनी दिला. ज्यांनी ई-श्रम कार्ड तयार केले आहेत, त्यांच्या बँक खात्यात केंद्र शासनाने दरवर्षाला सहा हजार रुपये टाकावे, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :praveen togadiaप्रवीण तोगडिया