शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

महाराष्ट्रात सत्तेत असताना भाजपने भोंगे का हटविले नाहीत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 18:23 IST

Nagpur News काही दिवसांपासून महाराष्ट्रात भोंग्यावरून राजकारण तापले असताना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

ठळक मुद्दे भाजपशासित राज्यांमधील भोंगे अगोदर हटवावे

 

नागपूर : काही दिवसांपासून महाराष्ट्रात भोंग्यावरून राजकारण तापले असताना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात भोंगे हे आजपासून नाही तर अनेक वर्षांपासून आहेत. महाराष्ट्रात तर भाजपची सत्ता असतानादेखील भोंगे होतेच. भाजपशासित राज्यांतील भोंग्यांबाबत मौन बाळगून महाराष्ट्रात आंदोलनाची भाषा सुरू आहे. सत्तेत असताना भाजपने भोंगे का हटविले नाहीत, असा सवाल त्यांनी केला. मंगळवारी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की, रात्री १० वाजेनंतर सकाळी सूर्योदयापर्यंत भोंगा वाजवू शकत नाही. या आदेशांचे पालन सर्व राज्य शासनांनी करणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

सरसंघचालकांनी पीओकेमध्ये शाखा लावावी

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले की, १५ वर्षांत अखंड भारत होईल. या वक्तव्याचे स्वागत व समर्थन करतो. सत्तेत नसताना आश्वासन दिले जाते, सत्तेत असताना करून दाखवावे लागते. सत्ता स्वयंसेवकांकडे आहे, तर त्वरित पावले उचलली गेली पाहिजे. ७ वर्षांत काश्मीरमधील हिंदूंना परत आणता आले नाही. आता एका महिन्यात त्यांना परत आणावे, तसेच सरसंघचालकांनी स्वत: एक रात्र तरी काश्मीरमधील हिंदूंसोबत राहावे, तसेच सरकारने पीओकेवर ताबा मिळवावा व सरसंघचालकांनी तेथे जाऊन शाखा लावावी, असा चिमटा डॉ. तोगडिया यांनी काढला.

रिक्त पदे त्वरित भरा

केंद्र व राज्य शासनात एक कोटी पदे रिक्त आहेत. ही पदे त्वरित भरण्यात यावी. जर असे झाले नाही तर बेरोजगारांना एकत्रित करून मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. तोगडिया यांनी दिला. ज्यांनी ई-श्रम कार्ड तयार केले आहेत, त्यांच्या बँक खात्यात केंद्र शासनाने दरवर्षाला सहा हजार रुपये टाकावे, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :praveen togadiaप्रवीण तोगडिया