शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

राजधानीमध्ये भाषा भवनाऐवजी उपभवन कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 20:29 IST

राजधानीमध्ये मराठी भाषा भवन उभारण्याची चर्चा सुरू असतानाच उपभाषा भवन उभारण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र राजधानीमध्ये भवनाची गरज असताना उपभवनाचा विषय कसा काय पुढे आला, याबद्दल आश्चर्य व्यक्त करणारे पत्र श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

ठळक मुद्देश्रीपाद जोशी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : उपभवनांची गरज विभागीय पातळ्यांवरमराठी वाचवा लोकमत अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजधानीमध्ये मराठी भाषा भवन उभारण्याची चर्चा सुरू असतानाच उपभाषा भवन उभारण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र राजधानीमध्ये भवनाची गरज असताना उपभवनाचा विषय कसा काय पुढे आला, याबद्दल आश्चर्य व्यक्त करणारे पत्र श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.मराठी भाषा भवनाऐवजी भाषा उपभवन ही संकल्पना समोर आली आहे. याबद्दल जोशी यांनी पत्रातून आश्चर्य व्यक्त केले आहे. उभारले जाणारे उपभाषा भवन महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीच्या ठिकाणी उभारले जाण्याचा निर्णय झाल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबईच्या वेशीबाहेर सिडकोच्या नवी मुंबईतील जागेत हे केंद्र उभारण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतल्याची माहिती पुढे आल्याने या बाबत मराठी भाषा प्रेमींमध्ये संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण पसरले आहे. या निर्णयाचे पडसादही उमटले आहेत. त्यामुळे हे केंद्र शहराबाहेर गैरसोईच्या ठिकाणी नेण्याच्या कारणामागील अधिकृत माहिती शासनाने जाहीर करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.श्रीपाद जोशी यांनी यापूर्वीच या संदर्भात संबंधित मंत्री व शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र त्यावर योग्य माहिती मिळण्याऐवजी पत्र आणि निवेदने कार्यवाहीसाठी पाठविली गेल्याचे तांत्रिक उत्तर मिळाल्याने नेमके काय चालले हे कळायला मार्ग नाही. ही बाबही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहे.या भाषा उपकेंद्रांची मागणी कुणी आणि कशा स्वरूपात व केव्हा केली याबद्दलही जोशी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. उपकेंद्रच उभारायचे असल्यास त्यांची गरज राजधानीत नसून ती विभागीय पातळीवर आहे. विभागीय पातळीवर त्यांची स्थापना करून विकेंद्रीत स्वरूपात चालवली जाणार आहेत किंवा स्वरतंत्रपणे याबद्दलही मराठीजनांमध्ये असलेली अनभिज्ञता त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. ना. विनोद तावडे यांनाही या पत्राची प्रत त्यांनी पाठविली आहे.मराठीच्या संवर्धनासाठी मराठी भाषा प्रेमींकडून अभियान सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठी भाषा भवन मुंबईमध्ये उभारले जावे, यासाठी मागील अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. अलीकडेच मुंबईतील आझाद मैदानात धरणेही झाले होते. हा विषय ताजा असतानाच राज्य सरकारने भाषा भवनाऐवजी उपभाषा भवनाचा मुद्दा पुढे आणल्याने मराठीविषयक तज्ज्ञांमध्ये नाराजी आहे.

टॅग्स :marathiमराठीChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस