शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

अवनीला ठार केल्याचा एवढा बाऊ कशाला; विजय वडेट्टीवार यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 15:43 IST

एखादा वाघ १३ लोकांचे बळी घेत असेल, अशा परिस्थितीत त्याला गोळी झाडून ठार के ले असेल तर या गोष्टीचा एवढा बाऊ कशाला असा सवाल काँगे्रसचे विधीमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टेवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देमारण्याची पद्धत चुकीचीपण त्यापेक्षा शेतकऱ्यांचे बळी महत्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :अवनी किंवा टी-१ नावाच्या वाघिणीच्या मृत्यूवरून देशभरात वादंग सुरू आहे. आठवडभरापासून या वाघिणीला मारताना नियमांचा अवलंब योग्य प्रकारे केला गेला नसल्याचे आरोप होत आहेत. मारण्याची पद्धत चुकीचीच होती. परंतु मागील तीन वर्षात वाघांच्या हल्ल्यात २३ लोकांचे बळी गेलेत. एखादा वाघ १३ लोकांचे बळी घेत असेल, त्याला पकडण्यात यश येत नसेल अशा परिस्थितीत त्याला गोळी झाडून ठार के ले असेल तर या गोष्टीचा एवढा बाऊ कशाला असा सवाल काँगे्रसचे विधीमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टेवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, किशोर गजभिये आदी उपस्थित होते.गेल्या काही वर्षात २६ वाघांचे बळी गेले आहेत. कधी आपसातील झुंज, विजेचा धक्का लागून तर कधी कालव्यात पडल्याने ते मरण पावले. पर्यावरण संतुलनासाठी वाघ वाचला पाहिजे. परंतु शेतकऱ्यांचे बळी त्याहून महत्वाचे आहेत. वाघाला ठार केले म्हणून ह्ळहळ व्यक्त करण्याची गरज नाही. जंगललगतच्या ४२ गावातील नागरिक दहशतीत जीवन जगतात. जंगल परिसरातील शेतीचे संरक्षण वन विभागाने केले पाहिजे. वन्य प्रान्यांनी गावाकडे येवू नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सोलर कुंपण उपलब्ध केले पाहिजे. वन्य प्राण्यापासून शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. वाघांना विदर्भातील लोकांनीच पोसायचे का? सिमेंटच्या जंगलातील लोकांना जंगलालगत राहणाऱ्या लोकांच्या समस्या कशा कळतील. एनजीओंना वस्तुस्थिती माहित नाही. आरएसएस आदीवासींना वनवासी म्हणतात. तशातलाच हा प्रकार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.पांढरकवडा भागात दहशत निर्माण करणाऱ्या वाघिणीला काही दिवसापूर्वी वन विभागाच्या पथकाने ठार मारले. या वाघिणीला आधी बेशुद्ध न करता तिला गोळी घालण्यात आली असल्याचा आरोप होत आहे. यावरून राजकीय वातावण तापलेले असतानाच विजय वडेट्टीवार यांनी, आता ही चर्चा खूप झाली, ठार मारण्याचा बाऊ करण्याची गरज नाही अशी भूमिका मांडली.

तुकाराम मुंडे यांना नागपूरला आणाभाजपाचे नेते स्वच्छ कारभाराचा दावा करतात. परंतु नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचार सर्वश्रृत आहे. कराचा बोजा जनतेवर लादला जात आहे. महापालिकेतील भाजपा नेत्यांत अंतर्गत वाद आहेत. शासन निधी वेतनावर खर्च करावा लागत आहे. महापालिकेचा कारभार खरोखरच पारदर्शी व स्वच्छ करायचा असेल तर आयुक्त म्हणून तुकाराम मुुंडे यांना नागपुरात आणा अशी मागणी विजय वडेट्टीवार व अतुल लोंढे यांनी केली.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारTigerवाघ