शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात चारा छावण्या का नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 11:00 IST

मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे जनावरांना जगविण्यासाठी सरकारने चारा छावण्या उघडल्या. विदर्भातसुद्धा अशीच अवस्था यावर्षी बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देतीन तालुके दुष्काळग्रस्त पशुपालकांची चाऱ्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे जनावरांना जगविण्यासाठी सरकारने चारा छावण्या उघडल्या. विदर्भातसुद्धा अशीच अवस्था यावर्षी बघायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात तीन तालुके दुष्काळाच्या यादीत आहेत. तालुक्यात जनावरांना चारा उपलब्ध झालेला नाही. पशुपालक चाऱ्यासाठी भटकंती करीत आहेत. चारा नसल्याने जनावरांना तणस खायला घालत आहेत. काटोल, कळमेश्वर, नरखेड तालुक्यांमध्ये चाऱ्याची भीषण टंचाई आहे. पण पशुसंवर्धन विभाग चाराटंचाई नसल्याचा दावा करीत आहे. पशुपालकांची जनावरं जगविण्यासाठी होत असलेली होरपळ लक्षात घेता जिल्ह्यात चारा छावण्या का नाहीत, असा सवाल पशुपालकांनी केला आहे.काटोल, कळमेश्वर, नरखेड या तालुक्यात भीषण पाणीटंचाई आहे. जमिनीतील पाण्याची पातळी हजार फुटावर गेली आहे. यंदा पशुपालकांकडे चाºयाचे उत्पादन घेणे शक्य झाले नाही. तालुक्यात जनावरांसाठी चाराच उपलब्ध नाही. त्यामुळे जनावरांना तणस खाऊ घालावे लागत आहे. काटोल तालुक्यातील काही पशुपालकांशी चर्चा केली असता पहिल्यांदा अशी भीषण अवस्था निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यावर्षी चारा छावण्यांची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.येनवा येथील पशुपालक नितीन आगरकर म्हणाले की, विहिरींना पाणी नसल्यामुळे एका एकरात तयार केलेला चाºयाचा प्लॉट खराब झाला आहे. त्यामुळे जबलपूर येथून चण्याचे कुटार आणावे लागत आहे. आज दुधाला मिळणारे दर आणि चाऱ्याचा वाढता खर्च परवडणारा राहिलेला नाही. पण दुष्काळात जनावरं जगवायची आहेत. त्यासाठी खटपट सुरू आहे. कोंढाळी येथील पशुपालक पुरुषोत्तम हगवते म्हणाले की, यंदा दुष्काळामुळे गहू पेरला नाही. त्यामुळे गव्हांडा राहिलेला नाही. चारा नसल्याने भंडारा जिल्ह्यातून तणस बोलाविले आहे. पहिल्यांदा ९ हजार रुपये ट्रॉली तणस घेतले, आता १०,५०० रुपये ट्रॉलीने तणस घ्यावे लागत आहे. जनावरांचे पोट भरण्यासाठी तणस खाऊ घालण्याची वेळ आली आहे. डोरली येथील पशुपालक विलास जीवतोडे म्हणाले की, काटोल तालुक्यातील चारखांब, सोनखांब, ढवळापूर, मेंढेपठार अशा बहुतांश गावांमध्ये प्रचंड चाराटंचाई आहे. यावर्षीसारखी टंचाई पहिल्यांदा अनुभवत आहे. ऐपत असलेल्या पशुपालकांनी तणस आणून सोय केली आहे. पण काही पशुपालकांनी जनावरं विक्रीस काढलेली आहेत.पशुसंवर्धन विभागाने दिलेले वैरण निकामी ठरले आहे.पशुसंवर्धन विभागाने वैरणीच्या योजना राबविल्या. पण शेतकऱ्यांपर्यंत उशिरा पोहचल्या. त्यात पाणी नसल्यामुळे वैरण उगवलेच नाही. चाऱ्याची भीषण टंचाई असताना पशुसंवर्धन विभाग कागदावर टंचाईच नसल्याचे दाखवित आहे. पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पं.स. स्तरावर पशुधन अधिकारी असतानाही दुष्काळाचे नियोजन झाले नाही. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात १०० ट्रक तणस जनावरांचे खाद्य म्हणून येत आहे.

टॅग्स :agricultureशेती