शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षांचे वावडे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 22:53 IST

असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमशी गठबंधन करणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षांना विचारात घेतले नाही. एमआयएमशी जुळवून घेणाऱ्या आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षांचे वावडे का आहे, असा टीकात्मक सवाल पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जागेंद्र कवाडे यांनी केला आहे.

ठळक मुद्देजोगेंद्र कवाडे यांचा सवाल

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमशी गठबंधन करणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षांना विचारात घेतले नाही. एमआयएमशी जुळवून घेणाऱ्या आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षांचे वावडे का आहे, असा टीकात्मक सवाल पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जागेंद्र कवाडे यांनी केला आहे.मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत प्रा. कवाडे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी येत्या १७ आॅक्टोबरला आयोजित पीरिपाच्या राष्ट्रीय मेळावा व अधिवेशनाबाबत माहिती दिली. काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी, सपाचे आमदार अबू आझमी आदींना या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिल्याचे प्रा. कवाडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अ‍ॅड. आंबेडकर यांच्या भूमिकेवर टीका केली. देशात जातीय आणि धार्मिक उन्मादाला योजनाबद्ध रीतीने उत्तेजन देणाऱ्या रा.स्व.संघप्रणीत सत्तारूढ भाजपाला नमविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी सेक्युलर मतांना एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र भारिप बहुजन महासंघाने एमआयएमशी युती केल्याने सेक्युलर मतांचे धु्रवीकरण होईल आणि भाजपाला लाभ मिळेल, अशी टीका त्यांनी केली. प्रा. कवाडे यांनी गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांचाही निषेध केला. पंतप्रधानांच्या गृहराज्यात अशाप्रकारे कृत्य लाजिरवाणे असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उत्तर भारतीयांकडून मुंबई बंद पाडण्याच्या संजय निरुपम यांच्या वक्तव्यावरही टीका केली. पत्रपरिषदेत थॉमस कांबळे, अरुण गजभिये, भगवानदास भोजवानी, संदीप मेश्राम, विजय पाटील, बाळूमामा कोसमकर, सारंग लांजेवार, भीमराव राऊत आदी उपस्थित होते.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरJogendra kawadeजोगेंद्र कवाडे