शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

नागपुरातल्या कळमना फळ बाजारातील गर्दीवर कोण नियंत्रण आणणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 20:32 IST

कळमन्यातील कृषी उत्पन्न समितीच्या फळ बाजारात शुक्रवारी किरकोळ विक्रेते आणि नागरिकांनी फळे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. संत्र्याचा लिलावासाठी व्यापारी आणि अडतियांची यार्डमध्ये गर्दी होती. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उठाला.

ठळक मुद्देमुंबई आणि पुणे येथील समितीचे बाजार बंद प्रशासकांनी तातडीने निर्णय घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमन्यातील कृषी उत्पन्न समितीच्या फळ बाजारात शुक्रवारी फळांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यासोबतच शहरातील किरकोळ विक्रेते आणि नागरिकांनी फळे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. संत्र्याचा लिलावासाठी व्यापारी आणि अडतियांची यार्डमध्ये गर्दी होती. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उठाला. शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना कळमन्यातील फळ बाजारातील गर्दीवर कोण नियंत्रण आणणार, हा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.मुंबई येथील कृृषी उत्पन्न समितीचा बाजार गुरुवारपासून आणि पुणे येथील बाजार शुक्रवारपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दोन्ही मोठे बाजार प्रशासन बंद करू शकतात, तर नागपूरचा बाजार का नाही, असा सवाल व्यापारी आणि अडतियांनी केला आहे. या बाजारात गर्दी टाळण्यासाठी मध्यंतरी सहा दिवस फळे बाजार बंद करण्याचा निर्णय कळमना फळे बाजाराच्या अडतिया असोसिएशनने घेतला आणि बाजार बंद केला होता. पण त्यावर राज्य शासनाच्या पणन महासंघाने आक्षेप घेऊन व्यापारी आणि अडतियांना परवाने रद्द करण्याची तंबी दिली होती. त्यानंतर बाजार सुरू करण्यात आला. पण गर्दी ‘जैसे थे’ आहे.असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद डोंगरे लोकमतला म्हणाले, कळमना भाजी बाजारात किरकोळ विक्रेते आणि नागरिकांनी गर्दी पाहता प्रशासनाने निर्णय घेत दरदिवशी १०० गाड्या आणि ५० अडतियांनी व्यवसाय करण्याची परवानगी दिली. उर्वरित उत्पादक शेतकऱ्यांच्या गाड्यांना नागपुरातील विविध बाजारात भाज्या विक्रीची मुभा दिली. त्यानुसारच फळे बाजाराची व्यवस्था असावी. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सचिव राजेश भुसारी यांच्याकडे ही मागणी लावून धरली आहे. पण त्यांनी यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. बाजारात एखादी घटना घडल्यास प्रशासकाचे डोळे उघडणार काय, असा सवाल डोंगरे यांनी केला. शुक्रवारी बाजारात फळांची आवक वाढल्यानंतर कुणीही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळताना दिसले नाहीत. दररोज हीच परिस्थिती उद्भवत आहे. भाज्या उत्पादकांप्रमाणेच फळ उत्पादकांनाही शहरातील बाजारांमध्ये फळे विक्रीची परवानगी द्यावी आणि हा बाजार काही दिवसांसाठी बंद करावा, असे डोंगरे यांनी सुचविले आहे.गर्दीवर आवक घालण्यात आम्ही अपयशी ठरत असल्याचे प्रशासक राजेश भुसारी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले आहे. पण बाजाराचे नियमित सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. मापाडी आणि मजूरांना मास्क देण्यात आल्याचे सांगितले आहे. पण बाजार बंद करण्याच्या प्रश्नावर शुक्रवारी भुसारी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क होऊ शकला नाही. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार