शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नागपुरातल्या कळमना फळ बाजारातील गर्दीवर कोण नियंत्रण आणणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 20:32 IST

कळमन्यातील कृषी उत्पन्न समितीच्या फळ बाजारात शुक्रवारी किरकोळ विक्रेते आणि नागरिकांनी फळे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. संत्र्याचा लिलावासाठी व्यापारी आणि अडतियांची यार्डमध्ये गर्दी होती. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उठाला.

ठळक मुद्देमुंबई आणि पुणे येथील समितीचे बाजार बंद प्रशासकांनी तातडीने निर्णय घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमन्यातील कृषी उत्पन्न समितीच्या फळ बाजारात शुक्रवारी फळांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यासोबतच शहरातील किरकोळ विक्रेते आणि नागरिकांनी फळे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. संत्र्याचा लिलावासाठी व्यापारी आणि अडतियांची यार्डमध्ये गर्दी होती. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उठाला. शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना कळमन्यातील फळ बाजारातील गर्दीवर कोण नियंत्रण आणणार, हा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.मुंबई येथील कृृषी उत्पन्न समितीचा बाजार गुरुवारपासून आणि पुणे येथील बाजार शुक्रवारपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दोन्ही मोठे बाजार प्रशासन बंद करू शकतात, तर नागपूरचा बाजार का नाही, असा सवाल व्यापारी आणि अडतियांनी केला आहे. या बाजारात गर्दी टाळण्यासाठी मध्यंतरी सहा दिवस फळे बाजार बंद करण्याचा निर्णय कळमना फळे बाजाराच्या अडतिया असोसिएशनने घेतला आणि बाजार बंद केला होता. पण त्यावर राज्य शासनाच्या पणन महासंघाने आक्षेप घेऊन व्यापारी आणि अडतियांना परवाने रद्द करण्याची तंबी दिली होती. त्यानंतर बाजार सुरू करण्यात आला. पण गर्दी ‘जैसे थे’ आहे.असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद डोंगरे लोकमतला म्हणाले, कळमना भाजी बाजारात किरकोळ विक्रेते आणि नागरिकांनी गर्दी पाहता प्रशासनाने निर्णय घेत दरदिवशी १०० गाड्या आणि ५० अडतियांनी व्यवसाय करण्याची परवानगी दिली. उर्वरित उत्पादक शेतकऱ्यांच्या गाड्यांना नागपुरातील विविध बाजारात भाज्या विक्रीची मुभा दिली. त्यानुसारच फळे बाजाराची व्यवस्था असावी. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सचिव राजेश भुसारी यांच्याकडे ही मागणी लावून धरली आहे. पण त्यांनी यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. बाजारात एखादी घटना घडल्यास प्रशासकाचे डोळे उघडणार काय, असा सवाल डोंगरे यांनी केला. शुक्रवारी बाजारात फळांची आवक वाढल्यानंतर कुणीही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळताना दिसले नाहीत. दररोज हीच परिस्थिती उद्भवत आहे. भाज्या उत्पादकांप्रमाणेच फळ उत्पादकांनाही शहरातील बाजारांमध्ये फळे विक्रीची परवानगी द्यावी आणि हा बाजार काही दिवसांसाठी बंद करावा, असे डोंगरे यांनी सुचविले आहे.गर्दीवर आवक घालण्यात आम्ही अपयशी ठरत असल्याचे प्रशासक राजेश भुसारी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले आहे. पण बाजाराचे नियमित सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. मापाडी आणि मजूरांना मास्क देण्यात आल्याचे सांगितले आहे. पण बाजार बंद करण्याच्या प्रश्नावर शुक्रवारी भुसारी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क होऊ शकला नाही. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार