शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
2
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
3
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
4
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
5
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
6
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
7
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
8
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
9
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
10
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
11
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
12
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
13
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
14
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
15
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
16
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
17
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
18
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
19
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
20
नैतिकता शिवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण...

नागपुरातल्या कळमना फळ बाजारातील गर्दीवर कोण नियंत्रण आणणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 20:32 IST

कळमन्यातील कृषी उत्पन्न समितीच्या फळ बाजारात शुक्रवारी किरकोळ विक्रेते आणि नागरिकांनी फळे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. संत्र्याचा लिलावासाठी व्यापारी आणि अडतियांची यार्डमध्ये गर्दी होती. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उठाला.

ठळक मुद्देमुंबई आणि पुणे येथील समितीचे बाजार बंद प्रशासकांनी तातडीने निर्णय घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमन्यातील कृषी उत्पन्न समितीच्या फळ बाजारात शुक्रवारी फळांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यासोबतच शहरातील किरकोळ विक्रेते आणि नागरिकांनी फळे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. संत्र्याचा लिलावासाठी व्यापारी आणि अडतियांची यार्डमध्ये गर्दी होती. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उठाला. शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना कळमन्यातील फळ बाजारातील गर्दीवर कोण नियंत्रण आणणार, हा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.मुंबई येथील कृृषी उत्पन्न समितीचा बाजार गुरुवारपासून आणि पुणे येथील बाजार शुक्रवारपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दोन्ही मोठे बाजार प्रशासन बंद करू शकतात, तर नागपूरचा बाजार का नाही, असा सवाल व्यापारी आणि अडतियांनी केला आहे. या बाजारात गर्दी टाळण्यासाठी मध्यंतरी सहा दिवस फळे बाजार बंद करण्याचा निर्णय कळमना फळे बाजाराच्या अडतिया असोसिएशनने घेतला आणि बाजार बंद केला होता. पण त्यावर राज्य शासनाच्या पणन महासंघाने आक्षेप घेऊन व्यापारी आणि अडतियांना परवाने रद्द करण्याची तंबी दिली होती. त्यानंतर बाजार सुरू करण्यात आला. पण गर्दी ‘जैसे थे’ आहे.असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद डोंगरे लोकमतला म्हणाले, कळमना भाजी बाजारात किरकोळ विक्रेते आणि नागरिकांनी गर्दी पाहता प्रशासनाने निर्णय घेत दरदिवशी १०० गाड्या आणि ५० अडतियांनी व्यवसाय करण्याची परवानगी दिली. उर्वरित उत्पादक शेतकऱ्यांच्या गाड्यांना नागपुरातील विविध बाजारात भाज्या विक्रीची मुभा दिली. त्यानुसारच फळे बाजाराची व्यवस्था असावी. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सचिव राजेश भुसारी यांच्याकडे ही मागणी लावून धरली आहे. पण त्यांनी यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. बाजारात एखादी घटना घडल्यास प्रशासकाचे डोळे उघडणार काय, असा सवाल डोंगरे यांनी केला. शुक्रवारी बाजारात फळांची आवक वाढल्यानंतर कुणीही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळताना दिसले नाहीत. दररोज हीच परिस्थिती उद्भवत आहे. भाज्या उत्पादकांप्रमाणेच फळ उत्पादकांनाही शहरातील बाजारांमध्ये फळे विक्रीची परवानगी द्यावी आणि हा बाजार काही दिवसांसाठी बंद करावा, असे डोंगरे यांनी सुचविले आहे.गर्दीवर आवक घालण्यात आम्ही अपयशी ठरत असल्याचे प्रशासक राजेश भुसारी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले आहे. पण बाजाराचे नियमित सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. मापाडी आणि मजूरांना मास्क देण्यात आल्याचे सांगितले आहे. पण बाजार बंद करण्याच्या प्रश्नावर शुक्रवारी भुसारी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क होऊ शकला नाही. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार