शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

‘व्हिल मिस यू प्रफुल्ल बिडवई’

By admin | Updated: June 25, 2015 03:12 IST

आयुष्यात प्रगतीच्या शिखरावर जाऊन प्रचंड पैसे कमविण्याची संधी असतानादेखील काही व्यक्ती मात्र वेगळा मार्ग निवडतात.

नागपूरशी जुळले होते ऋणानुबंध : येथील मातीतून मिळाले निर्भीडतेचे संस्कारनागपूर : आयुष्यात प्रगतीच्या शिखरावर जाऊन प्रचंड पैसे कमविण्याची संधी असतानादेखील काही व्यक्ती मात्र वेगळा मार्ग निवडतात. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो व समाजावर होणारा अन्याय, जनतेची होणारी दिशाभूल यांच्यावर प्रकाश टाकण्यासाठी ते स्वत:ला समर्पित करतात. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल बिडवई हे देखील यातीलच होते. पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठे नाव झाल्यावरदेखील त्यांचे पाय जमिनीशी घट्ट जुळले होते. विदर्भातील मातीतील सुपुत्र असलेल्या बिडवई यांचे उपराजधानीशी वेगळेच ऋणानुबंध होते. म्हणूनच सातासमुद्रापार ‘अ‍ॅमस्टरडॅम’ येथे त्यांचे अचानक निधन झाल्याची बातमी कळल्यानंतर नागपुरातील त्यांच्याशी अथवा त्यांच्या लेखणीशी परिचित असलेल्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तोंडातून निघाले ‘व्हिल मिस यू डिअर प्रफुल्ल बिडवई’!उपराजधानीच्या मातीशी प्रफुल्ल बिडवई यांचे फार जवळचे संबंध होते. येथे त्यांचे अनेक मित्र तर होतेच. एका पत्रकारासोबतच ते विविध चळवळींशी जुळलेले कार्यकर्तादेखील होते. जगामध्ये अण्वस्त्रांच्या वाढत्या प्रमाणामुळे पर्यावरणाला धोका आहे हे त्यांचे स्पष्ट मत होते. पर्यावरण रक्षणासाठी व अण्वस्त्रांविरुद्ध जागृतीसाठी सुरेश खैरनार यांच्यासारख्या समविचारी लोकांना एकत्रित घेऊन ‘सीएनडीपी’ (कोअ‍ॅलिएशन फॉर न्यूक्लिअर डिसआर्ममेंट अ‍ॅन्ड पीस) या संघटनेची स्थापना केली होती. विशेष म्हणजे याची स्थापनाही नागपुरात झाली. येथील ‘इंडियन पीस सेंटर’ येथे २००० साली याची पहिली बैठक झाली. त्यांचा जन्म अमरावतीचा होता. सत्तरच्या दशकात तर ‘मागोवा गट’ तसेच इतर बऱ्याच चळवळींसाठी ते नागपुरातच राहायचे व येथूनच त्यांच्यामधल्या पत्रकाराची जडणघडण होत गेली. नागपूरच्या माध्यमातून अनुभवलेल्या विविध सामाजिक समस्यांना त्यांनी समर्पकपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडले. (प्रतिनिधी)माझा मार्गदर्शक हरविला प्रफुल्ल बिडवई व माझे संबंध हे गेल्या ५० वर्षांपासूनचे म्हणजे विद्यार्थीदशेपासूनचे आहेत. बारावीनंतर त्यांनी ‘आयआयटी-पवई’त प्रवेश घेतला होता. परंतु अखेरच्या वर्षात ते तेथून परतले. अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात प्राचार्य असलेल्या त्यांच्या वडिलांनी खूप रागावले. परंतु बिडवई यांनी स्वत:ची भूमिका त्यांना समजावून सांगितली व ते पत्रकारितेसाठी मुंबईकडे रवाना झाले. विविध विषयांवर त्यांचा सखोल अभ्यास होता. सत्तरच्या दशकातील विविध चळवळींमध्ये ते सक्रिय होते. तेथीलच धडाडी व निर्भीडपणा त्यांच्या लेखणीतून उमटायचा. कमवलेला पैसा त्यांनी स्वत:पेक्षा विविध चळवळींना मुक्तहस्ते दान केला. माझे तर ते बौद्धिक मार्गदर्शकच होते. ‘सीएनडीपी’च्या बैठकीसाठी ते नेहमी नागपुरात यायचेच. काही महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत ऐनवेळी ते येऊ शकले नाही. पुस्तकाच्या प्रकाशनाची घाईगडबड असल्याने येऊ शकणार नाही हे त्यांनी कळविले. त्या बैठकीत त्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवली व यापुढे ती नेहमीच जाणवेल.-डॉ.सुरेश खैरनार, जेष्ठ सामाजिक कार्यकर्तेप्रागतिक विचारसरणीचा पत्रकारपत्रकारिता नेमकी कशी करावी याचे उदाहरणच प्रफुल्ल बिडवई यांनी घालून दिले होते. देशातील अतिशय महत्त्वाचे ते पत्रकार होते. पण कधीही कोणाच्या दबावात आले नाही. प्रागतिक विचारसरणीला त्यांनी नेहमी प्राधान्य दिले. नागपुरशी शैक्षणिक दशेपासूनच त्यांचा संबंध आला होता. त्यामुळे उपराजधानीशी जुळलेला एक विचारवंत अचानक निघून गेल्याची खंत आहे.-डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ कवी-समीक्षकअभ्यासू पत्रकार अन् मित्र प्रफुल्ल बिडवई यांच्याशी विविध सभा अन् कार्यक्रमांच्या माध्यमातून संबंध आला होता. एक व्यक्ती म्हणून ते अतिशय मनमिळावू तर होतेच. परंतु सोबतच अभ्यासू, वैचारिक पठणीतील पत्रकार होते. समाजवादी दृष्टीकोनाचे त्यांचे विचार होते. महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही दबावाशिवाय ते पत्रकारिता करायचे व सत्य लेखणीतून मांडायचे. नागपुरशी त्याचा लहानपणापासून विविध माध्यमांतून संबंध राहिला आहे. त्यामुळे हे केवळ पत्रकारितेचेच नाही तर त्यांच्या अनेक मित्रांचे कधीही भरुन न निघणारे वैयक्तिक नुकसान आहे.-डॉ.रतिनाथ मिश्रा, भाकपपत्रकारितेतील स्तंभप्रफुल्ल बिडवई हे नाव घेतले की डोळ््यासमोर येते ती निर्भीड अन् सत्याची बाजू घेणाऱ्या पत्रकाराचा चेहरा. बिडवई हे त्यांच्या लेखणीमुळे विचारवंतांमध्ये सुपरिचित होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले तरी चळवळींशी त्यांची नाळ जुळलेली होती. इंदिरा गांधी असो किंवा नरेंद्र मोदी, बिडवई यांनी त्यांच्यावर निर्भिडपणे टीका करत भाष्य केले. कुठलाही आडपडदा नाही अन् कुठलाही बडेजावपणा नाही असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. ते डाव्या विचारसरणीचे असल्याचे म्हटल्या जात होते. परंतु डाव्या पक्षांवरदेखील त्यांनी लेखणीच्या माध्यमातून जोरदार टीका केली होती. विदर्भाच्या या सुपूत्राला देश मुकला आहे.-उमेश चौबे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते