शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

संविधान प्रास्ताविक पार्कच्या विकासकामात कुणाची आडकाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 14:33 IST

केवळ विद्यापीठाच्या अखत्यारीतील कामच बाकी : अर्थसंकल्पीय तरतूद असूनही आदेश नाही

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या संविधान प्रास्ताविक पार्कच्या समितीचा वाद मिटला असला तरी या प्रकरणातून नवीन गाेष्टी प्रकाशात येत आहेत. पार्कच्या प्रस्तावाला सात वर्षे हाेऊनही काम मात्र पूर्ण झाले नाही. विशेष म्हणजे केवळ विद्यापीठाच्या अखत्यारीत येणारे सरंक्षण भिंत आणि महाद्वाराचे कामच बाकी असल्याने पार्कच्या कामात नेमकी आडकाठी काेण घालत आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागपूर विद्यापीठाच्या संविधान प्रास्ताविक पार्क समितीमधील काही सदस्यांना बाहेर काढण्याच्या प्रकरणामुळे हा विषय चर्चेत आला आहे. कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी यांनी काढलेल्या सदस्यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; पण यातून नव्या विषयांना ताेंड फुटले आहे.

हा पार्क लोकवर्गणी आणि विद्यापीठाच्या निधीमधून उभारण्याचा निर्णय झाला होता. समितीचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, डॉ. मेश्राम, डॉ. हिरेखण आदी सदस्यांनी निधीसाठी पाठपुरावा केला. याला यश आले व सामाजिक न्याय विभागाने २ कोटी ६३ लाखांचा निधी मंजूर केला. यानंतर पार्कच्या कामाला गती मिळाली. नागपूर सुधार प्रन्यासला नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. या निधीमधून डॉ. आंबेडकरांचा पुतळा आणि पार्कमधील इतर गोष्टी तयार करण्यात आल्या.

विद्यापीठाच्या निधीमधून संरक्षण भिंत आणि महाद्वारचे कायम करायचे हाेते. यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यताही दिली. त्यानंतर कुलगुरू चौधरी यांनी पुन्हा बाराहाते समिती स्थापन करून कामासंदर्भात अहवाल तयार करून घेतला. समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषदेमध्ये मान्यही करण्यात आला. त्यानुसार विद्यापीठाने अर्थसंकल्पामध्ये यासाठी तरतूद केली होती. मात्र, कुलगुरूंनी या कामाचे आदेश न दिल्याने अद्यापही संरक्षण भिंत आणि महाद्वाराचे काम सुरूच झालेले नसल्याचा आरोप समितीच्या काही सदस्यांनी केला.

कुलगुरूंनी दिले उड्डाणपूल बांधकामाचे कारण

समितीमधील अनेक सदस्यांनी उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यासाठी कुलगुरूंची भेट घेतली. मात्र, विधी महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर सध्या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असल्याने सुरक्षा भिंत किंवा महाद्वार बांधता आले नाही, असे कारण कुलगुरूंनी समिती सदस्यांना दिले. मात्र पार्कचा प्रस्ताव हा ७ वर्षांपूर्वी २०१५चा आहे आणि उड्डाणपुलाचे काम सुरू हाेऊन जेमतेम ४ महिने झाले. मग पुलाचा अडथळा कसा, असा सवाल येत आहे. दरम्यान, सदस्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. त्यांनीही प्रास्ताविक पार्कचे काम सुरू ठेवावे व पुलामुळे ते अडणार नाही, असेही सांगितले. असे असतानाही कुलगुरूंनी अद्याप काम सुरू केले नाही, असा आरोप समितीचे सदस्य व माजी कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी केला आहे. काम पूर्ण झाल्याशिवाय उद्घाटन करणेही संयुक्तिक नाही, असे डाॅ. मेश्राम यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर