शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

संविधान बदलविण्याची भाषा करणारे हेगडे कोण? भाजपने त्यांना समज द्यावी - रामदास आठवले

By आनंद डेकाटे | Updated: March 17, 2024 18:47 IST

कर्नाटकमधील भाजपचे नेते अनंत कुमार हेगडे यांनी नुकतेच संविधान बदलविण्यासंदर्भातील वक्तव्य केले.

नागपूर: कर्नाटकमधील भाजपचे नेते अनंत कुमार हेगडे यांनी नुकतेच संविधान बदलविण्यासंदर्भातील वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यासंदर्भात बोलताना ‘संविधान बदलविण्याची भाषा करणारे हेगडे कोण होत’? भाजपने त्यांना समज द्यावी, असे मत रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. केंद्रीय राज्यमंत्री आठवले रविवारी एका कार्यक्रमानिमित्त नागपुरात आले असता पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना भाजप नेते हेगडे यांच्या संविधान बदलविण्यासंदर्भातील वक्तव्याबाबत विचारले असता आठवले म्हणाले, ज्यांनी संविधानावर डोके ठेवले ते संविधान बदलविण्याचा विचार कसा करू शकतात. 

हेगडे यांची भूमिका ही भाजपविरोधी आहे. भाजपने त्यांना समज द्यावी. संविधान अजिबाद बदलणार नाही. तसा विचार जरी झाला तरी मी राजीनामा देईल, असेही ते म्हणाले. काँग्रेसचे युग संपले आहे. आता एनडीएचे युग आहे. इंडिया आघाडीला कुणी नेतृत्व नाही. मोदी हे सर्व धर्म समभावाचे प्रतिक आहेत. त्यांच्या नेतृत्वात ४०० पेक्षा जास्त जागा जिंकू. आम्ही जनतेची कामे केली. महिला आरक्षणाचे बिल पास केले. ३७० कलम हटल्याने काश्मिरमधील दहशतवाद ९० टक्के संपला आहे. जनतेला आमच्यावर विश्वास आहे आणि जनता ज्यांच्या पाठीमागे असते,तोच विजयी होतो, असेही ते म्हणाले.

रिपाइंला दोन जागा हवीलोकसभा निवडणुकीत आम्ही रिपाइसाठी शिर्डी व सोलापूरची जागा मागितली आहे, किमान एक तरी जागा मिळावी, अशी अपेक्षा आहे. जागा मिळाली नाही तरी आमचा पक्ष भाजपसोबत राहील, कारण आम्हाला दुसरा पर्याय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. रिपाइं भाजपसोबत प्रामाणिकपणे राहिला परंतु त्याप्रमाणे सत्तेत वाटा मिळाला नाही. निवडणुकीनंतर राज्यात किमान एक मंत्रिपद व महामंडळांमध्ये स्थान मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

‘वंचित’ला वंचित ठेवण्याचाच प्रयत्नवंचितला वंचित ठेवण्याचाच प्रयत्न महाविकास आघाडी करीत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत जातील असे वाटत नाही. सन्मानाने जागा मिळाल्या नाही तर त्यांनी जाऊ नये, असेही आठवले म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरRamdas Athawaleरामदास आठवले