शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

तूर डाळींच्या किमतीवर नियंत्रण कुणाचे? सामान्यांची खरेदी थांबली

By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 4, 2024 22:39 IST

मागणी व पुरवठ्यात तफावत : साठेबाजांवर कारवाईची ग्राहक संघटनांची मागणी, मे महिन्यात १३ रुपयांची वाढ

 

नागपूर : मागणी आणि पुरवठ्यात कमालीची तफावत असल्यामुळे यंदा तूर डाळीचे भाव वाढले आहेत. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात किलोमागे १० ते १३ रुपयांची वाढ झाली आहे. कॉर्पोरेट कंपन्या आणि घाऊक व्यापाऱ्यांनी कच्चा आणि प्रोसेस तूर डाळीचा मोठा साठा केल्याचा ग्राहक संघटनांचा आरोप असून साठेबाजांवर कारवाई करण्याची मागणी आहे. या निमित्ताने दरवाढीवर नियंत्रण कुणाचे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.केंद्र सरकारच्या सर्व प्रयत्नानंतरही डाळींचे भाव वाढतच आहेत. विशेषत: तूर डाळीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने स्टॉक लिमिट आणल्यानंतरही भाव कमी होताना दिसत नाही. त्याचा फटका गरीब व सामान्यांना बसला असून त्यांनी खरेदी थांबविली आहे. गोडावून, कोल्ड स्टोरेज, स्टॉक रजिस्टरची तपासणीकिमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने डाळींच्या साठवणुकीवर मर्यादा आणली. पण सरकारी अधिकारी निवडणुकीत व्यस्त असल्याचा फायदा व्यापारी घेत आहेत. याच कारणांनी एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात तूर डाळीचे दर दर्जानुसार १६० ते १७५ रुपयांवर पोहोचले आहेत. सोबतच हरभरा आणि मूग डाळीच्या किमतीही तेजीत आहेत. आणखी दरवाढीची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. तूर डाळींचा साठा वेबसाइटवर अपलोड करण्याचे आवाहनडाळींच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने कॉर्पोरेट कंपन्यांसह घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना वेबसाईटवर तूर आणि तूर डाळींचा साठा अपलोड करण्यासह स्टॉक रजिस्टर भरणे बंधनकारक केले आहे. शिवाय अपलोड केलेल्या स्टॉक रजिस्टरचे प्रिंट आऊट दुकानात ठेवायचे आहे. केंद्र आणि राज्याच्या अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान द्यायचे आहे.तूर डाळीची आयाततुरीचे उत्पादन भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशात होते. जगात डाळी उत्पादनात भारताचा वाटा २५ टक्के वाटा आहे. पण मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी तूर डाळ आयात करावी लागते. प्रामुख्याने मसूर, तूर आणि उडीद म्यानमार, पूर्व आफ्रिकन राष्ट्रे, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा येथून आयात केली जाते.डाळींचे भाव (प्रति किलो):डाळ एप्रिल महिना मे महिनातूर डाळ १४८-१६२ १६०-१७५हरभरा डाळ ६४-७४ ७४-८४उडद मोगर १२२-१४५ १२२-१४५मूग मोगर ९५-१०० १००-१०५मसूर डाळ ८०-८५ ८०-८५

मुख्यत्वे तूर डाळीच्या वाढत्या किमतीमुळे व्यवसायावर परिणाम झाला असून गुंतवणूक वाढली आहे. शिवाय साठ्यावर मर्यादा आल्या आहेत. गेल्यावर्षी दर्जेदार तूर डाळ १०० रुपयांच्या आत होती. सध्या कळमन्यात वऱ्हाडी फटक्याचे प्रति किलो दर १७५ रुपयांवर गेले आहेत. दरवाढीमुळे ग्राहकांची खरेदी कमी झाली आहे.रमेश उमाठे, धान्य व्यापारी, कळमना न्यू ग्रेन मार्केट.

टॅग्स :nagpurनागपूर