शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

... तर राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2022 20:40 IST

Nagpur News आघाडी झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर अधिकाधिक जागांवर निवडणूक लढेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी येथे स्पष्ट केले.

ठळक मुद्देभाजपवर साधला निशाणा

नागपूर : महापालिकेची आगामी निवडणूक ही महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस व शिवसेनेसोबत मिळून लढवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा आहे. स्थानिक नेत्यांशी यासंदर्भात चर्चा सुरु आहे. परंतु आघाडी झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर अधिकाधिक जागांवर निवडणूक लढेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी येथे स्पष्ट केले.

पक्षाचे संमेलन व शहर कार्यकारिणीच्या बैठकीसाठी ते नागपुरात आले असता पत्रपरिषदेत बोलत होते. पक्षाला नागपूरसह पूर्ण विदर्भात चांगले यश मिळेल, असा दावाही वळसे - पाटील यांनी यावेळी केला. त्यांनी यावेळी भाजपवर निशाना साधला. ते म्हणाले, भाजप नागपुरात २४ बाय ७चे आश्वासन पूर्ण करू शकले नाही. उद्योग न आल्याने रोजगाराच्या संधी नाहीत. यात भर म्हणजे, शेजारी राज्यातील लोक शहरात स्थायिक झाल्यानेही बेरोजगारी वाढल्याचे त्यांनी सांगितले.

शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेना मेळाव्यासंदर्भात त्यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेच्या गटाने याची काळजी घ्यावी व काही अडचणी निर्माण करू नये. मुस्लीम आरक्षणासाठी सर्वेक्षण करण्यापूर्वी आरक्षण द्यायचे आहे की नाही, हे राज्य सरकारने आधी स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले. एनआयच्या धाडीसंदर्भात विचारले असता, केंद्र सरकारने मिळालेल्या माहितीच्या आधारावरच ही कारवाई केली असेल, असे सांगितले.

अजित पवार यांच्या गृहमंत्री होण्याच्या इच्छेसंदर्भात मौन

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांची गृहमंत्री होण्याची इच्छा होती, याबाबत वळसे - पाटील यांना विचारले असता त्यांनी मौन धारण केले. त्यांनी केवळ इतकेच सांगितले की, वरिष्ठ नेत्यांनी त्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये गृहमंत्री बनवले होते, याची त्यांना कल्पना नाही.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटील