शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

दीक्षाभूमीचा जागतिक दर्जाचा विकास कुठे अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 21:48 IST

DikshaBhoomi Development Issue,भाजप सरकारने मोठा गाजावाजा करीत दीक्षाभूमीचा जागतिक दर्जाचा विकास करण्याची घोषणा केली होती. तब्बल ३५० कोटी रुपये यावर खर्च होणार होते. त्यापैकी ४० कोटीची घोषणाही केली होती, परंतु यादृष्टीने काहीही झालेले नाही. उलट निधीअभावी स्तुपाच्या डोमच्या नुतनीकरणाचे कामही रखडले आहे.

ठळक मुद्देस्तुपाच्या नुतनीकरणाचे कामही रखडले : १० कोटी पैकी केवळ ४ कोटी मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भाजप सरकारने मोठा गाजावाजा करीत दीक्षाभूमीचा जागतिक दर्जाचा विकास करण्याची घोषणा केली होती. तब्बल ३५० कोटी रुपये यावर खर्च होणार होते. त्यापैकी ४० कोटीची घोषणाही केली होती, परंतु यादृष्टीने काहीही झालेले नाही. उलट निधीअभावी स्तुपाच्या डोमच्या नुतनीकरणाचे कामही रखडले आहे.

भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीच्या विकासाची घोषणा केली होती. एक-दोन वेळा नाही तर अनेकदा त्यांनी ही घोषणा केली. दीक्षााभूमीवरूनच त्यांनी साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून दीक्षाभूमीचा जागतिक दर्जाच्या विकासाचे आश्वासन दिले होते. यापैकी ४० कोटी रुपये देण्याची घोषणाही केली होती. पुढे त्याचे काय झाले कुणालाच माहीत नाही. स्मारक समितीलाही या योजनेचे पुढे काय झाले याची माहिती नाही. यातच केंद्राच्या दिल्ली येथील आंबेडकर फाऊंडेशनतर्फे स्मारकाच्या डोमच्या नुतनीकरणासाठी १० काेटी रुपये मंजूर झाले होते. यापैकी ४ कोटी रुपयाचा निधीही मिळाला. डोमच्या कामालाही सुरुवात झाली. परंतु उर्वरित निधीअभावी हे काम रखडले आहे.

उर्वरित निधी मिळावा

स्तुपाच्या डोमच्या नुतनीकरणासाठी १० कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी केवळ ४ कोटी रुपये मिळाले. उर्वरित निधी तातडीने मिळावा. यासोबतच दीक्षाभूमीला लाागून असलेली कृषी विभागाची जागा सरकारने द्यावी, अशी स्मारक समितीची मागणी आहे.

विलास गजघाटे

सदस्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीGovernmentसरकार