शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

शिक्षणाला कुठे आले वयाचे बंधन : वयाच्या ७८ व्या वर्षी मिळविली २४ वी पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 21:05 IST

चक्क वयाच्या ७८ व्या वर्षीदेखील त्यांच्यातील शिक्षणाचा उत्साह कायम असून, सोमवारी त्यांनी आयुष्यातील २४ वी पदवी प्राप्त केली.

ठळक मुद्दे‘इग्नू’तील ज्येष्ठ नागरिकाची अनोखी प्रेरणावाट

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शिक्षण म्हटले की त्यात परिश्रम, समर्पण अन् सतत काहीतरी नवीन मिळविण्याचा शोध या गोष्टी येतातच.जी व्यक्ती संकल्प करून प्रामाणिकपणे शिक्षणाच्या प्रवाहात चालते तिच्यासाठी विद्या ग्रहण करणे ही एक साधनाच असते. सर्वसाधारणत: निवृत्ती झाल्यानंतर सुखासमाधानाने व आरामात आयुष्य जगण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र सेवानिवृत्तीनंतरदेखील त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. ज्ञान हेच मनुष्याचे शाश्वत धन आहे हाच विचार नेहमी डोक्यात ठेवला व अव्याहतपणे विद्येची साधना सुरूच ठेवली. चक्क वयाच्या ७८ व्या वर्षीदेखील त्यांच्यातील शिक्षणाचा उत्साह कायम असून, सोमवारी त्यांनी आयुष्यातील २४ वी पदवी प्राप्त केली. दिगंबर महादेव आळशी असे या ‘तरुण’ विद्यार्थ्यांचे नाव असून, आता पदव्यांचे पाव शतक पूर्ण करायच्या तयारीत ते लागले आहे.दिगंबर आळशी यांनी ‘बीई’ पदवी पूर्ण केली व त्यानंतर ते ‘जीईसी’मध्ये नोकरीला लागले. परंतु आयुष्यात स्थिरस्थावर झाले म्हणून त्यांनी शिक्षण सोडले नाही. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून विविध पदव्यांचा अभ्यास केला. यात पत्रकारिता, ‘एलएलएम’, एमबीए’, ‘एमसीजे’, ‘एम.एस.’, ’एम.ए.’ (लोकप्रशासन, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, भाषा, अर्वाचीन भारतीय इतिहास-पुरातत्त्वशास्त्र, मानसशास्त्र) इत्यादींचा समावेश होता. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी नोकरी व शिक्षण दोन्ही गोष्टी सुरूच ठेवल्या. ‘जीईसी’चे महाव्यवस्थापक म्हणून ते निवृत्त झाले. परंतु शिक्षण ग्रहण करणे त्यांनी सोडले नाही. त्यानंतरही त्यांनी अनेक पदवी व पदविका अभ्यासक्रमांचा अभ्यास केला. विविध प्रकारच्या २३ पदव्या मिळविल्यानंतर ‘इग्नू’त (इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) त्यांनी ‘पी.जी.डिप्लोमा इन इंटरनॅशनल बिझनेस ऑपरेशन्स’ या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. नियमितपणे अभ्यास करून त्यांनी यातदेखील यश मिळविले. सोमवारी ‘इग्नू’च्या दीक्षांत समारंभात त्यांना पदवी प्रदान करण्यात आली.आता ‘पीएचडी’चा संकल्पसमाजात वावरताना लोक अनेकदा हताश झालेले दिसून येतात. परंतु प्रत्यक्षात शिक्षणातून हताशपणा अन् दु:ख दूर होऊ शकते. शिक्षणाला वयाचे बंधन नसते आणि आयुष्यभर शिकण्याची प्रक्रिया ही सुरूच असते हाच विचार मी नेहमी डोक्यात ठेवला. आता मी पंचविसाव्या अभ्यासक्रमाला ‘इग्नू’तच प्रवेश घेतला आहे व ‘पीएचडी’ करण्याचादेखील संकल्प आहे, अशी भावना दिगंबर आळशी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :universityविद्यापीठ