शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
2
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
3
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
4
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
5
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
6
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
7
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
8
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
9
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
10
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
11
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
12
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
13
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
14
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
15
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
16
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
17
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
18
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
19
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
20
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांना’ कधी मिळतील मुख्य प्रवाहात येण्याचे हक्क ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 09:51 IST

दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने बरेच प्रयत्न होत असले तरी आजही राज्यात केवळ दहाच दिव्यांग प्रवर्गात येणाऱ्यांनाच अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात आहे.

ठळक मुद्दे२१ मधून १० दिव्यांग प्रवर्गांनाच प्रमाणपत्र अध्ययन अक्षम, सिकलसेल, थॅलेसेमिया, अ‍ॅसिड अटॅकचे रुग्ण उपेक्षित

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने बरेच प्रयत्न होत असले तरी आजही राज्यात केवळ दहाच दिव्यांग प्रवर्गात येणाऱ्यांनाच अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात आहे. यामुळे मोजक्याच दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे. विशेष म्हणजे, केंद्राने २०१६ च्या नव्या कायद्यानुसार दिव्यांगांच्या प्रवर्गात वाढ केली आहे. नऊवरून २१ प्रवर्ग केले आहेत. मात्र या कायद्याची अंमलबजावणी राज्यात झाली नसल्याने हजारो दिव्यांगबांधव आपल्या अधिकारांपासून वंचित आहेत.दिव्यांगांना विशेष अधिकार देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्राच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागाने २०१५ रोजी विशेषज्ञाची समिती स्थापन केली होती. या समितीने अस्थिव्यंग, दृष्टिदोष, श्रवणदोष, रक्तासंबंधित विकाराचे दोष, मानसिक रुग्ण, बहुविकलांग, तीव्र मज्जासंस्थेबाबतची स्थिती व विकासासंबंधी विकार याला घेऊन आठ उपसमिती स्थापन केल्या. या समितीने दिलेला अहवाल आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. अहवालाला अंतिम रूप देऊन अधिसूची काढण्यात आली. यात पूर्वीच्या नऊ दिव्यांग प्रवर्गासोबत १२ नवीन प्रवर्ग जोडण्यात आल्याचे व त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. केंद्राचा हा नवीन कायदा दिव्यांगांसाठी आशादायी ठरणारा होता. कारण, यात ज्याला वाचन, लेखन करण्यास अवघड जात असलेल्या, उलटे अक्षर लिहित असलेल्या म्हणजेच ‘अध्ययन अक्षम’ व्यक्तीचा समावेश दिव्यांगांच्या प्रवर्गात करण्यात आला. याशिवाय, मेंदूचा पक्षाघात, बुटकेपणा, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, हातापायातील स्नायूंमधील ताठरपणा किंवा कमजोरी म्हणजे ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’, थॅलसेमिया, अनुवांशिक रक्तविकार, सिकलसेल, अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेले रुग्ण, कंपवात रोग यांचा समावेश करण्यात आला. परंतु हा कायदा अद्यापही राज्यात लागू झालेला नाही. यामुळे हजारो दिव्यांगबांधव आपल्या अधिकारांपासून वंचित असून, त्यांची प्रगती व विकास खुंटत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

या दिव्यांग प्रवर्गाचे मिळते प्रमाणपत्र- पूर्णत: अंध, अंशत: अंध, कर्णबधिर, वाचा दोष, अस्थिव्यंग, मानसिक आजार, कुष्ठरोग, सेरेब्रल पाल्सी, डाऊन सिंड्रोम, स्वमग्न (नागपूरपुरतेच मर्यादित)

या प्रवर्गाचे मिळत नाही- अध्ययन अक्षम, सिकलसेल, थॅलेसेमिया, मेंदूचा पक्षाघात, बहुविकलांग, बुटकेपणा, अ‍ॅसिड अटॅक, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, मल्टिपल स्क्लेरोसिस, अधिक रक्तस्राव, कंपवात रोगकेंद्राने २१ दिव्यांग प्रवर्गांना त्यांचे मूल्यमापन करून प्रमाणपत्र देण्याच्या अधिसूचना काढल्या आहेत. राज्याने याची व्यापक प्रमाणात अंमलबजावणी करून त्यांना प्रमाणपत्र देऊन अधिकार द्यायला हवेत.

-डॉ. रोहिणी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या

लालफितशाहीचा बसतोय फटकादिव्यांगांच्या विविध २१ प्रवर्गांना त्यांचे मूल्यमापन करून तसे प्रमाणपत्र देण्याचे अधिसूची केंद्राच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने काढली असली तरी, त्याच्या अंमलबजावणीचे अधिकार सार्वजनिक आरोग्य विभागाला आहे. परंतु या विभागातील लालफितीशाहीमुळे दिव्यांगांच्या २१ प्रवर्गांमधून दहाच प्रवर्गांनाच प्रमाणपत्र दिले जात आहे.

टॅग्स :GovernmentसरकारHealthआरोग्य