शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

‘त्यांना’ कधी मिळतील मुख्य प्रवाहात येण्याचे हक्क ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 09:51 IST

दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने बरेच प्रयत्न होत असले तरी आजही राज्यात केवळ दहाच दिव्यांग प्रवर्गात येणाऱ्यांनाच अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात आहे.

ठळक मुद्दे२१ मधून १० दिव्यांग प्रवर्गांनाच प्रमाणपत्र अध्ययन अक्षम, सिकलसेल, थॅलेसेमिया, अ‍ॅसिड अटॅकचे रुग्ण उपेक्षित

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने बरेच प्रयत्न होत असले तरी आजही राज्यात केवळ दहाच दिव्यांग प्रवर्गात येणाऱ्यांनाच अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात आहे. यामुळे मोजक्याच दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे. विशेष म्हणजे, केंद्राने २०१६ च्या नव्या कायद्यानुसार दिव्यांगांच्या प्रवर्गात वाढ केली आहे. नऊवरून २१ प्रवर्ग केले आहेत. मात्र या कायद्याची अंमलबजावणी राज्यात झाली नसल्याने हजारो दिव्यांगबांधव आपल्या अधिकारांपासून वंचित आहेत.दिव्यांगांना विशेष अधिकार देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्राच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागाने २०१५ रोजी विशेषज्ञाची समिती स्थापन केली होती. या समितीने अस्थिव्यंग, दृष्टिदोष, श्रवणदोष, रक्तासंबंधित विकाराचे दोष, मानसिक रुग्ण, बहुविकलांग, तीव्र मज्जासंस्थेबाबतची स्थिती व विकासासंबंधी विकार याला घेऊन आठ उपसमिती स्थापन केल्या. या समितीने दिलेला अहवाल आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. अहवालाला अंतिम रूप देऊन अधिसूची काढण्यात आली. यात पूर्वीच्या नऊ दिव्यांग प्रवर्गासोबत १२ नवीन प्रवर्ग जोडण्यात आल्याचे व त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. केंद्राचा हा नवीन कायदा दिव्यांगांसाठी आशादायी ठरणारा होता. कारण, यात ज्याला वाचन, लेखन करण्यास अवघड जात असलेल्या, उलटे अक्षर लिहित असलेल्या म्हणजेच ‘अध्ययन अक्षम’ व्यक्तीचा समावेश दिव्यांगांच्या प्रवर्गात करण्यात आला. याशिवाय, मेंदूचा पक्षाघात, बुटकेपणा, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, हातापायातील स्नायूंमधील ताठरपणा किंवा कमजोरी म्हणजे ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’, थॅलसेमिया, अनुवांशिक रक्तविकार, सिकलसेल, अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेले रुग्ण, कंपवात रोग यांचा समावेश करण्यात आला. परंतु हा कायदा अद्यापही राज्यात लागू झालेला नाही. यामुळे हजारो दिव्यांगबांधव आपल्या अधिकारांपासून वंचित असून, त्यांची प्रगती व विकास खुंटत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

या दिव्यांग प्रवर्गाचे मिळते प्रमाणपत्र- पूर्णत: अंध, अंशत: अंध, कर्णबधिर, वाचा दोष, अस्थिव्यंग, मानसिक आजार, कुष्ठरोग, सेरेब्रल पाल्सी, डाऊन सिंड्रोम, स्वमग्न (नागपूरपुरतेच मर्यादित)

या प्रवर्गाचे मिळत नाही- अध्ययन अक्षम, सिकलसेल, थॅलेसेमिया, मेंदूचा पक्षाघात, बहुविकलांग, बुटकेपणा, अ‍ॅसिड अटॅक, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, मल्टिपल स्क्लेरोसिस, अधिक रक्तस्राव, कंपवात रोगकेंद्राने २१ दिव्यांग प्रवर्गांना त्यांचे मूल्यमापन करून प्रमाणपत्र देण्याच्या अधिसूचना काढल्या आहेत. राज्याने याची व्यापक प्रमाणात अंमलबजावणी करून त्यांना प्रमाणपत्र देऊन अधिकार द्यायला हवेत.

-डॉ. रोहिणी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या

लालफितशाहीचा बसतोय फटकादिव्यांगांच्या विविध २१ प्रवर्गांना त्यांचे मूल्यमापन करून तसे प्रमाणपत्र देण्याचे अधिसूची केंद्राच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने काढली असली तरी, त्याच्या अंमलबजावणीचे अधिकार सार्वजनिक आरोग्य विभागाला आहे. परंतु या विभागातील लालफितीशाहीमुळे दिव्यांगांच्या २१ प्रवर्गांमधून दहाच प्रवर्गांनाच प्रमाणपत्र दिले जात आहे.

टॅग्स :GovernmentसरकारHealthआरोग्य