शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

समीक्षणाची पाश्चिमात्य चौकट कधी ओलांडणार? - म. रा. जोशी

By प्रविण खापरे | Updated: November 8, 2022 15:44 IST

अविनाश आवलगावकर यांना ‘संशोधन महर्षी’ पदवी प्रदान : द्विदिवसीय महानुभाव संशोधन साहित्य संमेलनाचे उद्घाटन

नागपूर : जोवर महानुभावी वाङ्मय साहित्याची दखल घेतली जाणार नाही, तोवर मराठी साहित्यातील चढउताराचा इतिहास सांगता येणार नाही. मराठी समीक्षक अजूनही पाश्चिमात्य चौकटीतच आहेत. तिकडल्या भावभावनांचे समीक्षण करण्याची चौकट आपल्याकडील भावभावनांचे समीक्षण करण्यास लागू तरी होऊ शकते का? असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ समीक्षक डॉ. मधूकर रामदास जोशी यांनी पाश्चिमात्य चौकट ओलांडून मराठी साहित्यिकांनी महानुभवांची चिकित्सापद्धती आत्मसात करण्याचे आवाहन आज (दि. ८) येथे केले. 

विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत द्विदिवसीय महानुभाव संशोधन साहित्य संमेलनाचे आयोजन धरमपेठ येथील वनामतीच्या आवारात करण्यात आले. रविवारी या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक म्हणून डॉ. म.रा. जोशी आपल्या चिंतन व्यक्त करत होते. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. अविनाश आवलगावकर यांना विदर्भ संशोधन मंडळातर्फे ‘संशोधन महर्षी’ ही पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. मनिषा नागपूरे यांनी मानपत्राचे वाचन केले. याचवेळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ समीक्षक डॉ. मदन कुळकर्णी उपस्थित होते.

मराठी भाषा व साहित्याचा इतिहास लिहिण्यासाठी महानुभावी साहित्याचा आधार घ्यावाच लागतो. महानुभावी साहित्यातील ‘सुत्रपाठ’ नंतर मराठी साहित्यात कोणतेही सुत्रपाठ लिहिले गेले नाही. लिळाचरित्र, सुत्रपाठ, दासबोध आदींचा शोध घेण्यासाठी त्यांची रचना कळणे गरजेचे आहे आणि त्यासाठी समीक्षणाची भारतीय चौकट महत्त्वाची ठरणार असल्याचे डॉ. म. रा. जोशी यावेळी म्हणाले. तत्पूर्वी सरस्वती स्तवन व महाराष्ट्र गीत अश्विनी दळवी यांनी गायले. प्रास्ताविक व परिचय डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी केले. संचालन डॉ. अजय कुळकर्णी यांनी केले तर आभार प्रणव हळदे यांनी मानले.

संत साहित्य हेच मराठी साहित्याचे मुलाधार - आवलगावकर 

- कोणत्याही संप्रदायांचे संत साहित्य हेच मराठी साहित्याचे मुलाधार असून विद्यापीठांनी संत साहित्यांकडे उदारतेने बघण्याचे आवाहन संमेलनाध्यक्ष डॉ. अविनाश आवलगावकर यांनी यावेळी केले. महानुभावांनी वेद स्विकारले किंवा नाकारले नाही तर त्याही पुढचा विचार दिला आहे. समीक्षकांनी संप्रदयांमध्ये भेट पाडू नये आणि द्वेष पसरवू नये. विचारांमध्ये मतभेद असणे हेच विचारांच्या जीवंतपणाचे लक्षण असल्याचे ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूरVidarbhaविदर्भ