शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
गिल 'गोल्डन डक' झाला अन् 'डगआउट'मध्ये बसलेल्या संजूसह पुन्हा चर्चेत आला 'वशीलेबाजी'चा मुद्दा
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

समीक्षणाची पाश्चिमात्य चौकट कधी ओलांडणार? - म. रा. जोशी

By प्रविण खापरे | Updated: November 8, 2022 15:44 IST

अविनाश आवलगावकर यांना ‘संशोधन महर्षी’ पदवी प्रदान : द्विदिवसीय महानुभाव संशोधन साहित्य संमेलनाचे उद्घाटन

नागपूर : जोवर महानुभावी वाङ्मय साहित्याची दखल घेतली जाणार नाही, तोवर मराठी साहित्यातील चढउताराचा इतिहास सांगता येणार नाही. मराठी समीक्षक अजूनही पाश्चिमात्य चौकटीतच आहेत. तिकडल्या भावभावनांचे समीक्षण करण्याची चौकट आपल्याकडील भावभावनांचे समीक्षण करण्यास लागू तरी होऊ शकते का? असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ समीक्षक डॉ. मधूकर रामदास जोशी यांनी पाश्चिमात्य चौकट ओलांडून मराठी साहित्यिकांनी महानुभवांची चिकित्सापद्धती आत्मसात करण्याचे आवाहन आज (दि. ८) येथे केले. 

विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत द्विदिवसीय महानुभाव संशोधन साहित्य संमेलनाचे आयोजन धरमपेठ येथील वनामतीच्या आवारात करण्यात आले. रविवारी या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक म्हणून डॉ. म.रा. जोशी आपल्या चिंतन व्यक्त करत होते. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. अविनाश आवलगावकर यांना विदर्भ संशोधन मंडळातर्फे ‘संशोधन महर्षी’ ही पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. मनिषा नागपूरे यांनी मानपत्राचे वाचन केले. याचवेळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ समीक्षक डॉ. मदन कुळकर्णी उपस्थित होते.

मराठी भाषा व साहित्याचा इतिहास लिहिण्यासाठी महानुभावी साहित्याचा आधार घ्यावाच लागतो. महानुभावी साहित्यातील ‘सुत्रपाठ’ नंतर मराठी साहित्यात कोणतेही सुत्रपाठ लिहिले गेले नाही. लिळाचरित्र, सुत्रपाठ, दासबोध आदींचा शोध घेण्यासाठी त्यांची रचना कळणे गरजेचे आहे आणि त्यासाठी समीक्षणाची भारतीय चौकट महत्त्वाची ठरणार असल्याचे डॉ. म. रा. जोशी यावेळी म्हणाले. तत्पूर्वी सरस्वती स्तवन व महाराष्ट्र गीत अश्विनी दळवी यांनी गायले. प्रास्ताविक व परिचय डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी केले. संचालन डॉ. अजय कुळकर्णी यांनी केले तर आभार प्रणव हळदे यांनी मानले.

संत साहित्य हेच मराठी साहित्याचे मुलाधार - आवलगावकर 

- कोणत्याही संप्रदायांचे संत साहित्य हेच मराठी साहित्याचे मुलाधार असून विद्यापीठांनी संत साहित्यांकडे उदारतेने बघण्याचे आवाहन संमेलनाध्यक्ष डॉ. अविनाश आवलगावकर यांनी यावेळी केले. महानुभावांनी वेद स्विकारले किंवा नाकारले नाही तर त्याही पुढचा विचार दिला आहे. समीक्षकांनी संप्रदयांमध्ये भेट पाडू नये आणि द्वेष पसरवू नये. विचारांमध्ये मतभेद असणे हेच विचारांच्या जीवंतपणाचे लक्षण असल्याचे ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूरVidarbhaविदर्भ