शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

समीक्षणाची पाश्चिमात्य चौकट कधी ओलांडणार? - म. रा. जोशी

By प्रविण खापरे | Updated: November 8, 2022 15:44 IST

अविनाश आवलगावकर यांना ‘संशोधन महर्षी’ पदवी प्रदान : द्विदिवसीय महानुभाव संशोधन साहित्य संमेलनाचे उद्घाटन

नागपूर : जोवर महानुभावी वाङ्मय साहित्याची दखल घेतली जाणार नाही, तोवर मराठी साहित्यातील चढउताराचा इतिहास सांगता येणार नाही. मराठी समीक्षक अजूनही पाश्चिमात्य चौकटीतच आहेत. तिकडल्या भावभावनांचे समीक्षण करण्याची चौकट आपल्याकडील भावभावनांचे समीक्षण करण्यास लागू तरी होऊ शकते का? असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ समीक्षक डॉ. मधूकर रामदास जोशी यांनी पाश्चिमात्य चौकट ओलांडून मराठी साहित्यिकांनी महानुभवांची चिकित्सापद्धती आत्मसात करण्याचे आवाहन आज (दि. ८) येथे केले. 

विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत द्विदिवसीय महानुभाव संशोधन साहित्य संमेलनाचे आयोजन धरमपेठ येथील वनामतीच्या आवारात करण्यात आले. रविवारी या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक म्हणून डॉ. म.रा. जोशी आपल्या चिंतन व्यक्त करत होते. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. अविनाश आवलगावकर यांना विदर्भ संशोधन मंडळातर्फे ‘संशोधन महर्षी’ ही पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. मनिषा नागपूरे यांनी मानपत्राचे वाचन केले. याचवेळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ समीक्षक डॉ. मदन कुळकर्णी उपस्थित होते.

मराठी भाषा व साहित्याचा इतिहास लिहिण्यासाठी महानुभावी साहित्याचा आधार घ्यावाच लागतो. महानुभावी साहित्यातील ‘सुत्रपाठ’ नंतर मराठी साहित्यात कोणतेही सुत्रपाठ लिहिले गेले नाही. लिळाचरित्र, सुत्रपाठ, दासबोध आदींचा शोध घेण्यासाठी त्यांची रचना कळणे गरजेचे आहे आणि त्यासाठी समीक्षणाची भारतीय चौकट महत्त्वाची ठरणार असल्याचे डॉ. म. रा. जोशी यावेळी म्हणाले. तत्पूर्वी सरस्वती स्तवन व महाराष्ट्र गीत अश्विनी दळवी यांनी गायले. प्रास्ताविक व परिचय डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी केले. संचालन डॉ. अजय कुळकर्णी यांनी केले तर आभार प्रणव हळदे यांनी मानले.

संत साहित्य हेच मराठी साहित्याचे मुलाधार - आवलगावकर 

- कोणत्याही संप्रदायांचे संत साहित्य हेच मराठी साहित्याचे मुलाधार असून विद्यापीठांनी संत साहित्यांकडे उदारतेने बघण्याचे आवाहन संमेलनाध्यक्ष डॉ. अविनाश आवलगावकर यांनी यावेळी केले. महानुभावांनी वेद स्विकारले किंवा नाकारले नाही तर त्याही पुढचा विचार दिला आहे. समीक्षकांनी संप्रदयांमध्ये भेट पाडू नये आणि द्वेष पसरवू नये. विचारांमध्ये मतभेद असणे हेच विचारांच्या जीवंतपणाचे लक्षण असल्याचे ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूरVidarbhaविदर्भ