शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

समीक्षणाची पाश्चिमात्य चौकट कधी ओलांडणार? - म. रा. जोशी

By प्रविण खापरे | Updated: November 8, 2022 15:44 IST

अविनाश आवलगावकर यांना ‘संशोधन महर्षी’ पदवी प्रदान : द्विदिवसीय महानुभाव संशोधन साहित्य संमेलनाचे उद्घाटन

नागपूर : जोवर महानुभावी वाङ्मय साहित्याची दखल घेतली जाणार नाही, तोवर मराठी साहित्यातील चढउताराचा इतिहास सांगता येणार नाही. मराठी समीक्षक अजूनही पाश्चिमात्य चौकटीतच आहेत. तिकडल्या भावभावनांचे समीक्षण करण्याची चौकट आपल्याकडील भावभावनांचे समीक्षण करण्यास लागू तरी होऊ शकते का? असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ समीक्षक डॉ. मधूकर रामदास जोशी यांनी पाश्चिमात्य चौकट ओलांडून मराठी साहित्यिकांनी महानुभवांची चिकित्सापद्धती आत्मसात करण्याचे आवाहन आज (दि. ८) येथे केले. 

विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत द्विदिवसीय महानुभाव संशोधन साहित्य संमेलनाचे आयोजन धरमपेठ येथील वनामतीच्या आवारात करण्यात आले. रविवारी या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक म्हणून डॉ. म.रा. जोशी आपल्या चिंतन व्यक्त करत होते. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. अविनाश आवलगावकर यांना विदर्भ संशोधन मंडळातर्फे ‘संशोधन महर्षी’ ही पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. मनिषा नागपूरे यांनी मानपत्राचे वाचन केले. याचवेळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ समीक्षक डॉ. मदन कुळकर्णी उपस्थित होते.

मराठी भाषा व साहित्याचा इतिहास लिहिण्यासाठी महानुभावी साहित्याचा आधार घ्यावाच लागतो. महानुभावी साहित्यातील ‘सुत्रपाठ’ नंतर मराठी साहित्यात कोणतेही सुत्रपाठ लिहिले गेले नाही. लिळाचरित्र, सुत्रपाठ, दासबोध आदींचा शोध घेण्यासाठी त्यांची रचना कळणे गरजेचे आहे आणि त्यासाठी समीक्षणाची भारतीय चौकट महत्त्वाची ठरणार असल्याचे डॉ. म. रा. जोशी यावेळी म्हणाले. तत्पूर्वी सरस्वती स्तवन व महाराष्ट्र गीत अश्विनी दळवी यांनी गायले. प्रास्ताविक व परिचय डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी केले. संचालन डॉ. अजय कुळकर्णी यांनी केले तर आभार प्रणव हळदे यांनी मानले.

संत साहित्य हेच मराठी साहित्याचे मुलाधार - आवलगावकर 

- कोणत्याही संप्रदायांचे संत साहित्य हेच मराठी साहित्याचे मुलाधार असून विद्यापीठांनी संत साहित्यांकडे उदारतेने बघण्याचे आवाहन संमेलनाध्यक्ष डॉ. अविनाश आवलगावकर यांनी यावेळी केले. महानुभावांनी वेद स्विकारले किंवा नाकारले नाही तर त्याही पुढचा विचार दिला आहे. समीक्षकांनी संप्रदयांमध्ये भेट पाडू नये आणि द्वेष पसरवू नये. विचारांमध्ये मतभेद असणे हेच विचारांच्या जीवंतपणाचे लक्षण असल्याचे ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूरVidarbhaविदर्भ