शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

संजय गांधी निराधार योजनेला 'अध्यक्ष' पदाचा 'आधार' कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:56 IST

समिती गठीत करणे अत्यावश्यक : तरच होईल योजनेचे कार्य गतिमान

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्कउमरेड : अंध, दिव्यांग, अनाथ मुले, गंभीर आजारग्रस्त, घटस्फोटीत महिला आदींसह संजय गांधी निराधार अनुदान योजना हजारो निराधारांसाठी 'आधार'वड ठरते. या अतिशय महत्त्वाकांक्षी योजनेला मागील काही महिन्यांपासून अध्यक्षच नाही. साधारणतः दोन ते तीन महिन्यांपासून अध्यक्षाविना या योजनेचा कारभार सुरू आहे. संजय गांधी निराधार योजनेला अध्यक्षपदाचा 'आधार' मिळणार कधी, असा सवाल विचारला जात आहे.

राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अविरत सुरू आहे. आजमितीस उमरेड तहसीलअंतर्गत एकूण ११,८५१ लाभार्थी या योजनांचा लाभ घेतात. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे ३,९२९, श्रावण बाळ योजनेचे ६,६०९ तसेच विधवांसाठी असलेल्या इंदिरा गांधी विधवा योजनेचे २६, वृद्धापकाळ योजनेचे १,२७१ आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे १६ लाभार्थ्यांचा त्यात समावेश आहे.

संजय गांधी निराधार योजनेची समिती अध्यक्षांसह नऊ जणांची असते. ती गठीत केली जाते. या योजनेच्या अध्यक्षपदाचा कारभार यापूर्वी राजकुमार कोहपरे यांच्याकडे होता. दोन वर्षांच्या कालखंडात त्यांनी अंदाजे दोन हजार अर्ज मंजुरीची प्रक्रियासुद्धा केली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत २७ सप्टेंबर २०२४ ला सभा आयोजित केली होती.

त्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागली. निवडणुका आटोपल्या. निकालही लागला. अद्याप नवनियुक्त अध्यक्ष आणि त्यांच्या समितीचे गठण करण्यात आले नाही. सध्या अध्यक्ष नसल्याने तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्याकडे समितीचा कारभार असून, त्यांनी अर्जदारांची अडचण समजून घेत जानेवारी महिन्यात असंख्य अर्जास हिरवी झेंडी दिली. असे असले तरी संजय गांधी निराधार योजनेची समिती गठीत झाल्याशिवाय या योजनेच्या कार्याला गतिमान करता येऊ शकत नाही, असे मत व्यक्त होत आहे.

डिसेंबर २०२४ पासून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान डीबीटी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वळती होत आहे. सध्या डिसेंबर २०२४ पर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांना प्राप्त आहेत. डीबीटी पोर्टलमुळे अनुदानाची प्रक्रिया तातडीने होईल, अशी लाभार्थ्यांची अपेक्षा आहे.

११४ जणांचे अर्ज जानेवारीत तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी दखल घेत शेकडो अर्जास मंजुरी दिली. त्यानंतर पुन्हा अर्ज आले आहेत. सध्या ११४ जणांचे अर्ज असून, लवकरच यावरही प्रक्रिया केली जाईल, असे संबंधित कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. असे असले तरी अध्यक्षाविना कारभाराला गती येणार नाही. हे पद महत्त्वाचे आहे, असे मत राजकुमार कोहपरे यांनी व्यक्त केले.

"संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत सप्टेंबर महिन्यात अखेरची सभा झाली. निवडणुकाही झाल्या. दरम्यान, अनेक अर्ज धडकले. आता जानेवारी महिन्यात सभा झाली. केवळ प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर या योजनेचा वेग वाढू शकत नाही. समिती अत्यावश्यक आहे. येत्या काही दिवसांत याबाबत आम्हीही विचारणा करणार आहोत. तातडीने गोरगरीब, सर्वसामान्यांच्या या योजनेसाठी अध्यक्ष आणि समितीचे गठण करण्यात यावे."- रितेश राऊत, उपाध्यक्ष, युवक काँग्रेस उमरेड विधानसभा

टॅग्स :nagpurनागपूर