शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

संजय गांधी निराधार योजनेला 'अध्यक्ष' पदाचा 'आधार' कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:56 IST

समिती गठीत करणे अत्यावश्यक : तरच होईल योजनेचे कार्य गतिमान

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्कउमरेड : अंध, दिव्यांग, अनाथ मुले, गंभीर आजारग्रस्त, घटस्फोटीत महिला आदींसह संजय गांधी निराधार अनुदान योजना हजारो निराधारांसाठी 'आधार'वड ठरते. या अतिशय महत्त्वाकांक्षी योजनेला मागील काही महिन्यांपासून अध्यक्षच नाही. साधारणतः दोन ते तीन महिन्यांपासून अध्यक्षाविना या योजनेचा कारभार सुरू आहे. संजय गांधी निराधार योजनेला अध्यक्षपदाचा 'आधार' मिळणार कधी, असा सवाल विचारला जात आहे.

राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अविरत सुरू आहे. आजमितीस उमरेड तहसीलअंतर्गत एकूण ११,८५१ लाभार्थी या योजनांचा लाभ घेतात. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे ३,९२९, श्रावण बाळ योजनेचे ६,६०९ तसेच विधवांसाठी असलेल्या इंदिरा गांधी विधवा योजनेचे २६, वृद्धापकाळ योजनेचे १,२७१ आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे १६ लाभार्थ्यांचा त्यात समावेश आहे.

संजय गांधी निराधार योजनेची समिती अध्यक्षांसह नऊ जणांची असते. ती गठीत केली जाते. या योजनेच्या अध्यक्षपदाचा कारभार यापूर्वी राजकुमार कोहपरे यांच्याकडे होता. दोन वर्षांच्या कालखंडात त्यांनी अंदाजे दोन हजार अर्ज मंजुरीची प्रक्रियासुद्धा केली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत २७ सप्टेंबर २०२४ ला सभा आयोजित केली होती.

त्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागली. निवडणुका आटोपल्या. निकालही लागला. अद्याप नवनियुक्त अध्यक्ष आणि त्यांच्या समितीचे गठण करण्यात आले नाही. सध्या अध्यक्ष नसल्याने तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्याकडे समितीचा कारभार असून, त्यांनी अर्जदारांची अडचण समजून घेत जानेवारी महिन्यात असंख्य अर्जास हिरवी झेंडी दिली. असे असले तरी संजय गांधी निराधार योजनेची समिती गठीत झाल्याशिवाय या योजनेच्या कार्याला गतिमान करता येऊ शकत नाही, असे मत व्यक्त होत आहे.

डिसेंबर २०२४ पासून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान डीबीटी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वळती होत आहे. सध्या डिसेंबर २०२४ पर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांना प्राप्त आहेत. डीबीटी पोर्टलमुळे अनुदानाची प्रक्रिया तातडीने होईल, अशी लाभार्थ्यांची अपेक्षा आहे.

११४ जणांचे अर्ज जानेवारीत तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी दखल घेत शेकडो अर्जास मंजुरी दिली. त्यानंतर पुन्हा अर्ज आले आहेत. सध्या ११४ जणांचे अर्ज असून, लवकरच यावरही प्रक्रिया केली जाईल, असे संबंधित कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. असे असले तरी अध्यक्षाविना कारभाराला गती येणार नाही. हे पद महत्त्वाचे आहे, असे मत राजकुमार कोहपरे यांनी व्यक्त केले.

"संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत सप्टेंबर महिन्यात अखेरची सभा झाली. निवडणुकाही झाल्या. दरम्यान, अनेक अर्ज धडकले. आता जानेवारी महिन्यात सभा झाली. केवळ प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर या योजनेचा वेग वाढू शकत नाही. समिती अत्यावश्यक आहे. येत्या काही दिवसांत याबाबत आम्हीही विचारणा करणार आहोत. तातडीने गोरगरीब, सर्वसामान्यांच्या या योजनेसाठी अध्यक्ष आणि समितीचे गठण करण्यात यावे."- रितेश राऊत, उपाध्यक्ष, युवक काँग्रेस उमरेड विधानसभा

टॅग्स :nagpurनागपूर