शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सावनेर बसस्थानकाचे रूपडं पालटणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : चार प्रमुख महामार्गांना जाेडणाऱ्या सावनेर शहरातील बसस्थानक महत्त्वाचे ठिकाण आहे. येथूनच मध्य प्रदेशातील विविध ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : चार प्रमुख महामार्गांना जाेडणाऱ्या सावनेर शहरातील बसस्थानक महत्त्वाचे ठिकाण आहे. येथूनच मध्य प्रदेशातील विविध शहरांत बसेस धावतात. येथील बसस्थानकाचा कायापालट करण्यासाठी २०१९ मध्ये भूमिपूजन करून बांधकाम सुरू करण्यात आले. परंतु दाेन वर्षांचा कालावधी उलटूनही बांधकाम अपूर्णच आहे. त्यामुळे या बसस्थानकाचे रूपडं पालटणार कधी? असा प्रश्न प्रवाशांसह नागरिक विचारत आहेत.

दिल्ली, जबलपूर, भाेपाळ, अमरावती, छिंदवाडा, नागपूर अशा महत्त्वाच्या महामार्गांना जाेडणाऱ्या सावनेर बसस्थानक येथे प्रवाशांची सतत रेलचेल असते. तालुक्यात काेळसा, मॅग्निज खाणी व औद्याेगिक क्षेत्र असल्याने शेकडाे अधिकारी, कर्मचारी दरराेज ये-जा करतात. शिवाय तालुक्यातील खेड्यापाड्यांच्या नागरिकांची शहरात ये-जा असते. यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी बघायला मिळते. परंतु बसस्थानकाचे बांधकाम रखडले असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागताे.

दाेन वर्षांपासून कासवगतीने सुरू असलेले बांधकाम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. यामुळे प्रवाशांचे अक्षरश: हाल हाेताना दिसून येते. या प्रकारामुळे बसचालक, अधिकारी-कर्मचारीसुद्धा त्रासले आहेत. बसस्थानकाच्या आवारात सर्वत्र बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे. यामुळे बसेस फलाटावर लावताना अडचण हाेते. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बसस्थानकाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.

...

असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला

बसस्थानकाच्या अर्धवट बांधकामामुळे या ठिकाणी असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. गावखेड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाेस्ट नाक्यावर गैरसाेयीचा सामना करावा लागताे. यामुळे विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. तालुक्यातील नागलवाडी, रायवाडी, आग्रा, जटामखाेरा येथे मुक्कामी बसफेऱ्या हाेत्या. यामुळे परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना सकाळी लवकर शहराच्या ठिकाणी जाता येत हाेते. मात्र या मुक्काम बसफेऱ्या बंद झाल्याने गावकऱ्यांची गैरसाेय हाेत आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी व लाेकप्रतिनिधींनी लक्ष पुरवून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे.