शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

खरे गणतंत्र कधी मिळणार?

By admin | Updated: January 26, 2015 01:04 IST

काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच़ पण, या स्वर्गाला दहशतवाद्यांची दृष्ट लागली अन् शांत वाहणाऱ्या चिनाबचे काठ पेटून उठले़ भारतीय स्वातंत्र्याची साठी उलटली तरी ही धग काही

काश्मिरी तरुणांचा देशाला सवाल नागपूर : काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच़ पण, या स्वर्गाला दहशतवाद्यांची दृष्ट लागली अन् शांत वाहणाऱ्या चिनाबचे काठ पेटून उठले़ भारतीय स्वातंत्र्याची साठी उलटली तरी ही धग काही कमी व्हायचे नाव घेत नाही़ रडणं, विलापणं आणि नीरव रात्रींना चिरत जाणारे आक्रंदन आजही सुरूच आहे़ सीमेपलीकडून आलेल्या गोळीने जीव गमावणाऱ्यांच्या मुलांचा जगण्याचा संघर्षही थांबलेला नाही़ बंदुकी आणि संगिनींच्या छायेत वावरणारे हे नंदनवन शांत झाले असा एक विचार मनात येतो अन् पुढच्याच क्षणी उखळी तोफांचे गोळे घराच्या भिंतीवर धडकायला लागतात़ जीवन अन् मृत्यूच्या अशा सीमारेषेवर राहणारे काही तरुण नागपुरात आले आहेत. त्यांच्याशी लोकमतने विशेष संवाद साधला. आजच्या या प्रजासत्ताकदिनी आमच्या स्वप्नातील गणतंत्र कधी मिळेल, असा प्रश्न ते विचारत आहेत़ स्वातंत्र्याच्या अर्थ मनमानी नव्हे! भारतीय संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. पण याचा अर्थ मनात येईल तसे वागा असा होत नाही़ प्रत्येकाने स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना, आपल्या स्वातंत्र्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्यात बाधा निर्माण होणार नाही, ही काळजी घेतली पाहिजे. -जाहिद भटप्रतिशोधाची भावना हद्दपार व्हावीआकाशात उंच भरारी मारणाऱ्या गरुडाप्रमाणे सर्व क्षेत्रात प्रगतीकडे घोडदौड करू पाहणारा युवक हा राष्ट्राचा अनमोल ठेवा मानला जातो. राष्ट्राची संपत्ती मानली जाते. आज आपल्या देशातील तरुण आपल्याच देशातील बंधूवर सूड उगवायला निघाला.-रिक्झेन चंडोलराष्ट्राभिमानाचा विसर नकोदेशाच्या सीमेवर निधड्या छातीने लढणाऱ्या सैनिकांविषयी आमच्यासारख्या तरुणवर्गाला आत्मियता वाटत असली, तरी मात्र आम्ही एक दिवस का होईना त्यांच्या सुखदु:खात सामील व्हायला मागे-पुढे पाहतो. यास नवी संस्कृती व तिचे अनुकरण करणारे आपण कारणीभूत आहोत. या संस्कृतीच्या अनुकरणामुळे जगण्याचे संदर्भ बदललेले आहेत.-जोगिंदर सिंहप्रत्येक दिवस गणतंत्रदिन असावा केवळ स्वातंत्र दिन, गणराज्य दिन अशा दिवशीच राष्ट्रभक्ती, राष्ट्राभिमान जागृत न करता उगवणाऱ्या प्रत्येकच दिवशी देशाप्रति, राष्ट्राप्रति आपुलकी बाळगली पाहिजे. युवक हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे. आजच्या युवकांमध्ये जल्लोष, गुर्मी, उर्मी, उन्माद, सळसळते रक्त, हिंमत, जोश हे प्रकर्षाने दिसून येतात. -स्टॅझिंग दोरेजेतरुणच आह देशाची शानसारे भारतीय माझे बांधव आहेत, अशी प्रतिज्ञा आज आपण विसरलो आहे. या देशाचे आज आपण असून उद्याचे भविष्य ठरविणारेही आपणच आहोत, याची जाण असू द्यावी. तरुण राष्ट्राची आन आहे अन् तोच राष्ट्राची शानही आहे! -रुबिना अफजल मीरसमाजाची अपेक्षा पूर्ण करातरुणांना आज चिंतन करण्याची गरज आहे़ नवे फॅशन, ट्रेन्ड, प्रेम, मजा, मस्तीतही आपल्यातील देशप्रेमाची भावना कायम राहिली पाहिजे़ युवक या देशाचा चमकता लखलखीत तारा आहे. या ताऱ्याच्या प्रकाशाने हा देश उजळून निघावा, अशी समाजाचीही भावना आहे़ ही भावना जपण्यासाठी आपल्या राष्ट्रभावना बोथट होऊ देऊ नका, ती उर्मी कायम ठेवा.-आशिक खान