शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खरे गणतंत्र कधी मिळणार?

By admin | Updated: January 26, 2015 01:04 IST

काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच़ पण, या स्वर्गाला दहशतवाद्यांची दृष्ट लागली अन् शांत वाहणाऱ्या चिनाबचे काठ पेटून उठले़ भारतीय स्वातंत्र्याची साठी उलटली तरी ही धग काही

काश्मिरी तरुणांचा देशाला सवाल नागपूर : काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच़ पण, या स्वर्गाला दहशतवाद्यांची दृष्ट लागली अन् शांत वाहणाऱ्या चिनाबचे काठ पेटून उठले़ भारतीय स्वातंत्र्याची साठी उलटली तरी ही धग काही कमी व्हायचे नाव घेत नाही़ रडणं, विलापणं आणि नीरव रात्रींना चिरत जाणारे आक्रंदन आजही सुरूच आहे़ सीमेपलीकडून आलेल्या गोळीने जीव गमावणाऱ्यांच्या मुलांचा जगण्याचा संघर्षही थांबलेला नाही़ बंदुकी आणि संगिनींच्या छायेत वावरणारे हे नंदनवन शांत झाले असा एक विचार मनात येतो अन् पुढच्याच क्षणी उखळी तोफांचे गोळे घराच्या भिंतीवर धडकायला लागतात़ जीवन अन् मृत्यूच्या अशा सीमारेषेवर राहणारे काही तरुण नागपुरात आले आहेत. त्यांच्याशी लोकमतने विशेष संवाद साधला. आजच्या या प्रजासत्ताकदिनी आमच्या स्वप्नातील गणतंत्र कधी मिळेल, असा प्रश्न ते विचारत आहेत़ स्वातंत्र्याच्या अर्थ मनमानी नव्हे! भारतीय संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. पण याचा अर्थ मनात येईल तसे वागा असा होत नाही़ प्रत्येकाने स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना, आपल्या स्वातंत्र्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्यात बाधा निर्माण होणार नाही, ही काळजी घेतली पाहिजे. -जाहिद भटप्रतिशोधाची भावना हद्दपार व्हावीआकाशात उंच भरारी मारणाऱ्या गरुडाप्रमाणे सर्व क्षेत्रात प्रगतीकडे घोडदौड करू पाहणारा युवक हा राष्ट्राचा अनमोल ठेवा मानला जातो. राष्ट्राची संपत्ती मानली जाते. आज आपल्या देशातील तरुण आपल्याच देशातील बंधूवर सूड उगवायला निघाला.-रिक्झेन चंडोलराष्ट्राभिमानाचा विसर नकोदेशाच्या सीमेवर निधड्या छातीने लढणाऱ्या सैनिकांविषयी आमच्यासारख्या तरुणवर्गाला आत्मियता वाटत असली, तरी मात्र आम्ही एक दिवस का होईना त्यांच्या सुखदु:खात सामील व्हायला मागे-पुढे पाहतो. यास नवी संस्कृती व तिचे अनुकरण करणारे आपण कारणीभूत आहोत. या संस्कृतीच्या अनुकरणामुळे जगण्याचे संदर्भ बदललेले आहेत.-जोगिंदर सिंहप्रत्येक दिवस गणतंत्रदिन असावा केवळ स्वातंत्र दिन, गणराज्य दिन अशा दिवशीच राष्ट्रभक्ती, राष्ट्राभिमान जागृत न करता उगवणाऱ्या प्रत्येकच दिवशी देशाप्रति, राष्ट्राप्रति आपुलकी बाळगली पाहिजे. युवक हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे. आजच्या युवकांमध्ये जल्लोष, गुर्मी, उर्मी, उन्माद, सळसळते रक्त, हिंमत, जोश हे प्रकर्षाने दिसून येतात. -स्टॅझिंग दोरेजेतरुणच आह देशाची शानसारे भारतीय माझे बांधव आहेत, अशी प्रतिज्ञा आज आपण विसरलो आहे. या देशाचे आज आपण असून उद्याचे भविष्य ठरविणारेही आपणच आहोत, याची जाण असू द्यावी. तरुण राष्ट्राची आन आहे अन् तोच राष्ट्राची शानही आहे! -रुबिना अफजल मीरसमाजाची अपेक्षा पूर्ण करातरुणांना आज चिंतन करण्याची गरज आहे़ नवे फॅशन, ट्रेन्ड, प्रेम, मजा, मस्तीतही आपल्यातील देशप्रेमाची भावना कायम राहिली पाहिजे़ युवक या देशाचा चमकता लखलखीत तारा आहे. या ताऱ्याच्या प्रकाशाने हा देश उजळून निघावा, अशी समाजाचीही भावना आहे़ ही भावना जपण्यासाठी आपल्या राष्ट्रभावना बोथट होऊ देऊ नका, ती उर्मी कायम ठेवा.-आशिक खान