काश्मिरी तरुणांचा देशाला सवाल नागपूर : काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच़ पण, या स्वर्गाला दहशतवाद्यांची दृष्ट लागली अन् शांत वाहणाऱ्या चिनाबचे काठ पेटून उठले़ भारतीय स्वातंत्र्याची साठी उलटली तरी ही धग काही कमी व्हायचे नाव घेत नाही़ रडणं, विलापणं आणि नीरव रात्रींना चिरत जाणारे आक्रंदन आजही सुरूच आहे़ सीमेपलीकडून आलेल्या गोळीने जीव गमावणाऱ्यांच्या मुलांचा जगण्याचा संघर्षही थांबलेला नाही़ बंदुकी आणि संगिनींच्या छायेत वावरणारे हे नंदनवन शांत झाले असा एक विचार मनात येतो अन् पुढच्याच क्षणी उखळी तोफांचे गोळे घराच्या भिंतीवर धडकायला लागतात़ जीवन अन् मृत्यूच्या अशा सीमारेषेवर राहणारे काही तरुण नागपुरात आले आहेत. त्यांच्याशी लोकमतने विशेष संवाद साधला. आजच्या या प्रजासत्ताकदिनी आमच्या स्वप्नातील गणतंत्र कधी मिळेल, असा प्रश्न ते विचारत आहेत़ स्वातंत्र्याच्या अर्थ मनमानी नव्हे! भारतीय संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. पण याचा अर्थ मनात येईल तसे वागा असा होत नाही़ प्रत्येकाने स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना, आपल्या स्वातंत्र्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्यात बाधा निर्माण होणार नाही, ही काळजी घेतली पाहिजे. -जाहिद भटप्रतिशोधाची भावना हद्दपार व्हावीआकाशात उंच भरारी मारणाऱ्या गरुडाप्रमाणे सर्व क्षेत्रात प्रगतीकडे घोडदौड करू पाहणारा युवक हा राष्ट्राचा अनमोल ठेवा मानला जातो. राष्ट्राची संपत्ती मानली जाते. आज आपल्या देशातील तरुण आपल्याच देशातील बंधूवर सूड उगवायला निघाला.-रिक्झेन चंडोलराष्ट्राभिमानाचा विसर नकोदेशाच्या सीमेवर निधड्या छातीने लढणाऱ्या सैनिकांविषयी आमच्यासारख्या तरुणवर्गाला आत्मियता वाटत असली, तरी मात्र आम्ही एक दिवस का होईना त्यांच्या सुखदु:खात सामील व्हायला मागे-पुढे पाहतो. यास नवी संस्कृती व तिचे अनुकरण करणारे आपण कारणीभूत आहोत. या संस्कृतीच्या अनुकरणामुळे जगण्याचे संदर्भ बदललेले आहेत.-जोगिंदर सिंहप्रत्येक दिवस गणतंत्रदिन असावा केवळ स्वातंत्र दिन, गणराज्य दिन अशा दिवशीच राष्ट्रभक्ती, राष्ट्राभिमान जागृत न करता उगवणाऱ्या प्रत्येकच दिवशी देशाप्रति, राष्ट्राप्रति आपुलकी बाळगली पाहिजे. युवक हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे. आजच्या युवकांमध्ये जल्लोष, गुर्मी, उर्मी, उन्माद, सळसळते रक्त, हिंमत, जोश हे प्रकर्षाने दिसून येतात. -स्टॅझिंग दोरेजेतरुणच आह देशाची शानसारे भारतीय माझे बांधव आहेत, अशी प्रतिज्ञा आज आपण विसरलो आहे. या देशाचे आज आपण असून उद्याचे भविष्य ठरविणारेही आपणच आहोत, याची जाण असू द्यावी. तरुण राष्ट्राची आन आहे अन् तोच राष्ट्राची शानही आहे! -रुबिना अफजल मीरसमाजाची अपेक्षा पूर्ण करातरुणांना आज चिंतन करण्याची गरज आहे़ नवे फॅशन, ट्रेन्ड, प्रेम, मजा, मस्तीतही आपल्यातील देशप्रेमाची भावना कायम राहिली पाहिजे़ युवक या देशाचा चमकता लखलखीत तारा आहे. या ताऱ्याच्या प्रकाशाने हा देश उजळून निघावा, अशी समाजाचीही भावना आहे़ ही भावना जपण्यासाठी आपल्या राष्ट्रभावना बोथट होऊ देऊ नका, ती उर्मी कायम ठेवा.-आशिक खान
खरे गणतंत्र कधी मिळणार?
By admin | Updated: January 26, 2015 01:04 IST