शहरं
Join us  
Trending Stories
1
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
2
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
3
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
4
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
5
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
6
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
7
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
8
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
9
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
10
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
11
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
12
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
13
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
14
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
15
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
16
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
17
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
19
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
20
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक, माैदा बाजार समित्यांची निवडणूक घेणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : रामटेक व माैदा या दाेन तालुकामिळून असलेल्या रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : रामटेक व माैदा या दाेन तालुकामिळून असलेल्या रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे साडेसहा वर्षापूर्वी विभाजन करून रामटेक व माैदा या दाेन कृषी उत्पन्न बाजार समित्या तयार करण्यात आल्या. या दाेन्ही बाजार समित्यांवर प्रशासकांची करण्यात आलेली नियुक्ती आजही कायम आहे. वास्तवात, या बाजार समित्यांच्या निवडणुका वेळीच हाेणे अपेक्षित असताना त्या घेण्यात न आल्याने त्याचा बाजार समित्यांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम झाला आहे.

रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीची शेवटची निवडणूक जून २०१० मध्ये घेण्यात आली हाेती. त्यावेळी लक्ष्मण उमाळे यांची सभापती तर नकुल बरबटे यांची उपसभापतिपदी निवड करण्यात आली हाेती. या संचालक मंडळाने डिसेंबर २०१४ पर्यंत बाजार समितीचा कारभार सांभाळला. डिसेंबर २०१४ मध्ये या बाजार समितीचे रामटेक व माैदा या दाेन बाजार समित्यांमध्ये विभाजन करण्यात आले. त्याचवेळी या दाेन्ही बाजार समित्यांवर प्रशासकांची व नंतर अशासकीय संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली.

या विभाजनाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आल्याने राज्य शासनाने केलेले बाजार समितीचे विभाजन उच्च न्यायालयाने या विभाजनाला सन २०१५ मध्ये स्थगनादेश दिला. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने राज्य शासनाला या बाजार समित्यांच्या निवडणुका घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे या दाेन्ही बाजार समित्यांचा कारभार पाहण्यासाठी त्यावर प्रशासकांची नियुक्ती करणे क्रमप्राप्त हाेते. या काळात राज्य शासनाने त्रुटींची पूर्तता केल्याची माहिती न्यायालयाला सादर केली. त्यामुळे न्यायालयाने सन २०१७ मध्ये या विभाजनाला मान्यता दिली. सध्या रामटेक बाजार समितीचा कारभार प्रशासक म्हणून रामटेकचे सहायक निबंधक तर माैदा बाजार समितीचा कारभार माैद्याचे सहायक निबंधक कारभार बघत आहेत.

....

एक तालुका, एक बाजार समिती

रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे डिसेंबर २०१४ मध्ये विभाजन करून रामटेक व माैदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती करण्यात आली. या विभाजनामागे राज्य शासनाचा ‘एक तालुका, एक बाजार समिती’ ही संकल्पना हाेती. त्यामुळे या दाेन्ही स्वतंत्र बाजार समित्या तयार करण्यात आल्या. विभाजनापासून आजवर या दाेन्ही बाजार समित्यांवर अशासकीय प्रशासक मंडळांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक व प्रशासक मंडळाला महत्त्वाचे निर्णय घेण्याबाबत काही मर्यादा आहेत.

....

विकास कामांना खेळ

शेतकऱ्यांच्या दृष्टीने बाजार समित्यांना विशेष महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाची चांगल्या पद्धतीने विक्री व्हावी, यासाठी बाजार समित्यांच्या आवारात काही महत्त्वाची विकास कामे करणेही गरजेचे आहे. बाजार समित्यांवर संचालक मंडळ असल्यास विकास कामांच्या बाबतीत ठाेस निर्णय घेणे सुकर हाेते. या दाेन्ही बाजार समित्यांच्या अद्याप निवडणुका घेण्यात न असल्याने साडेसहा वर्षात येथील विकास कामांना खीळ बसली असून, त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसत आहे.

...

कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

या दाेन्ही बाजार समित्यांनी निवडणुकीला लागणाऱ्या खर्चाचा भरणा राज्य शासनाकडे केला आहे. या दाेन्ही बाजार समित्यांवर संचालक मंडळ नसल्याने या काळात बाजार समित्यांना त्यांचे उत्पन्नाचे स्राेत वाढविणे शक्य झाले नाही. उत्पन्न न वाढल्याने विकास कामेही थांबली. एवढेच नव्हे तर माैदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांना मागील सात महिन्यांपासून त्यांचे मासिक वेतनही देण्यात आले नाही.