शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेला स्थायी मुख्याधिकारी मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वरूप खरगे यांची पाच महिन्यांपूर्वी बदली करण्यात आली आणि या पदाचा प्रभार ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वरूप खरगे यांची पाच महिन्यांपूर्वी बदली करण्यात आली आणि या पदाचा प्रभार पारशिवनीनगर पंचायतच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्याकडे साेपविण्यात आला. शासनाने या पालिकेवर स्थायी मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती न केल्याने शहरातील विविध विकासकामांसाेबतच नागरिकांची महत्त्वाची कामे रखडली आहेत. त्यामुळे शहरातील काेरोना संक्रमण उपाययाेजनांच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रामटेकला पाैराणिक पार्श्वभूमी लाभल्याने ते महत्त्वाचे पर्यटनस्थळ बनले आहे. शहराचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून राज्य शासनाने विकास आराखडा तयार करून त्याअंतर्गत काही कामेही सुरू केली आहेत. मार्च २०२० पासून जिल्ह्यात काेराेना संक्रमणाला सुरुवात झाली आणि रामटेक शहरातही काेराेना रुग्ण आढळून आले. त्यातच शासनाने पालिकेचे मुख्याधिकारी स्वरूप खरगे यांच्या बदलीचे आदेश दिले. त्यांच्या जागी तातडीने स्थायी मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती न करता अर्चना वंजारींकडे प्रभार साेपविला.

शहराचा विकास, जनता आणि शासन यात मुख्याधिकारी महत्त्वाचा दुवा ठरतात. अर्चना वंजारी या आठवड्यातील काही दिवस रामटेक शहरात येत असल्याने तसेच त्यांना पारशिवनी नगर पंचायतचीही कामे बघावी लागत असल्याने रामटेक पालिकेचे कामकाम व शहरातील विकासकामे यावर नियंत्रण ठेवणे व ते मार्गी लावणे यात त्यांचीही फरफट हाेत आहे. शहरात काेराेना संक्रमण असून, बहुतांश नागरिक मास्क न वापरता फिरतात. बाजारात व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करतात. दंडात्मक कारवाई केली जात नसल्याने त्यांच्यावर कुणाचाही वचक राहिला नाही.

...

विविध कामे प्रभावित

पालिकेला स्थायी मुख्याधिकारी नसल्याने शहरातील अतिक्रमण हटाव माेहीम, प्लास्टिक बंदी माेहीम, काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांची अंमलबजावणी तसेच या बाबींचे उल्लंघन केल्यानंतर करावयाची दंडात्मक कारवाई थंडबस्त्यात गेली आहे. शहरात पार्किंगची माेठी समस्या असून, वाहतूक काेंडीमुळे भांडणे हाेतात. ती समस्याही जैसे थेच आहे. हा प्रकार महात्मा गांधी चाैक व बसस्थानक चाैकात सर्वाधिक घडताे. साेबतच शहरातील जलतरण प्रकल्प, राखी तलाव साैंदर्यीकरण, नळयाेजना, रस्ते दुरुस्ती, घरकुल याेजना, उद्यान दुरुस्ती, पार्किंग, तीर्थक्षेत्र विकास, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ शहर, सुंदर शहर अभियान, शिक्षण, आराेग्य, कर संकलन यासह अन्य बाबी प्रभावित झाल्या आहेत.