शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक न.प.च्या जागेवरील अतिक्रमण कधी हटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:12 IST

रामटेक : नगरपालिकेच्या जागेवर असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी व अतिक्रमण करणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी १२ ऑगस्टपासून रामटेकच्या गांधी चाैकात तुळशीराम ...

रामटेक : नगरपालिकेच्या जागेवर असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी व अतिक्रमण करणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी १२ ऑगस्टपासून रामटेकच्या गांधी चाैकात तुळशीराम काेठेकर हे उपाेषणाला बसले आहेत. जाेवर येथील ७/१२ मिळत नाही ताेवर उपाेषण साेडणार नाही, अशी उपोषणकर्त्याची भूमिका आहे. यावर अद्यापही तोडगा निघाला नाही. माजी नगरसेवक चंद्रशेखर भाेयर व रामानंद अडामे हेही आंदोलनात सहभागी आहेत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते उदयसिंग यादव यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. रामटेकचे तहसीलदार बाळासाहेब मस्के व मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी उपाेषण मंडपाला भेट देत याप्रकरणी कारवाई करण्यासंदर्भात प्रशासनाला वेळ देण्यात यावा. यासोबतच उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली आहे.

राज्य शासनाच्या महसूल व वन मंत्रालयाच्या ३० जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार देवस्थानच्या मालकीची जमीन वहिवाटधारकांना विकता येत नाही. रामटेक शहरातील परमानंद स्वामी देवस्थानची सर्व्हे क्र. १६६/२ मध्ये स्थावर मालमत्ता आहे. काहींनी ही जमीन अकृषक करून त्यावर भूखंड तयार केले. त्याची विक्री केली, असा तुळशीराम काेठेकर यांचा आरोप आहे.

महसूल विभागाच्या दस्तऐवजानुसार सर्व्हे क्र. १४२, १४५, १५०, १५१, १५२, १९६, १६९ व २४४ मधील जमीन रामटेक नगरपालिकेच्या हद्दीत आहे. मात्र त्या जागेवर नवरगाव आमगाव ग्रामपंचायत कर आकारणी करीत आहे. ही जमीन नगरपालिकेने ताब्यात घ्यावी व त्यावर कर आकारणी करावी, अशी या तीन माजी नगरसेवकांची मागणी आहे.

सिटी सर्व्हे क्र. १३८, १४७, १५०, १४८ व १४६ मधील जमिनीची आराजी ८१४१.८ व १०८८.५ चाै.मीटर आहे. या जागेवर साेनेघाट ग्रामपंचायतने अतिक्रमण करून कर आकारणी करीत आहे. कवडक वाॅर्ड व नवीन विनाेबा वाॅर्डमधील सर्व्हे क्र. २२० तसेच झुडपी सर्व्हे क्र. २२२, २२३ व २२४ या जागेवर गाळे व शाैचालय बांधकाम करण्यात आले असल्याचे काेठेकर यांनी सांगितले.

घरकुल परिसरातील अवैध धंदे बंद करा

दुधाळा येथे ७२ घरकुलाचे बांधकाम नगरपालिकेने केले. पण २० वर्षांपासून याचे याेग्य पद्धतीने वाटप केलेले नाही. त्यामुळे या घरकुलात अवैध धंदे सुरू आहेत. तेव्हा हे अतिक्रमण हटवून याेग्य पद्धतीने वाटप करावे, शहरामध्ये मूत्रीघराची व्यवस्था अपुरी आहे. त्यामुळे सुसज्ज मूत्रीघराची व्यवस्था करावी, अशा विविध मागण्या उपाेषणकर्त्यांनी केल्या आहेत. आता यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.