शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

रामटेक न.प.च्या जागेवरील अतिक्रमण कधी हटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:12 IST

रामटेक : नगरपालिकेच्या जागेवर असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी व अतिक्रमण करणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी १२ ऑगस्टपासून रामटेकच्या गांधी चाैकात तुळशीराम ...

रामटेक : नगरपालिकेच्या जागेवर असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी व अतिक्रमण करणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी १२ ऑगस्टपासून रामटेकच्या गांधी चाैकात तुळशीराम काेठेकर हे उपाेषणाला बसले आहेत. जाेवर येथील ७/१२ मिळत नाही ताेवर उपाेषण साेडणार नाही, अशी उपोषणकर्त्याची भूमिका आहे. यावर अद्यापही तोडगा निघाला नाही. माजी नगरसेवक चंद्रशेखर भाेयर व रामानंद अडामे हेही आंदोलनात सहभागी आहेत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते उदयसिंग यादव यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. रामटेकचे तहसीलदार बाळासाहेब मस्के व मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी उपाेषण मंडपाला भेट देत याप्रकरणी कारवाई करण्यासंदर्भात प्रशासनाला वेळ देण्यात यावा. यासोबतच उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली आहे.

राज्य शासनाच्या महसूल व वन मंत्रालयाच्या ३० जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार देवस्थानच्या मालकीची जमीन वहिवाटधारकांना विकता येत नाही. रामटेक शहरातील परमानंद स्वामी देवस्थानची सर्व्हे क्र. १६६/२ मध्ये स्थावर मालमत्ता आहे. काहींनी ही जमीन अकृषक करून त्यावर भूखंड तयार केले. त्याची विक्री केली, असा तुळशीराम काेठेकर यांचा आरोप आहे.

महसूल विभागाच्या दस्तऐवजानुसार सर्व्हे क्र. १४२, १४५, १५०, १५१, १५२, १९६, १६९ व २४४ मधील जमीन रामटेक नगरपालिकेच्या हद्दीत आहे. मात्र त्या जागेवर नवरगाव आमगाव ग्रामपंचायत कर आकारणी करीत आहे. ही जमीन नगरपालिकेने ताब्यात घ्यावी व त्यावर कर आकारणी करावी, अशी या तीन माजी नगरसेवकांची मागणी आहे.

सिटी सर्व्हे क्र. १३८, १४७, १५०, १४८ व १४६ मधील जमिनीची आराजी ८१४१.८ व १०८८.५ चाै.मीटर आहे. या जागेवर साेनेघाट ग्रामपंचायतने अतिक्रमण करून कर आकारणी करीत आहे. कवडक वाॅर्ड व नवीन विनाेबा वाॅर्डमधील सर्व्हे क्र. २२० तसेच झुडपी सर्व्हे क्र. २२२, २२३ व २२४ या जागेवर गाळे व शाैचालय बांधकाम करण्यात आले असल्याचे काेठेकर यांनी सांगितले.

घरकुल परिसरातील अवैध धंदे बंद करा

दुधाळा येथे ७२ घरकुलाचे बांधकाम नगरपालिकेने केले. पण २० वर्षांपासून याचे याेग्य पद्धतीने वाटप केलेले नाही. त्यामुळे या घरकुलात अवैध धंदे सुरू आहेत. तेव्हा हे अतिक्रमण हटवून याेग्य पद्धतीने वाटप करावे, शहरामध्ये मूत्रीघराची व्यवस्था अपुरी आहे. त्यामुळे सुसज्ज मूत्रीघराची व्यवस्था करावी, अशा विविध मागण्या उपाेषणकर्त्यांनी केल्या आहेत. आता यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.