शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

विद्वत व व्यवस्थापन परिषद कधी गठित होणार ?

By admin | Updated: June 17, 2014 00:42 IST

प्रशासकीय कामात राज्य सरकारला लकवा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत आहे. मात्र हा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्याच अखत्यारित असलेल्या उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी निश्चितपणे लागू होत

अभिनय खोपडे - गडचिरोलीप्रशासकीय कामात राज्य सरकारला लकवा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत आहे. मात्र हा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्याच अखत्यारित असलेल्या उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी निश्चितपणे लागू होत असल्याचा प्रत्यय येत आहे. दोन वर्षांपासून गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्वत समित्या स्थापन करण्याबाबतचा निर्णय खोळंबला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूची निवड प्रक्रियाही रखडली आहे. मात्र सरकारला याचे काहीच सोयरसुतक नाही.चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी गडचिरोली येथे राज्य शासनाने गोंडवाना विद्यापीठाची स्थापना केली. २ आॅक्टोबर २०११ ला हे विद्यापीठ गठीत करण्यात आले. मात्र दोन-अडीच वर्ष लोटूनही विद्यापीठाच्या परिषदा गठीत करण्यात आल्या नाही. त्यामुळे नव्या कुलगुरूची निवड प्रक्रियाही वांध्यात आली आहे. गोंडवाना विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून डॉ. विजय आर्इंचवार यांना नियुक्ती देण्यात आली होती. डॉ. आर्इंचवार ६ मार्च २०१४ ला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची धुरा गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजित कुमार यांच्याकडे विभागीय आयुक्त नागपूर यांनी दिली. राज्य शासनाने या परिषदांचे गठण केल्याशिवाय कुलगुरू निवड प्रक्रिया होणे शक्य नसल्याचे विद्यापीठाशी संबंधित शैक्षणिक जाणकारांचे म्हणणे आहे. या दोन्ही परिषदांचे सदस्य कुलगुरू निवड प्रक्रियेत सहभागी होत असतात. दोन्ही परिषदांची संयुक्त बैठक होऊन त्यात आलेल्या नावांवर विचारविनिमय केला जातो व एका नावावर शिक्कामोर्तब केले जाते. त्यानंतर सदर नाव शिफारशीच्या तत्वावर राज्य शासनाकडे पाठविले जाते व कुलगुरू निवडला जातो. मात्र या परिषदाच नसल्याने विद्यापीठाला कुलगुरू मिळणे कठीण होणार आहे. सुरूवातीला शासनाला या दोन परिषदांचे गठण करावे लागेल. त्यानंतर या परिषदेचे सदस्य कुलगुरू निवड प्रक्रिया सुरू करतील. या समित्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या नाहीत. त्यामुळे कुलगुरू निवडीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. राज्य सरकार अनेक ठिकाणी निर्णय घेण्यास विलंब लावत आहे. याचा फटका विद्यापीठाच्या प्रशासकीय कामालाही बसत आहे. त्यामुळे आणखी किमान सहा महिने तरी कुलगुरू मिळण्याची शक्यता नाही. सहा महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिताही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुलगुरू निवड प्रक्रिया २०१४ च्या अखेरीसच पार पडते की काय? अशी भीती शैक्षणिक वर्तुळात व्यक्त केली जात आहे.