शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

नागपूर जिल्हा बँकेचे १५६ कोटी केदार कधी परत करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 10:34 IST

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १५६ कोटी नुकसान सावनेरचे आमदार सुनील केदार कधी भरून देणार, हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १५६ कोटी नुकसान सावनेरचे आमदार सुनील केदार कधी भरून देणार, हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.सुनील केदार १९९९ ते २०१२ या काळात नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. या काळात केदार यांनी सरकारी कर्जरोख्यांमध्ये बँकेचे पैसे गुंतविण्याचा सपाटा लावला. २००२ च्या जानेवारी महिन्यात केदार यांनी पाच शेअर दलाल कंपन्यांना १२४.६० कोटी कर्जरोखे घेण्यासाठी दिले. दलालांनी बँकेला हे कर्जरोखे दिले नाही व शेवटी केदारांच्या अव्यापारेषू उपद्व्यापामुळे नागपूर जिल्हा बँक बंद पडायच्या बेतात आहे.या घोटाळ्यासाठी ३ मे २००२ रोजी केदार यांना सीआयडीने अटकही केली होती व ९ आॅगस्ट २००२ पर्यंत केदार नागपूरच्या जेलमध्ये होते. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. या रोखे घोटाळ्याचा तपास करून सीआयडीने सुनील केदार, जिल्हा बँकेचे महाव्यवस्थापक अशोक चौधरी, लेखा अधिकारी सुरेश पेशकर, होम ट्रेड सिक्युरिटीज वाशीचे अध्यक्ष संजय अग्रवाल, संचालक सुबोध भंडारी, गिल्टराज मॅनेजमेंटचे अध्यक्ष केतन सेठ, सिंडीकेट मॅनेजमेंटचे संचालक अमित वर्मा, सेंच्युरी डीलर्सचे संचालक श्रीप्रकाश पोद्दार, इंद्रमणी मर्चंटस्चे संचालक महेंद्र अग्रवाल, होम ट्रेडचे कंपनी सेक्रेटरी एन. एस. त्रिवेदी व होम ट्रेडच्या गुंतवणूक अधिकारी कन्नन मेवावाला, अशा ११ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. गेल्या १७ वर्षांपासून हा खटला न्यायदंडाधिकारी कोर्टात प्रलंबित आहे.या महाघोटाळ्याची चौकशी सहकार खात्याचे विशेष अंकेक्षक यशवंत बागडे यांनी केदार यांच्या दबावाला न जुमानता पूर्ण केली. सुनील केदार हे या घोटाळ्यासाठी पूर्णत: जबाबदार असल्याने त्यांच्याकडून १५६ कोटी व २००२ पासून आजपर्यंतचे १२ टक्के दरसाल व्याज वसूल करावे, असा आदेश दिला आहे. आज ही रक्कम ४०० कोटीपेक्षा अधिक झाली आहे.सुनील केदारांच्याच सावनेर मतदार संघातील कार्यकर्ते ओमप्रकाश कामडी यांनी हा खटला दररोज सुनावणी घेऊन केदार यांच्याकडून १५६ कोटी व व्याज वसूल करावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने हा खटला एक महिन्यात निकाली काढावा, असा आदेश मे २०१९ मध्ये दिला आहे. एवढे होऊनही केदारांविरुद्धचा खटला न्यायदंडाधिकारी कोर्टात दररोज सुनावणीसाठी आला नाही. आता गेल्या १७ वर्षांत हा खटला चालविणाऱ्या सर्व न्यायदंडाधिकाऱ्यांविरुद्ध कोर्टाचा अवमान केल्याची कारवाई होणार असल्याची चर्चा आहे.दरम्यान, २००२ सालापासून नागपूर जिल्हा बँक आर्थिक संकटाशी झुंजत आहे. आज बँकेजवळ शेतकºयांना कर्ज देण्यासाठीच नव्हे तर कर्मचाºयांचे पगार देण्यासाठीही पैसाच नाही. त्यामुळे केदारांकडील रक्कम त्वरित वसूल होणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :MONEYपैसा