शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

नागपूर जिल्हा बँकेचे १५६ कोटी केदार कधी परत करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 10:34 IST

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १५६ कोटी नुकसान सावनेरचे आमदार सुनील केदार कधी भरून देणार, हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १५६ कोटी नुकसान सावनेरचे आमदार सुनील केदार कधी भरून देणार, हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.सुनील केदार १९९९ ते २०१२ या काळात नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. या काळात केदार यांनी सरकारी कर्जरोख्यांमध्ये बँकेचे पैसे गुंतविण्याचा सपाटा लावला. २००२ च्या जानेवारी महिन्यात केदार यांनी पाच शेअर दलाल कंपन्यांना १२४.६० कोटी कर्जरोखे घेण्यासाठी दिले. दलालांनी बँकेला हे कर्जरोखे दिले नाही व शेवटी केदारांच्या अव्यापारेषू उपद्व्यापामुळे नागपूर जिल्हा बँक बंद पडायच्या बेतात आहे.या घोटाळ्यासाठी ३ मे २००२ रोजी केदार यांना सीआयडीने अटकही केली होती व ९ आॅगस्ट २००२ पर्यंत केदार नागपूरच्या जेलमध्ये होते. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. या रोखे घोटाळ्याचा तपास करून सीआयडीने सुनील केदार, जिल्हा बँकेचे महाव्यवस्थापक अशोक चौधरी, लेखा अधिकारी सुरेश पेशकर, होम ट्रेड सिक्युरिटीज वाशीचे अध्यक्ष संजय अग्रवाल, संचालक सुबोध भंडारी, गिल्टराज मॅनेजमेंटचे अध्यक्ष केतन सेठ, सिंडीकेट मॅनेजमेंटचे संचालक अमित वर्मा, सेंच्युरी डीलर्सचे संचालक श्रीप्रकाश पोद्दार, इंद्रमणी मर्चंटस्चे संचालक महेंद्र अग्रवाल, होम ट्रेडचे कंपनी सेक्रेटरी एन. एस. त्रिवेदी व होम ट्रेडच्या गुंतवणूक अधिकारी कन्नन मेवावाला, अशा ११ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. गेल्या १७ वर्षांपासून हा खटला न्यायदंडाधिकारी कोर्टात प्रलंबित आहे.या महाघोटाळ्याची चौकशी सहकार खात्याचे विशेष अंकेक्षक यशवंत बागडे यांनी केदार यांच्या दबावाला न जुमानता पूर्ण केली. सुनील केदार हे या घोटाळ्यासाठी पूर्णत: जबाबदार असल्याने त्यांच्याकडून १५६ कोटी व २००२ पासून आजपर्यंतचे १२ टक्के दरसाल व्याज वसूल करावे, असा आदेश दिला आहे. आज ही रक्कम ४०० कोटीपेक्षा अधिक झाली आहे.सुनील केदारांच्याच सावनेर मतदार संघातील कार्यकर्ते ओमप्रकाश कामडी यांनी हा खटला दररोज सुनावणी घेऊन केदार यांच्याकडून १५६ कोटी व व्याज वसूल करावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने हा खटला एक महिन्यात निकाली काढावा, असा आदेश मे २०१९ मध्ये दिला आहे. एवढे होऊनही केदारांविरुद्धचा खटला न्यायदंडाधिकारी कोर्टात दररोज सुनावणीसाठी आला नाही. आता गेल्या १७ वर्षांत हा खटला चालविणाऱ्या सर्व न्यायदंडाधिकाऱ्यांविरुद्ध कोर्टाचा अवमान केल्याची कारवाई होणार असल्याची चर्चा आहे.दरम्यान, २००२ सालापासून नागपूर जिल्हा बँक आर्थिक संकटाशी झुंजत आहे. आज बँकेजवळ शेतकºयांना कर्ज देण्यासाठीच नव्हे तर कर्मचाºयांचे पगार देण्यासाठीही पैसाच नाही. त्यामुळे केदारांकडील रक्कम त्वरित वसूल होणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :MONEYपैसा