शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

श्रीदेवी जेव्हा नागपूर जिल्ह्यातील काटोलला येते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 09:23 IST

मुझे गांव देखना हैं...असे म्हणत श्रीदेवीने ते निमंत्रण स्वीकारले आणि गावाच्या या ओढीत तिने काटोल गाठलेदेखील.

ठळक मुद्देमुझे गांव देखना है..काटोल येथील बक्षीस समारंभ आटोपल्यानंतर श्रीदेवी यांनी तेथे उपस्थित ग्रामीण महिलांशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्या स्वत: चालत महिलांकडे गेल्या. त्यांच्याशी हिंदीतून हितगूज केले. त्यांच्या जीवनपद्धतीविषयी जाणून घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्रीदेवी, राणी होती बॉलिवूडची. पैसा आणि प्रसिद्धीचा झगमगाट रात्रंदिवस अनुभवायची ती. पण, या झगमगाटाच्या पल्याड एक विरक्त कोपरा होता. जो दिसत नव्हता प्रेक्षकांना पडद्यावर. तो केवळ तिलाच जाणवायचा. या कोपऱ्यात ती, तिचे चौकोनी घर, जंगल, पहाड, नदी, गाव अन् मनशांतीची अनासक्त ओढ नांदायची. म्हणूनच नागपूरजवळच्या काटोलसारख्या छोट्या गावचे निमंत्रण मिळाले तेव्हा नकारासाठी तिच्याकडे कारणच नव्हते.मुझे गांव देखना हैं...असे म्हणत श्रीदेवीने ते निमंत्रण स्वीकारले आणि गावाच्या या ओढीत तिने काटोल गाठलेदेखील. आख्यायिका ठरावी इतकी प्रसिद्धी लाभलेली ही देखणी अन् हसरी अभिनेत्री काल हे जग सोडून गेली आणि तिच्या नागपूर-काटोल भेटीच्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. ही आठवण २००४ ची आहे. त्यांना ग्रामीण महिलांची मराठी नीट कळत नव्हती. पण, त्या महिलांच्या डोळ्यातील भाव त्या समजून घेण्याचा प्रयत्न करीत होत्या, हा किस्साही अनिल देशमुखांनी आवर्जून सांगितला.जेवण साधेच हवेश्रीदेवी ही मोठी अभिनेत्री आहे. तिच्या आदरातिथ्यात काही कमी राहू नये म्हणून देशमुख कुटुंबाने जय्यत तयारी केली होती. मांसाहारी व शाकाहारी दोन्ही प्रकारच्या व्यंजनाचा बेत होता. श्रीदेवी प्रत्यक्ष जेवायला बसल्या तेव्हा काय वाढायचे त्यांना विचारण्यात आले. परंतु त्यांनी पोळी, वरण, भात आणि भाजी असे साधे जेवण मागितले. आमच्या कुटुंबातील प्रत्येकाशी त्या खूपच जिव्हाळ्याने बोलल्या. तेव्हा प्रचंड स्टारडम लाभलेल्या या अभिनेत्रीच्या आतील एका साध्या स्त्रीचा अनुभव मला आला, अशा शब्दात माजी मंत्री अनिल देशमुख यांनी श्रीदेवींच्या नागपूर भेटीची आठवण सांगितली.त्यावेळी काटोल येथे विदर्भ यूथच्या अनुप खराडे यांनी महिलांची अखिल भारतीय खो-खो स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला श्रीदेवी यांनी यावे, असे त्यांना वाटत होते. राज्य सरकारमधील तत्कालीन मंत्री अनिल देशमुख यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. याआधी ते चारपाचदा श्रीदेवींशी भेटले होते. त्यामुळे परिचय होताच. त्यांनी श्रीदेवींना याबाबत विचारले आणि गाव जवळून बघायला मिळणार या आनंदाने तिने हे निमंत्रण स्वीकारले. या निमित्ताने ती पहिल्यांदा नागपुरात आली. काटोलला रवाना होण्याआधी अनिल देशमुखांच्या बंगल्यावर थांबली. हे त्यांच्या चाहत्यांना कळताच श्रीदेवींची एक झलक पाहायसाठी नागपूरकरांनी मोठी गर्दी केली होती. ज्यांनी त्यावेळेस या आरस्पानी सौंदर्यवतीला पाहिले होते त्या नागपूरकरांना तिच्या अशा अकाली जाण्याने मोठा धक्का बसला.

टॅग्स :bollywoodबॉलिवूड