शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ओपीडीचा गोंधळ संपणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:49 IST

रुग्णांची वाढती संख्या व रुग्ण हिताला प्राधान्य देऊन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध विभागांच्या बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) दिवस बदलविण्यात आले. तसेच सोईसाठी ओपीडीच्या रचनेतही बदल करण्यात आले. परंतु रुग्ण संख्येत वाढ झाल्याने ओपीडीची जागा अपुरी पडत आहे. नोंदणी कक्षाची रांग, तपासणीच्या प्रतीक्षेत बसलेले रुग्ण आणि औषधे घेणाऱ्यांची लांबच लाब रांग एकाच ठिकाणी येत असल्याने गोंधळ उडत आहे. विशेष म्हणजे, गंभीर आजाराच्या रुग्णांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागत आहे.

ठळक मुद्देअपुरी जागा ठरत आहे कारण : रुग्णांना तासन्तास रहावे लागते रांगेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्णांची वाढती संख्या व रुग्ण हिताला प्राधान्य देऊन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध विभागांच्या बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) दिवस बदलविण्यात आले. तसेच सोईसाठी ओपीडीच्या रचनेतही बदल करण्यात आले. परंतु रुग्ण संख्येत वाढ झाल्याने ओपीडीची जागा अपुरी पडत आहे. नोंदणी कक्षाची रांग, तपासणीच्या प्रतीक्षेत बसलेले रुग्ण आणि औषधे घेणाऱ्यांची लांबच लाब रांग एकाच ठिकाणी येत असल्याने गोंधळ उडत आहे. विशेष म्हणजे, गंभीर आजाराच्या रुग्णांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागत आहे.मध्यभारतात केवळ नागपुरात सुपर स्पेशालिटी हॉपिटल आहे. यामुळे विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. सध्या या हॉस्पिटलमधून हृदय शल्यचिकित्सा, (सीव्हीटीएस), हृदयरोग (कार्डिओलॉजी), मेंदूरोग (न्यूरोलॉजी), मज्जातंतूची शल्यक्रिया (न्युरोसर्जरी), मूत्रपिंड विकार (नेफ्रालॉजी), मूत्र रोग (युरोलॉजी), पोटाचे विकार (गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी) व ‘एन्डोक्रेनॉलॉजी’ अशा आठ विभागातून रुग्णसेवा दिली जाते. परंतु या विभागाच्या बाह्यरुग्णाची (ओपीडी) वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत असल्याने आणि प्रत्येक विभागाच्या ओपीडी आठवड्यातून दोनच दिवस असल्याने त्या-त्या दिवशी रुग्णांची प्रचंड गर्दी होते. एखाद्या दिवसाला शासकीय सुटी आल्यास त्या विभागाच्या दुसऱ्या दिवसाला तर बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरात पाय ठेवायला जागा राहत नाही. जसे, सोमवारी महाशिवरात्रीची सुटी आल्याने गुरुवार ७ मार्च रोजी रुग्ण व नातेवाईकांची प्रचंड गर्दी उसळली. औषधांसाठी लागणारी रांग ‘सिटी स्कॅन’ विभागापर्यंत पोहचली होती तर नोंदणी कार्ड काढणाऱ्यांची रांग ही खासगी औषधालयापर्यंत लागली होती. ओपीडीची वेळ संपायला आली तरी रांग मात्र कायम होती. विशेष म्हणजे, औषधांच्या रांगेत ज्येष्ठ नागरिक व सामान्य नागरिकांची एकच रांग राहते. येथे बसण्याचीही सोय नाही. यामुळे रुग्णांना अडचणीचे जात आहे. याची जाणीव रुग्णालय प्रशासनाला आहे, परंतु काय उपाययोजना कराव्यात हा प्रश्न त्यांच्या समोरही असल्याचे दिसून येते.गंभीर रुग्णांना फटकारुग्णांची वाढती गर्दी लक्षात घेऊन व रुग्णहिताच्या दृष्टीने आठही विभागाचे ओपीडीचे दिवस बदलविण्यात आले. ओपीडीच्या रचनेतही बदल करण्यात आले. परंतु त्यानंतरही ओपीडीची जागा अपुरी पडत आहे. एकाच ठिकाणी रुग्णांची गर्दी वाढल्याने कुणाचा नंबर आला याची माहिती रुग्णांपर्यंत पोहचत नाही. परिणामी, रुग्णारुग्णांमध्ये भांडणे वाढली आहेत. गंभीर रुग्णांना याचा फटका बसत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnagpurनागपूर