शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ओपीडीचा गोंधळ संपणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:49 IST

रुग्णांची वाढती संख्या व रुग्ण हिताला प्राधान्य देऊन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध विभागांच्या बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) दिवस बदलविण्यात आले. तसेच सोईसाठी ओपीडीच्या रचनेतही बदल करण्यात आले. परंतु रुग्ण संख्येत वाढ झाल्याने ओपीडीची जागा अपुरी पडत आहे. नोंदणी कक्षाची रांग, तपासणीच्या प्रतीक्षेत बसलेले रुग्ण आणि औषधे घेणाऱ्यांची लांबच लाब रांग एकाच ठिकाणी येत असल्याने गोंधळ उडत आहे. विशेष म्हणजे, गंभीर आजाराच्या रुग्णांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागत आहे.

ठळक मुद्देअपुरी जागा ठरत आहे कारण : रुग्णांना तासन्तास रहावे लागते रांगेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्णांची वाढती संख्या व रुग्ण हिताला प्राधान्य देऊन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध विभागांच्या बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) दिवस बदलविण्यात आले. तसेच सोईसाठी ओपीडीच्या रचनेतही बदल करण्यात आले. परंतु रुग्ण संख्येत वाढ झाल्याने ओपीडीची जागा अपुरी पडत आहे. नोंदणी कक्षाची रांग, तपासणीच्या प्रतीक्षेत बसलेले रुग्ण आणि औषधे घेणाऱ्यांची लांबच लाब रांग एकाच ठिकाणी येत असल्याने गोंधळ उडत आहे. विशेष म्हणजे, गंभीर आजाराच्या रुग्णांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागत आहे.मध्यभारतात केवळ नागपुरात सुपर स्पेशालिटी हॉपिटल आहे. यामुळे विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. सध्या या हॉस्पिटलमधून हृदय शल्यचिकित्सा, (सीव्हीटीएस), हृदयरोग (कार्डिओलॉजी), मेंदूरोग (न्यूरोलॉजी), मज्जातंतूची शल्यक्रिया (न्युरोसर्जरी), मूत्रपिंड विकार (नेफ्रालॉजी), मूत्र रोग (युरोलॉजी), पोटाचे विकार (गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी) व ‘एन्डोक्रेनॉलॉजी’ अशा आठ विभागातून रुग्णसेवा दिली जाते. परंतु या विभागाच्या बाह्यरुग्णाची (ओपीडी) वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत असल्याने आणि प्रत्येक विभागाच्या ओपीडी आठवड्यातून दोनच दिवस असल्याने त्या-त्या दिवशी रुग्णांची प्रचंड गर्दी होते. एखाद्या दिवसाला शासकीय सुटी आल्यास त्या विभागाच्या दुसऱ्या दिवसाला तर बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरात पाय ठेवायला जागा राहत नाही. जसे, सोमवारी महाशिवरात्रीची सुटी आल्याने गुरुवार ७ मार्च रोजी रुग्ण व नातेवाईकांची प्रचंड गर्दी उसळली. औषधांसाठी लागणारी रांग ‘सिटी स्कॅन’ विभागापर्यंत पोहचली होती तर नोंदणी कार्ड काढणाऱ्यांची रांग ही खासगी औषधालयापर्यंत लागली होती. ओपीडीची वेळ संपायला आली तरी रांग मात्र कायम होती. विशेष म्हणजे, औषधांच्या रांगेत ज्येष्ठ नागरिक व सामान्य नागरिकांची एकच रांग राहते. येथे बसण्याचीही सोय नाही. यामुळे रुग्णांना अडचणीचे जात आहे. याची जाणीव रुग्णालय प्रशासनाला आहे, परंतु काय उपाययोजना कराव्यात हा प्रश्न त्यांच्या समोरही असल्याचे दिसून येते.गंभीर रुग्णांना फटकारुग्णांची वाढती गर्दी लक्षात घेऊन व रुग्णहिताच्या दृष्टीने आठही विभागाचे ओपीडीचे दिवस बदलविण्यात आले. ओपीडीच्या रचनेतही बदल करण्यात आले. परंतु त्यानंतरही ओपीडीची जागा अपुरी पडत आहे. एकाच ठिकाणी रुग्णांची गर्दी वाढल्याने कुणाचा नंबर आला याची माहिती रुग्णांपर्यंत पोहचत नाही. परिणामी, रुग्णारुग्णांमध्ये भांडणे वाढली आहेत. गंभीर रुग्णांना याचा फटका बसत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnagpurनागपूर