शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कन्हैयाकुमार कार्यकर्त्यांवरच संतापतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 18:21 IST

मानकापूर क्रीडा संकुलात आयोजित ‘संविधान जागर’कार्यक्रमासाठी नागपुरात आलेला जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार हा तसा तर विद्यार्थी चळवळीत समोर आलेला आहे. मात्र बहुतेक प्रसिद्धी मिळत असल्याने तो तळागाळातील जुळलेल्या कार्यकर्त्यांहून स्वत:ला मोठा समजायला लागला आहे. नागपुरात याचेच प्रत्यंतर आहे. न झालेल्या पत्रकारेच्या ठिकाणी त्याच्या सुरक्षेसाठी कडे केलेल्या कार्यकर्त्यांवरच तो केवळ धक्का लागला म्हणून संतापला. त्याच्या रौद्रावतारामुळे कार्यकर्तेदेखील अचंबित झाले.

ठळक मुद्देप्रसार माध्यमांशी बोलणे टाळले : रौद्रावतारामुळे कार्यकर्तेदेखील अचंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानकापूर क्रीडा संकुलात आयोजित ‘संविधान जागर’कार्यक्रमासाठी नागपुरात आलेला जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार हा तसा तर विद्यार्थी चळवळीत समोर आलेला आहे. मात्र बहुतेक प्रसिद्धी मिळत असल्याने तो तळागाळातील जुळलेल्या कार्यकर्त्यांहून स्वत:ला मोठा समजायला लागला आहे. नागपुरात याचेच प्रत्यंतर आहे. न झालेल्या पत्रकारेच्या ठिकाणी त्याच्या सुरक्षेसाठी कडे केलेल्या कार्यकर्त्यांवरच तो केवळ धक्का लागला म्हणून संतापला. त्याच्या रौद्रावतारामुळे कार्यकर्तेदेखील अचंबित झाले.वास्तविक नियोजित कार्यक्रम पत्रिकेत दुपारी १ वाजता पत्रकार परिषद व जेवणाची वेळ नमूद होती. परंतु एक तास उशिरा पोहचल्यानंतरही कन्हैयाने ऐनवेळी प्रसार माध्यमांशी बोलण्याला साफ इन्कार केला. संबंधित कार्यालयात गर्दीमुळे एका कार्यकर्त्याचा धक्का लागल्याने कन्हैया त्याच्यावर संतापला. त्याच्यापासून दूर राहण्यास बजावले. कन्हैयाची वागणूक बघून त्याला भेटण्यासाठी आलेले कार्यकर्ते, समर्थक व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी अचंबित झाले. सर्वांना एका युवा नेत्याकडून अशा वर्तणुकीची अपेक्षा नव्हती. चळवळीतून आलेला हा नेता एका छोट्या कारणामुळे त्याच्याच विचारधारेच्या कार्यकर्त्यांवर ओरडतो हे चुकीचे आहे, अशी संतप्त भावना तेथे उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.कन्हैयाकुमारच्या नागपूर दौऱ्याचा कार्यक्रम भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आधीच निश्चित केला होता. त्यानुसार दुपारी १ ते २ वाजेदरम्यान बजाजनगर येथील लॉनमध्ये पत्रकार परिषद व जेवण करणार होता.कन्हैयाची पत्रकार परिषद असल्याने प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी दुपारी १ च्या सुमारास एका सामाजिक संस्थेच्या कार्यालयात पोहचले. मात्र कन्हैयाने आयोजकांवरच नाराजी व्यक्त करत प्रसार माध्यमांशी बोलण्याला साफ नकार दिला. वास्तविक आयोजकांनी निर्धारित कार्यक्रमात पत्रकार परिषदेचा समावेश असल्याने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले होते. कन्हैयामुळे आयोजकांचीही कोंडी झाली. पत्रकारांना कन्हैयाची एक तास प्रतीक्षा करावी लागली. दुपारी २ च्या सुमारास उशिरा पोहचूनही बोलण्यास नकार दिल्याने पत्रकारांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारnagpurनागपूर