शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

सिंचन कॅनल्स कधीपर्यंत पूर्ण करता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 21:52 IST

विदर्भात सध्या कोणकोणत्या सिंचन कॅनल्सचे बांधकाम अपूर्ण आहे व ते बांधकाम कधीपर्यंत पूर्ण केले जाईल अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली असून यावर उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून ८ आॅगस्टपर्यंत वेळ दिला आहे. तसेच, २०१४ पासून आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कृषी पंप व वीज जोडण्या दिल्या आणि किती शेतकऱ्यांचे याबाबतचे अर्ज प्रलंबित आहेत याची माहितीही न्यायालयाने सरकारला मागितली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : सरकारला उत्तरासाठी दिली शेवटची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात सध्या कोणकोणत्या सिंचन कॅनल्सचे बांधकाम अपूर्ण आहे व ते बांधकाम कधीपर्यंत पूर्ण केले जाईल अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली असून यावर उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून ८ आॅगस्टपर्यंत वेळ दिला आहे. तसेच, २०१४ पासून आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कृषी पंप व वीज जोडण्या दिल्या आणि किती शेतकऱ्यांचे याबाबतचे अर्ज प्रलंबित आहेत याची माहितीही न्यायालयाने सरकारला मागितली आहे.न्यायालयाने वर्तमानपत्रांतील बातम्यांची दखल घेऊन विदर्भातील कृषी अनुशेषाविषयी २०१४ मध्ये स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. परंतु, या प्रकरणात सरकारने अद्याप समाधानकारक उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. याचिकेतील सर्व प्रश्न जनहिताचे आहेत. सरकारने त्याला विरोध करण्यास काहीच अर्थ नाही. उलट सरकारने हे प्रश्न कधीपर्यंत सोडवल्या जातील यावर भूमिका स्पष्ट करायला हवी असे मतही न्यायालयाने व्यक्त केले. तसेच, वरीलप्रमाणे आदेश दिला. विदर्भात ६५ टक्के वीजनिर्मिती होत असली तरी, येथील शेतीला केवळ १४ टक्के वीज मिळते. नागपूर विभागात १०.९० तर, अमरावती विभागात १७.३७ टक्के क्षेत्रालाच वीज पुरवठा होतो. पुणेमध्ये २०.२८ तर, नाशिकमध्ये २०.२८ टक्के क्षेत्रात वीज पुरवठा आहे. हजार हेक्टर कृषीक्षेत्रामागे वीज वापरण्याचे प्रमाण पाहिल्यास पुणे (१८२४.६५ युनिटस्) आघाडीवर आहे. त्यानंतर नाशिक (१७८७.९८ युनिटस्) व मराठवाड्याचा (१०८९.१८ युनिटस्) क्रमांक लागतो. अमरावती विभागात ७०० तर, नागपूर विभागात ४९९.२० युनिटस्चा वापर आहे असा दावा बातम्यांत करण्यात आला होता.कृषिपंपांचा अनुशेष२०१४ पर्यंत विदर्भात ६ लाख ९० हजार ५३१ कृषिपंपांचा अनुशेष होता. कृषिपंप जोडणीचे अर्ज पैसे भरूनही प्रलंबित ठेवण्यात येतात. मार्च २०१४ पर्यंत एकूण ६५ हजार ६४८ अर्ज प्रलंबित होते. त्यापैकी ५५ हजार ४४३ अर्जदारांना पैसे भरूनही जोडणी देण्यात आली नव्हती. २०१३-१४ मध्ये विदर्भात केवळ २५ हजार ८५९ कृषिपंपाना जोडणी देण्यात आली होती.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प