शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

नागपूर जिल्ह्यातील खऱ्या गरजूंना घरकुलाचा लाभ कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 11:08 IST

उपेक्षित व खऱ्या गरजू कुटुंबांना घरकूल योजनेत शासनाकडून आर्थिक लाभ मिळण्यात प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष काहींना दुहेरी लाभ; गरजूंची प्रतीक्षा कायम

अशोक हटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपेक्षित व खऱ्या गरजू कुटुंबांना घरकूल योजनेत शासनाकडून आर्थिक लाभ मिळण्यात प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अन्यायग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून सन २०११ मध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाने खऱ्या गरजू लोकांची यादी तयार करण्यासाठी शिक्षकांवर जबाबदारी टाकली व सर्वेक्षण केले. मात्र या यादीतही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांचे नाव नसल्याने खरेच हा सर्वे योग्य पद्धतीने झाला काय, हा प्रश्न आहे. दुसरीकडे काहींना दुहेरी लाभ मिळाल्याने सर्वे चुकीचा व खऱ्या गरजूंवर अन्याय करणाराच झाल्याचे सिद्ध होते. त्यामुळे खऱ्या, उपेक्षितांना न्याय देण्यासाठी पुन्हा जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.अडेगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत कथलाबोडी येथील रहिवासी चंद्रभान कवडूजी कडू दारिद्र्य रेषेखालील यादीमध्ये १५ व्या क्रमांकावर आहेत. त्यांचा फॅमिली आयडी ३२०९ आहे. हे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहे. या कुटुंबीयांनी वारंवार ग्रामसभेत आपल्या हक्काचा विषय ठेवत न्याय देण्याची मागणी केली. या अनुषंगाने ग्रामसभेचा ठराव पंचायत समिती मौदा व ग्रामीण विकास यंत्रणा नागपूर यांना पाठविण्यात आला, अशी माहिती सचिव दर्शना गायकवाड यांनी दिली.परंतु अद्याप त्याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. यावर्षी मार्च २०१८ पर्यंत ५०० घरकुलांचे उद्दिष्ट आहे. मात्र या यादीतदेखील खरे गरजू व दारिद्र्य रेषेखालील कुटुंब वंचित आहे. पंतप्रधान आवास योजनेतही सन २०११ च्या यादीचा विचार करण्यात आला आहे. तर ही यादी खºया गरजूंवर अन्याय करणारी ठरत असल्याने घरकूल योजनेची पुन्हा जबाबदारी निश्चित करून गावकऱ्यांच्या उपस्थितीत यादी करण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

रमाई आवास योजनेतून लाभ द्या!आदिवासींना शबरी योजने अंतर्गत घरकूल देऊन सदर यादीतील भार कमी करण्यात यावा. तसेच रमाई आवास योजनेतून अनुसूचित जाती कुटुंबांना लाभ देण्यात यावा, अशी मागणीही नागरिकांनी केली असून पुन्हा गावकऱ्यांच्या समक्ष सर्वेक्षण करून गरजू लाभार्थ्यांना न्याय देण्यात यावा, अशी वंचित लाभार्थ्यांची मागणी आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास