शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

४२ आदिवासी जेव्हा नागपुरात एकविसाव्या शतकाची झलक पाहतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 19:32 IST

नागपूरच्या मोठ्या सिमेंटरोडवून वेगाने धावणाऱ्या गाड्या, रस्त्याच्या कडेला असलेले मोठाले होर्डिंग्ज, चकाकणारी दुकाने, अत्याधुनिक कपडे घातलेली तरुणाई.. किती पाहू न् किती नाही..

ठळक मुद्देलोकबिरादरी प्रकल्पाचा उपक्रमशहरातील चकाकी व गतीमान गाड्यांना पाहून डोळे विस्फारलेरस्ता ओलांडणे अवघड

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:

काय काय डोळ््यात साठवून ठेवावे आणि काय काय लक्षात ठेवावे... जीव नुसता धाकधूक होतोय.. भिती वाटतेय आणि पहावेसेही वाटतेय... मेट्रो रेल्वेच्या थंडगार डब्यात त्याची भिरभिरती अचंबित नजर कुठेच ठरत नाहीये...हा प्रसंग आहे, मंगळवारी संध्याकाळी नागपुरात येऊन दाखल झालेल्या आदिवासींचा. गडचिरोली जिल्ह्यातल्या आलापल्ली तालुक्याच्या बेजोर गावातील ४२ आदिवासी स्त्रीपुरुष नागपूर पहाण्यासाठी आले आहेत. आपल्या गावापासून काही अंतरावर असलेली अन्य गावे तसेच आलापल्ली आणि अहेरी ही तालुक्याची दोन ठिकाणे वगळता या आदिवासींनी काहीही पाहिलेलं नाही. घनदाट जंगलापलिकडचं जग कसं आहे, त्यात काय काय घडत असतं, हे आदिवासींना समजावं यासाठी भामरागडमधील हेमलकसा येथे असलेल्या डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदा आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाने गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबविला आहे. दोन गावांमधील आदिवासींना नागपूर शहरात दोन दिवसांसाठी नेऊन तेथील काही महत्त्वाची ठिकाणे दाखविली जातात.रेल्वेगाडीचे प्रचंड कुतूहलआदिवासींना रेल्वेगाडीचे अत्याधिक कुतूहल असते. बसगाड्या, विमाने यांचेही त्यांना आकर्षण आहे. या भेटीत ते रेल्वे स्टेशन, बसस्टँड, विमानतळ, मॉल आदी ठिकाणांना भेटी देणार आहेत. नागपुरात दाखल होताच त्यांना दीक्षाभूमीवर नेण्यात आले. तेथून गोवारी स्मारकाला भेट दिली व मेट्रो रेल्वेची प्रतिकृतीही त्यांनी पाहिली. चौकातून रस्ता क्रॉस करताना त्यांची धावपळ पाहून वाहनचालक स्वत:हूनच वेग आवरत त्यांना जाण्यासाठी वाट करून देत होते.४२ जणांच्या या ग्रूपमध्ये ७ वर्षांची लहान मुलगी आहे आणि साठी ओलांडलेले आजोबाही आहेत. केये कुंडी आत्राम, गोंगलू लच्छू दुवी, गिस्सू पुसू आत्राम, रैनू चुक्कू मुळमा, सोमा रामा तेलामी, भिंगरी नरंगो आत्राम, राजे दसरू आत्राम यांच्यासह त्यांचे अन्य सोबती आहेत.कसं वाटलं नागपूर?या प्रश्नाला सध्या कोणतेच उत्तर त्यांना सुचत नाहीये.. मंत्रमुग्ध अवस्थेतून बाहेर आल्यावर किंवा गावी परत गेल्यावर ते कदाचित अनुभव व्यक्त करू शकतील. मात्र एक गोष्ट नक्की घडेल, आता येणाºया पिढीला सांगायला त्यांच्याजवळ निश्चितच काहीतरी वेगळं असेल. त्यांच्या रोजच्या जगण्यात काही बदल करता येईल काय, असा विचार त्यांच्या मनात येऊ शकेल.. कदाचित तो बदल शेतीतला असेल, शिक्षणातला असेल किंवा मासेमारीतला असेल.. बदलाचे एक बीज तर नक्कीच रुजले जाईल.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना