शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

४२ आदिवासी जेव्हा नागपुरात एकविसाव्या शतकाची झलक पाहतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 19:32 IST

नागपूरच्या मोठ्या सिमेंटरोडवून वेगाने धावणाऱ्या गाड्या, रस्त्याच्या कडेला असलेले मोठाले होर्डिंग्ज, चकाकणारी दुकाने, अत्याधुनिक कपडे घातलेली तरुणाई.. किती पाहू न् किती नाही..

ठळक मुद्देलोकबिरादरी प्रकल्पाचा उपक्रमशहरातील चकाकी व गतीमान गाड्यांना पाहून डोळे विस्फारलेरस्ता ओलांडणे अवघड

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:

काय काय डोळ््यात साठवून ठेवावे आणि काय काय लक्षात ठेवावे... जीव नुसता धाकधूक होतोय.. भिती वाटतेय आणि पहावेसेही वाटतेय... मेट्रो रेल्वेच्या थंडगार डब्यात त्याची भिरभिरती अचंबित नजर कुठेच ठरत नाहीये...हा प्रसंग आहे, मंगळवारी संध्याकाळी नागपुरात येऊन दाखल झालेल्या आदिवासींचा. गडचिरोली जिल्ह्यातल्या आलापल्ली तालुक्याच्या बेजोर गावातील ४२ आदिवासी स्त्रीपुरुष नागपूर पहाण्यासाठी आले आहेत. आपल्या गावापासून काही अंतरावर असलेली अन्य गावे तसेच आलापल्ली आणि अहेरी ही तालुक्याची दोन ठिकाणे वगळता या आदिवासींनी काहीही पाहिलेलं नाही. घनदाट जंगलापलिकडचं जग कसं आहे, त्यात काय काय घडत असतं, हे आदिवासींना समजावं यासाठी भामरागडमधील हेमलकसा येथे असलेल्या डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदा आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाने गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबविला आहे. दोन गावांमधील आदिवासींना नागपूर शहरात दोन दिवसांसाठी नेऊन तेथील काही महत्त्वाची ठिकाणे दाखविली जातात.रेल्वेगाडीचे प्रचंड कुतूहलआदिवासींना रेल्वेगाडीचे अत्याधिक कुतूहल असते. बसगाड्या, विमाने यांचेही त्यांना आकर्षण आहे. या भेटीत ते रेल्वे स्टेशन, बसस्टँड, विमानतळ, मॉल आदी ठिकाणांना भेटी देणार आहेत. नागपुरात दाखल होताच त्यांना दीक्षाभूमीवर नेण्यात आले. तेथून गोवारी स्मारकाला भेट दिली व मेट्रो रेल्वेची प्रतिकृतीही त्यांनी पाहिली. चौकातून रस्ता क्रॉस करताना त्यांची धावपळ पाहून वाहनचालक स्वत:हूनच वेग आवरत त्यांना जाण्यासाठी वाट करून देत होते.४२ जणांच्या या ग्रूपमध्ये ७ वर्षांची लहान मुलगी आहे आणि साठी ओलांडलेले आजोबाही आहेत. केये कुंडी आत्राम, गोंगलू लच्छू दुवी, गिस्सू पुसू आत्राम, रैनू चुक्कू मुळमा, सोमा रामा तेलामी, भिंगरी नरंगो आत्राम, राजे दसरू आत्राम यांच्यासह त्यांचे अन्य सोबती आहेत.कसं वाटलं नागपूर?या प्रश्नाला सध्या कोणतेच उत्तर त्यांना सुचत नाहीये.. मंत्रमुग्ध अवस्थेतून बाहेर आल्यावर किंवा गावी परत गेल्यावर ते कदाचित अनुभव व्यक्त करू शकतील. मात्र एक गोष्ट नक्की घडेल, आता येणाºया पिढीला सांगायला त्यांच्याजवळ निश्चितच काहीतरी वेगळं असेल. त्यांच्या रोजच्या जगण्यात काही बदल करता येईल काय, असा विचार त्यांच्या मनात येऊ शकेल.. कदाचित तो बदल शेतीतला असेल, शिक्षणातला असेल किंवा मासेमारीतला असेल.. बदलाचे एक बीज तर नक्कीच रुजले जाईल.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना