शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

४२ आदिवासी जेव्हा नागपुरात एकविसाव्या शतकाची झलक पाहतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 19:32 IST

नागपूरच्या मोठ्या सिमेंटरोडवून वेगाने धावणाऱ्या गाड्या, रस्त्याच्या कडेला असलेले मोठाले होर्डिंग्ज, चकाकणारी दुकाने, अत्याधुनिक कपडे घातलेली तरुणाई.. किती पाहू न् किती नाही..

ठळक मुद्देलोकबिरादरी प्रकल्पाचा उपक्रमशहरातील चकाकी व गतीमान गाड्यांना पाहून डोळे विस्फारलेरस्ता ओलांडणे अवघड

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:

काय काय डोळ््यात साठवून ठेवावे आणि काय काय लक्षात ठेवावे... जीव नुसता धाकधूक होतोय.. भिती वाटतेय आणि पहावेसेही वाटतेय... मेट्रो रेल्वेच्या थंडगार डब्यात त्याची भिरभिरती अचंबित नजर कुठेच ठरत नाहीये...हा प्रसंग आहे, मंगळवारी संध्याकाळी नागपुरात येऊन दाखल झालेल्या आदिवासींचा. गडचिरोली जिल्ह्यातल्या आलापल्ली तालुक्याच्या बेजोर गावातील ४२ आदिवासी स्त्रीपुरुष नागपूर पहाण्यासाठी आले आहेत. आपल्या गावापासून काही अंतरावर असलेली अन्य गावे तसेच आलापल्ली आणि अहेरी ही तालुक्याची दोन ठिकाणे वगळता या आदिवासींनी काहीही पाहिलेलं नाही. घनदाट जंगलापलिकडचं जग कसं आहे, त्यात काय काय घडत असतं, हे आदिवासींना समजावं यासाठी भामरागडमधील हेमलकसा येथे असलेल्या डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदा आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाने गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबविला आहे. दोन गावांमधील आदिवासींना नागपूर शहरात दोन दिवसांसाठी नेऊन तेथील काही महत्त्वाची ठिकाणे दाखविली जातात.रेल्वेगाडीचे प्रचंड कुतूहलआदिवासींना रेल्वेगाडीचे अत्याधिक कुतूहल असते. बसगाड्या, विमाने यांचेही त्यांना आकर्षण आहे. या भेटीत ते रेल्वे स्टेशन, बसस्टँड, विमानतळ, मॉल आदी ठिकाणांना भेटी देणार आहेत. नागपुरात दाखल होताच त्यांना दीक्षाभूमीवर नेण्यात आले. तेथून गोवारी स्मारकाला भेट दिली व मेट्रो रेल्वेची प्रतिकृतीही त्यांनी पाहिली. चौकातून रस्ता क्रॉस करताना त्यांची धावपळ पाहून वाहनचालक स्वत:हूनच वेग आवरत त्यांना जाण्यासाठी वाट करून देत होते.४२ जणांच्या या ग्रूपमध्ये ७ वर्षांची लहान मुलगी आहे आणि साठी ओलांडलेले आजोबाही आहेत. केये कुंडी आत्राम, गोंगलू लच्छू दुवी, गिस्सू पुसू आत्राम, रैनू चुक्कू मुळमा, सोमा रामा तेलामी, भिंगरी नरंगो आत्राम, राजे दसरू आत्राम यांच्यासह त्यांचे अन्य सोबती आहेत.कसं वाटलं नागपूर?या प्रश्नाला सध्या कोणतेच उत्तर त्यांना सुचत नाहीये.. मंत्रमुग्ध अवस्थेतून बाहेर आल्यावर किंवा गावी परत गेल्यावर ते कदाचित अनुभव व्यक्त करू शकतील. मात्र एक गोष्ट नक्की घडेल, आता येणाºया पिढीला सांगायला त्यांच्याजवळ निश्चितच काहीतरी वेगळं असेल. त्यांच्या रोजच्या जगण्यात काही बदल करता येईल काय, असा विचार त्यांच्या मनात येऊ शकेल.. कदाचित तो बदल शेतीतला असेल, शिक्षणातला असेल किंवा मासेमारीतला असेल.. बदलाचे एक बीज तर नक्कीच रुजले जाईल.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना