शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; महाविकासआघाडीचे सरकार विदर्भाला काय देणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 07:00 IST

यंदाचे हिवाळी अधिवेशन हे केवळ सहाच दिवस चालणार असल्याचे शासनातर्फे रविवारी स्पष्ट करण्यात आले. अशा स्थितीत अल्पकालीन अधिवेशनातून विदर्भाला नेमके काय मिळणार हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.

ठळक मुद्दे‘मिहान’, पायाभूत सुविधांना ‘बूस्ट’ मिळणार का? सहा दिवस वैदर्भीयांच्या नजरा शासनाकडेच, सरकारसमोर आव्हाने

योगेश पांडेनागपूर : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर विदर्भात प्रथमच होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाकडे राजकीय वर्तुळाप्रमाणेच वैदर्भीय जनतेच्यादेखील नजरा लागल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या महाविकासआघाडीच्या सरकारकडून विदर्भाला नेमके काय देणार असा प्रश्न वैदर्भियांच्या मनात आहे. अवघ्या सहा दिवसांच्या कालावधीत विदर्भातील शेतकरी व जनतेला न्याय देण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. ऐन अधिवेशनाच्या काही दिवसअगोदर झालेले खातेवाटप, मंत्र्यांना अभ्यासासाठी मिळालेला अत्यल्प वेळ व मंत्रीमंडळाचा रखडलेला विस्तार या पार्श्वभूमीवर जनतेच्या अपेक्षापुर्तीसंदर्भात सरकारसमोर अनेक आव्हाने राहणार आहेत. यंदाचे हिवाळी अधिवेशन हे केवळ सहाच दिवस चालणार असल्याचे शासनातर्फे रविवारी स्पष्ट करण्यात आले. वित्तमंत्री जयंत पाटील यांनीच ही घोषणा केली. अशा स्थितीत अल्पकालीन अधिवेशनातून विदर्भाला नेमके काय मिळणार हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मागील पाच वर्षांत नागपुरसह विदर्भात विविध विकासप्रकल्पांना सुरुवात झाली. या प्रकल्पांना नव्याने ‘बूस्टर डोज’ सरकारकडून मिळेल, अशी अपेक्षा आहे. ‘मिहान’मध्ये विविध कंपन्या आल्या आहेत. परंतु येथे गुंतवणूकदारांचा ओढा वाढेल यासंदर्भात सरकारने पावले उचलणे अपेक्षित आहे.नागपूर शहरातील ‘मेट्रो’चे काम गतीने सुरू असले तरी दुसऱ्या टप्पा पूर्ण होऊनदेखील सुरू झालेला नाही. सरकार नागपुरात असताना तरी हा टप्पा सुरू होईल, अशी जनतेला अपेक्षा आहे. मिहानमध्ये पतंजली, रिलायन्स व दसॉचा संयुक्त प्रकल्प सुरू झाला असला तरी येथे आणखी गुंतवणूक वाढावी यासाठी धोरण राबवावे लागणार आहे. अमरावतीत वस्त्रोद्योग पार्कला आणखी ‘बूस्ट’ सरकारकडून मिळेल ही तेथील उत्पादकांची अपेक्षा आहे.मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाकडे बळीराजाचे लक्षयंदा उशीरा आलेल्या पावसामुळे शेतकरी अगोदरच हवालदील झाले होते. त्यातच अवकाळी पावसाने विदर्भातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २५ हजारांची नुकसानभरपाई मिळणार का याकडे बळीराजाचे डोळे लागले आहेत. शेतकऱ्यांना आम्ही चिंतामुक्त करु असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरात आल्यानंतर दिले. त्यामुळे अधिवेशनकाळात सरसकट कर्जमाफीची घोषणा होणार की नाही हा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन