शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; महाविकासआघाडीचे सरकार विदर्भाला काय देणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 07:00 IST

यंदाचे हिवाळी अधिवेशन हे केवळ सहाच दिवस चालणार असल्याचे शासनातर्फे रविवारी स्पष्ट करण्यात आले. अशा स्थितीत अल्पकालीन अधिवेशनातून विदर्भाला नेमके काय मिळणार हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.

ठळक मुद्दे‘मिहान’, पायाभूत सुविधांना ‘बूस्ट’ मिळणार का? सहा दिवस वैदर्भीयांच्या नजरा शासनाकडेच, सरकारसमोर आव्हाने

योगेश पांडेनागपूर : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर विदर्भात प्रथमच होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाकडे राजकीय वर्तुळाप्रमाणेच वैदर्भीय जनतेच्यादेखील नजरा लागल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या महाविकासआघाडीच्या सरकारकडून विदर्भाला नेमके काय देणार असा प्रश्न वैदर्भियांच्या मनात आहे. अवघ्या सहा दिवसांच्या कालावधीत विदर्भातील शेतकरी व जनतेला न्याय देण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. ऐन अधिवेशनाच्या काही दिवसअगोदर झालेले खातेवाटप, मंत्र्यांना अभ्यासासाठी मिळालेला अत्यल्प वेळ व मंत्रीमंडळाचा रखडलेला विस्तार या पार्श्वभूमीवर जनतेच्या अपेक्षापुर्तीसंदर्भात सरकारसमोर अनेक आव्हाने राहणार आहेत. यंदाचे हिवाळी अधिवेशन हे केवळ सहाच दिवस चालणार असल्याचे शासनातर्फे रविवारी स्पष्ट करण्यात आले. वित्तमंत्री जयंत पाटील यांनीच ही घोषणा केली. अशा स्थितीत अल्पकालीन अधिवेशनातून विदर्भाला नेमके काय मिळणार हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मागील पाच वर्षांत नागपुरसह विदर्भात विविध विकासप्रकल्पांना सुरुवात झाली. या प्रकल्पांना नव्याने ‘बूस्टर डोज’ सरकारकडून मिळेल, अशी अपेक्षा आहे. ‘मिहान’मध्ये विविध कंपन्या आल्या आहेत. परंतु येथे गुंतवणूकदारांचा ओढा वाढेल यासंदर्भात सरकारने पावले उचलणे अपेक्षित आहे.नागपूर शहरातील ‘मेट्रो’चे काम गतीने सुरू असले तरी दुसऱ्या टप्पा पूर्ण होऊनदेखील सुरू झालेला नाही. सरकार नागपुरात असताना तरी हा टप्पा सुरू होईल, अशी जनतेला अपेक्षा आहे. मिहानमध्ये पतंजली, रिलायन्स व दसॉचा संयुक्त प्रकल्प सुरू झाला असला तरी येथे आणखी गुंतवणूक वाढावी यासाठी धोरण राबवावे लागणार आहे. अमरावतीत वस्त्रोद्योग पार्कला आणखी ‘बूस्ट’ सरकारकडून मिळेल ही तेथील उत्पादकांची अपेक्षा आहे.मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाकडे बळीराजाचे लक्षयंदा उशीरा आलेल्या पावसामुळे शेतकरी अगोदरच हवालदील झाले होते. त्यातच अवकाळी पावसाने विदर्भातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २५ हजारांची नुकसानभरपाई मिळणार का याकडे बळीराजाचे डोळे लागले आहेत. शेतकऱ्यांना आम्ही चिंतामुक्त करु असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरात आल्यानंतर दिले. त्यामुळे अधिवेशनकाळात सरसकट कर्जमाफीची घोषणा होणार की नाही हा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन