शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

खासदार महोत्सवात हेमामालिनीला नाचविण्याची गरजच काय होती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:58 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आयोजित केलेल्या खासदार महोत्सवात अभिनेत्री व जगप्रसिद्ध नृत्यांगना हेमामालिनी यांना नाचविण्याची गरजच काय होती, असा वादग्रस्त सवाल नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. ‘ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेस नागपूर चॅप्टर’ आणि नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित ‘नो युवर कॅन्डिडेट’ या कार्यक्रमात नाना पटोले यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले.

ठळक मुद्देपटोलेंची जीभ घसरली : मेट्रो रेल्वे व सिमेंट रस्त्यांमुळे नागपूरचा सत्यानाश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आयोजित केलेल्या खासदार महोत्सवात अभिनेत्री व जगप्रसिद्ध नृत्यांगना हेमामालिनी यांना नाचविण्याची गरजच काय होती, असा वादग्रस्त सवाल नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. ‘ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेस नागपूर चॅप्टर’ आणि नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित ‘नो युवर कॅन्डिडेट’ या कार्यक्रमात नाना पटोले यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले.नितीन गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी नागपूर येथे खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात जगप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना आणि अभिनेत्री खासदार हेमामालिनी यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचा संदर्भ घेत नाना पटोले यांनी ही टीका केली. मी निवडून आलो तर नागपूरचा सांस्कृतिक वारसा आणखी मजबूत करेन, असे पटोले म्हणाले. नितीन गडकरी नागपूरचे विकास पुरुष आहेत का, या प्रश्नावर पटोले म्हणाले, पाच वर्षांत शहराला खोदण्याचे काम केले. सिमेंट रस्त्यामुळे नागपूरचे तापमान ४ डिग्रीने वाढणार आहे. नागपुरात १.२० लाख लोकांना नोकऱ्या देण्याचे गडकरी यांचे आश्वासन फोल ठरले. लोकांना नोकऱ्या तर मिळाल्या नाहीत. नवीन उद्योग न येता मिहानमधील उद्योग बंद पडले. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उद्योग बंद झाले तर अनेकांचे रोजगार हिरावले. सिमेंट रस्त्यांमुळे मनपावर कर्जाचा डोंगर वाढला. त्यामुळे ९०० रुपयांचा प्रॉपर्टी कर ९ हजारांपर्यंत वाढला. पटोले म्हणाले, शहराला मेट्रो रेल्वेची गरज नव्हती. या प्रकल्पाच्या नावाखाली लोकांच्या मोक्याच्या जागा बळकावल्या. सत्तेवर आल्यास मेट्रो कंपनीसोबत झालेल्या कराराची चौकशी करणार आहे. शहरात २४ तास पिण्याचे पाणी मिळत नाही. केवळ बिल वाढले आहे. शहरात टँकरने पाणी पुरवठा होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ खून होत आहेत आणि शहरात बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. नागपुरात दहशत पसरली आहे. लोकांना भाजपचे सरकार नकोसे झाले आहे. लोकांच्या विश्वासावर निवडून येणार असल्याचा दावा पटोले यांनी केला.केंद्रातील मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. युवा शक्तीने राजकारणात यावे, असे सांगताना पटोले यांनी किती मतांनी निवडून येणार, यावर मात्र मौन बाळगले. ही मुलाखत ‘लोकमत’चे वाणिज्य संपादक सोपान पांढरीपांडे यांनी घेतली.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNana Patoleनाना पटोलेinterviewमुलाखत