शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

खासदार महोत्सवात हेमामालिनीला नाचविण्याची गरजच काय होती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:58 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आयोजित केलेल्या खासदार महोत्सवात अभिनेत्री व जगप्रसिद्ध नृत्यांगना हेमामालिनी यांना नाचविण्याची गरजच काय होती, असा वादग्रस्त सवाल नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. ‘ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेस नागपूर चॅप्टर’ आणि नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित ‘नो युवर कॅन्डिडेट’ या कार्यक्रमात नाना पटोले यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले.

ठळक मुद्देपटोलेंची जीभ घसरली : मेट्रो रेल्वे व सिमेंट रस्त्यांमुळे नागपूरचा सत्यानाश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आयोजित केलेल्या खासदार महोत्सवात अभिनेत्री व जगप्रसिद्ध नृत्यांगना हेमामालिनी यांना नाचविण्याची गरजच काय होती, असा वादग्रस्त सवाल नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. ‘ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेस नागपूर चॅप्टर’ आणि नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित ‘नो युवर कॅन्डिडेट’ या कार्यक्रमात नाना पटोले यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले.नितीन गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी नागपूर येथे खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात जगप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना आणि अभिनेत्री खासदार हेमामालिनी यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचा संदर्भ घेत नाना पटोले यांनी ही टीका केली. मी निवडून आलो तर नागपूरचा सांस्कृतिक वारसा आणखी मजबूत करेन, असे पटोले म्हणाले. नितीन गडकरी नागपूरचे विकास पुरुष आहेत का, या प्रश्नावर पटोले म्हणाले, पाच वर्षांत शहराला खोदण्याचे काम केले. सिमेंट रस्त्यामुळे नागपूरचे तापमान ४ डिग्रीने वाढणार आहे. नागपुरात १.२० लाख लोकांना नोकऱ्या देण्याचे गडकरी यांचे आश्वासन फोल ठरले. लोकांना नोकऱ्या तर मिळाल्या नाहीत. नवीन उद्योग न येता मिहानमधील उद्योग बंद पडले. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उद्योग बंद झाले तर अनेकांचे रोजगार हिरावले. सिमेंट रस्त्यांमुळे मनपावर कर्जाचा डोंगर वाढला. त्यामुळे ९०० रुपयांचा प्रॉपर्टी कर ९ हजारांपर्यंत वाढला. पटोले म्हणाले, शहराला मेट्रो रेल्वेची गरज नव्हती. या प्रकल्पाच्या नावाखाली लोकांच्या मोक्याच्या जागा बळकावल्या. सत्तेवर आल्यास मेट्रो कंपनीसोबत झालेल्या कराराची चौकशी करणार आहे. शहरात २४ तास पिण्याचे पाणी मिळत नाही. केवळ बिल वाढले आहे. शहरात टँकरने पाणी पुरवठा होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ खून होत आहेत आणि शहरात बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. नागपुरात दहशत पसरली आहे. लोकांना भाजपचे सरकार नकोसे झाले आहे. लोकांच्या विश्वासावर निवडून येणार असल्याचा दावा पटोले यांनी केला.केंद्रातील मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. युवा शक्तीने राजकारणात यावे, असे सांगताना पटोले यांनी किती मतांनी निवडून येणार, यावर मात्र मौन बाळगले. ही मुलाखत ‘लोकमत’चे वाणिज्य संपादक सोपान पांढरीपांडे यांनी घेतली.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNana Patoleनाना पटोलेinterviewमुलाखत