शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

खासदार महोत्सवात हेमामालिनीला नाचविण्याची गरजच काय होती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:58 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आयोजित केलेल्या खासदार महोत्सवात अभिनेत्री व जगप्रसिद्ध नृत्यांगना हेमामालिनी यांना नाचविण्याची गरजच काय होती, असा वादग्रस्त सवाल नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. ‘ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेस नागपूर चॅप्टर’ आणि नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित ‘नो युवर कॅन्डिडेट’ या कार्यक्रमात नाना पटोले यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले.

ठळक मुद्देपटोलेंची जीभ घसरली : मेट्रो रेल्वे व सिमेंट रस्त्यांमुळे नागपूरचा सत्यानाश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आयोजित केलेल्या खासदार महोत्सवात अभिनेत्री व जगप्रसिद्ध नृत्यांगना हेमामालिनी यांना नाचविण्याची गरजच काय होती, असा वादग्रस्त सवाल नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. ‘ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेस नागपूर चॅप्टर’ आणि नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित ‘नो युवर कॅन्डिडेट’ या कार्यक्रमात नाना पटोले यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले.नितीन गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी नागपूर येथे खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात जगप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना आणि अभिनेत्री खासदार हेमामालिनी यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचा संदर्भ घेत नाना पटोले यांनी ही टीका केली. मी निवडून आलो तर नागपूरचा सांस्कृतिक वारसा आणखी मजबूत करेन, असे पटोले म्हणाले. नितीन गडकरी नागपूरचे विकास पुरुष आहेत का, या प्रश्नावर पटोले म्हणाले, पाच वर्षांत शहराला खोदण्याचे काम केले. सिमेंट रस्त्यामुळे नागपूरचे तापमान ४ डिग्रीने वाढणार आहे. नागपुरात १.२० लाख लोकांना नोकऱ्या देण्याचे गडकरी यांचे आश्वासन फोल ठरले. लोकांना नोकऱ्या तर मिळाल्या नाहीत. नवीन उद्योग न येता मिहानमधील उद्योग बंद पडले. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उद्योग बंद झाले तर अनेकांचे रोजगार हिरावले. सिमेंट रस्त्यांमुळे मनपावर कर्जाचा डोंगर वाढला. त्यामुळे ९०० रुपयांचा प्रॉपर्टी कर ९ हजारांपर्यंत वाढला. पटोले म्हणाले, शहराला मेट्रो रेल्वेची गरज नव्हती. या प्रकल्पाच्या नावाखाली लोकांच्या मोक्याच्या जागा बळकावल्या. सत्तेवर आल्यास मेट्रो कंपनीसोबत झालेल्या कराराची चौकशी करणार आहे. शहरात २४ तास पिण्याचे पाणी मिळत नाही. केवळ बिल वाढले आहे. शहरात टँकरने पाणी पुरवठा होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ खून होत आहेत आणि शहरात बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. नागपुरात दहशत पसरली आहे. लोकांना भाजपचे सरकार नकोसे झाले आहे. लोकांच्या विश्वासावर निवडून येणार असल्याचा दावा पटोले यांनी केला.केंद्रातील मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. युवा शक्तीने राजकारणात यावे, असे सांगताना पटोले यांनी किती मतांनी निवडून येणार, यावर मात्र मौन बाळगले. ही मुलाखत ‘लोकमत’चे वाणिज्य संपादक सोपान पांढरीपांडे यांनी घेतली.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNana Patoleनाना पटोलेinterviewमुलाखत