शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; कशास काही नियम नुरला, कोण रोगी कोठे थुंकला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 11:13 IST

आज कोरोनाचा कहर सर्वांना घाबरवून सोडत आहे. तुकडोजी महाराजांनी संसर्गजन्य आजारांबद्दल १९५५ मध्ये लिहिलेल्या ‘ग्रामगीता’या ग्रंथातून जागृत केले आहे.

ठळक मुद्देकोरोनातही ‘ग्रामगीता’ भारी राष्ट्रसंतांनीही व्यक्त केली होती खंत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुठेही थुंकू नका, कुठेही आणि काहीही खाऊ नका, संसर्ग होईल, असे वागू नका, अशा सूचना आता आरोग्य विभागाकडून आणि सरकारकडून होत आहे. असे असले तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीता’ या ग्रंथामध्ये दिलेला इशारा आम्ही सारे विसरलो. राष्ट्रसंत म्हणतात,‘कशास काही नियम नुरला, कोण रोगी कोठे थुंकला?कोठे जेवला, संसर्गी आला, गोंधळ झाला सर्वत्र’कोरोना व्हायरसच्या दिवसात सारेच दहशतीत आले आहेत. स्वच्छतेवर आज भर दिला जात असला तरी ग्रामगीता या ग्रंथातूून सांगितलेले तत्त्वज्ञान समाजाने आचरणात आणले नाही. त्यामुळे आज कोरोनाचा कहर सर्वांना घाबरवून सोडत आहे. तुकडोजी महाराजांनी संसर्गजन्य आजारांबद्दल १९५५ मध्ये लिहिलेल्या ‘ग्रामगीता’या ग्रंथातून जागृत केले आहे.‘त्याने रोग प्रसार झाला, लागट रोग वाढतचि गेला,बळी घेतले हजारो लोकांला, वाढोनि साथ.’चीनमध्ये उगम पावलेला कोरोना जगभर पसरत आहे. जगाच्या पाठीवर हजारो माणसांचे प्राण या आजाराने गेले आहेत. भारतामध्ये आणि महाराष्ट्रतही पहिल्या टप्प्यातून हा आजार आता दुसऱ्या टप्प्यात सरकत आहे. तसेच आलेल्या आपत्तीपासून बचाव करण्याच्या धावपळीत सारे जग दिसत आहे. हे असे का घडले, याचा विचार करायलाही आज कुणाकडे वेळ नाही. कारण आलेली आपत्ती मोठी आहे. सरकार यातून जनतेला वाचविण्यासाठी परिश्रम करीत आहे. हे आज सुरू असले तरी तुकडोजी महाराजांनी याचे कारणही ग्रामगीतेमधून केव्हाचेच सांगितले आहे. माणसाच आचारविचार बिघडले, त्यामुळे रोगराईने शिरकाव केला. गाव असो किंवा शहर, माणसांचे आचरण बिघडले. वैचारिकतेत फरक पडला. यावर उपायही राष्ट्रसंतांनीच सांगितला आहे.‘गाव व्हावया निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एकएक घर,आणि त्याहूनि घरात राहणार, करावा लागेल आदर्श.प्रकृतीच्या विरुद्ध आहार, नाही काळवेळ सुमार,आंबट, तेलकट आदि विषम मिश्र, ऐसा आहार विषारी.’खानपानासंदर्भात आज जनजागरण केले जात आहे. माणसांचा आहार काय असावा, त्यात सात्त्विकता कशी असावी, याचे मार्गदर्शनहीमहाराजांनी ग्रामगीतेमधून केले आहे. सात्त्विक आहारातून निर्माण होणारे विचार आणि आचारही सात्त्विक असतात. त्यातून मिळाणारे निरोगी आरोग्य सर्वांच्याच हिताचे असले तरी ऐकतो कोण? म्हणूनच राष्ट्रसंत ग्रामगीतेतून सात्त्विक संतापही व्यक्त करतात.‘पहिले खावोनि मस्त व्हावे, मग औषधी घेवोनि पचवावे,ऐसे उपद्रव कायसासि करावे, उन्मततपणे?’निरोगी आयुष्यासाठी त्यांनी सांगितलेला मंत्र मोठा आहे. या ग्रंथाच्या ‘ग्राम निर्माण पंचक’ या चौदाव्या अध्यायातील ‘ग्राम आरोग्य’ या विषयावरील विवेचनात त्यांनी यावर उपायही सांगितला आहे.‘नियमित सात्त्विक अन्नचि खावे, साधे ताजे भाजीपाला बरवे,दूध, दही आपुल्या परी सेवावे, भोजना करावे औषधाची.निरोगी आयुष्य लाभेल बहुत, अल्पमृत्यू अथवा रोगाची साथ,हे पाऊल न ठेवतील गावात, तुकड्या म्हणे.’

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस