शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

स्वामीनाथन आयोगाची गरजच काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहेत, असे असताना स्वामीनाथन आयोग लागू केल्यास फक्त दीडपटच भाव मिळेल.

ठळक मुद्दे- तर सरकारच्या प्रयत्नाने मिळेल दुप्पट भाव : पाशा पटेल यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहेत, असे असताना स्वामीनाथन आयोग लागू केल्यास फक्त दीडपटच भाव मिळेल. दीडपटपेक्षा दोनपट नक्कीच जास्त असल्याने शेतकºयांच्या फायद्याचे काय राहील, असा प्रतिसवाल राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोमवारी नागपुरात आयोजित एका पत्रपरिषदेत केला.देशात स्वामीनाथन आयोग कधी लागू होणार, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता त्यांनी सरकार शेतकºयांसाठी करीत असलेल्या विविध धोरणांची माहिती दिली. केंद्र शासनाने कृषिमूल्य आयोगाने केलेल्या शिफारशींची गंभीरतेने दखल घेतली आहे. त्या माध्यमातून कृषिमालाच्या आयात-निर्यातीवर नियंत्रणाबाबत महत्त्वाचे ठराव घेण्यात आले आहेत. सध्या कृषिमालाचे भाव कमी असले तरी भविष्यात या निर्णयामुळे शेतकºयांच्या मालाला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळेल, असा विश्वासही पाशा पटेल यांनी यावेळी व्यक्त केला.सरकारने दोन लाख टनाच्यावर तूर डाळ व तीन लाख टनाच्यावर उडद डाळीच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला; शिवाय तूर डाळीवरील निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. भारतात ७० टक्के खाद्यतेलाची आयात विदेशातून होत असून, मोठ्या प्रमाणात पैसा बाहेर जातो. त्यामुळे रिफार्इंड तेलावर ४५ टक्के आणि क्रूड तेलावर ३५ टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे भविष्यात शेतकºयांच्या पिकांना चांगला भाव मिळेल. सोयाबीन, सूर्यफुलाच्या आयातीवरही शुल्क लावण्यात आले. शेतकºयांचा मालही निर्यात होत आहे. त्यास शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे.सध्या शेतमालाचे हमीभाव कमी असले तरी भविष्यात या धोरणाचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रशंसा केली. सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी सोयाबीनवर मॉईश्चरचे प्रमाण अधिक असल्याने व्यापारी अधिक भाव देण्यास तयार नसल्याचे ते म्हणाले.शेतकºयांनो सोयाबीन विकू नकासोयाबीनला येत्या काळात चांगला भाव मिळणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी सोयाबीन विक्रीसाठी घाई करू नये, असे आवाहन त्यांनी केले.कापूस, सोयाबीनला बोनस द्याकापसाला ५०० रुपये बोनस देण्यासोबतच धान आणि सोयाबीनला बोनस देण्याची मागणी आमदार आशिष देशमुख यांनी यावेळी केली.