शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नागपुरात बुधवारी ‘महावितरण’ करतेय काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 11:30 IST

कमल शर्मा। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दर बुधवारी शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. देखभालीच्या नावाखाली ...

ठळक मुद्दे‘डीपी’ उघडे अपघाताचा धोका, म्हणे दर आठवड्यात होते देखभाल

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दर बुधवारी शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. देखभालीच्या नावाखाली ‘आॅक्टोबर हीट’मध्येदेखील महावितरणतर्फे हे पाऊल उचलण्यात येते. मात्र दर आठवड्यात देखभाल होत असतानादेखील काँग्रेसनगर विभागातील बहुतांश ‘डीपी’ उघड्या अवस्थेत आहेत. तसेच विजेचे ‘आॅडिट’ करून चोरी उघड करण्यासाठी लावण्यात आलेले ‘मीटर्स’चीदेखील दुरवस्था दिसून आली. अशास्थितीत प्रत्यक्षात बुधवारी ‘महावितरण’कडून नेमके काम काय होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वीजहानी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने २००२-२००३ मध्ये ‘एपीडीआरपी’ची म्हणजेच वेगवान विद्युत विकास व सुधार कार्यक्रमाची सुरुवात केली. याअंतर्गत चुकीचे ‘मीटर रीडिंग’, वीजचोरीवर नजर ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ‘डीटीसी मीटर’ लावण्यात आले. मात्र काँग्रेसनगर विभागांतर्गत येणाऱ्या लक्ष्मीनगर परिसरात या ‘मीटर्स’ची अवस्था अतिशय वाईट आहे. बहुतांश ‘डीटीसी’ उघडे आहेत. त्यांच्यावरील झाकण गायब आहे. काही ठिकाणी तर ‘मीटर’च नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी विजेच्या तारांवर वेली असल्याचे दिसून आले. मात्र तरीदेखील दर बुधवारी ‘शटडाऊन’ करून काँग्रेसनगर विभागातील नागरिकांची परीक्षा पाहण्यात येते.

‘मॉडेम’कडे लक्ष नाही‘डीटीसी मीटर्स’ला ‘मॉडेम’च्या आधारे ‘कंट्रोल रूम’शी जोडण्यात आले आहे. मात्र या ‘मॉडेम्स’कडे कुणीच लक्ष देत नाही. अनेक ठिकाणी तर ‘मॉडेम’ बंद झाले आहेत व लाखोंची उपकरणे ‘ट्रान्सफॉर्मर’वर केवळ लटकली आहेत.

काय होता उद्देश?‘डीटीसी मीटर’लावण्याचा उद्देश हा ‘ट्रान्सफॉर्मर’वरून पुरविण्यात येणाºया विजेचे ‘आॅडिट’ करणे हा आहे. ‘ट्रान्सफॉर्मर’मधून किती वीज जात आहे आणि प्रत्यक्षात किती वापरात आहे, हे या ‘मीटर्स’च्या ‘रीडिंग’वरून स्पष्ट होते. दोन्हीमध्ये फरक दिसून आल्यास वीजचोरी होत असल्याचे संकेत मिळतात. प्रत्येक ग्राहकावर लक्ष ठेवणेदेखील या माध्यमातून शक्य आहे.

अनेक चोरी झाल्या उघड‘महावितरण’च्या क्षेत्रात ज्या ‘डीटीसी मीटर्स’वर लक्ष दिले जात नाही, त्याच ‘मीटर्स’च्या मदतीने ‘एसएनडीएल’ने मागील महिन्यात लाखो रुपयांची वीजचोरी पडकली. २००५ मध्ये याच ‘महावितरण’ने ‘डीटीसी मीटर्स’च्या मदतीने वीज नुकसानीवर नियंत्रण आणले होते. ‘महावितरण’चे अधिकारी जाणूनबुजून ‘डीटीसी मीटर्स’कडे लक्ष देण्यास व वीजचोरी थांबविण्याबाबत गंभीर नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण