शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

नागपुरात बुधवारी ‘महावितरण’ करतेय काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 11:30 IST

कमल शर्मा। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दर बुधवारी शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. देखभालीच्या नावाखाली ...

ठळक मुद्दे‘डीपी’ उघडे अपघाताचा धोका, म्हणे दर आठवड्यात होते देखभाल

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दर बुधवारी शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. देखभालीच्या नावाखाली ‘आॅक्टोबर हीट’मध्येदेखील महावितरणतर्फे हे पाऊल उचलण्यात येते. मात्र दर आठवड्यात देखभाल होत असतानादेखील काँग्रेसनगर विभागातील बहुतांश ‘डीपी’ उघड्या अवस्थेत आहेत. तसेच विजेचे ‘आॅडिट’ करून चोरी उघड करण्यासाठी लावण्यात आलेले ‘मीटर्स’चीदेखील दुरवस्था दिसून आली. अशास्थितीत प्रत्यक्षात बुधवारी ‘महावितरण’कडून नेमके काम काय होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वीजहानी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने २००२-२००३ मध्ये ‘एपीडीआरपी’ची म्हणजेच वेगवान विद्युत विकास व सुधार कार्यक्रमाची सुरुवात केली. याअंतर्गत चुकीचे ‘मीटर रीडिंग’, वीजचोरीवर नजर ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ‘डीटीसी मीटर’ लावण्यात आले. मात्र काँग्रेसनगर विभागांतर्गत येणाऱ्या लक्ष्मीनगर परिसरात या ‘मीटर्स’ची अवस्था अतिशय वाईट आहे. बहुतांश ‘डीटीसी’ उघडे आहेत. त्यांच्यावरील झाकण गायब आहे. काही ठिकाणी तर ‘मीटर’च नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी विजेच्या तारांवर वेली असल्याचे दिसून आले. मात्र तरीदेखील दर बुधवारी ‘शटडाऊन’ करून काँग्रेसनगर विभागातील नागरिकांची परीक्षा पाहण्यात येते.

‘मॉडेम’कडे लक्ष नाही‘डीटीसी मीटर्स’ला ‘मॉडेम’च्या आधारे ‘कंट्रोल रूम’शी जोडण्यात आले आहे. मात्र या ‘मॉडेम्स’कडे कुणीच लक्ष देत नाही. अनेक ठिकाणी तर ‘मॉडेम’ बंद झाले आहेत व लाखोंची उपकरणे ‘ट्रान्सफॉर्मर’वर केवळ लटकली आहेत.

काय होता उद्देश?‘डीटीसी मीटर’लावण्याचा उद्देश हा ‘ट्रान्सफॉर्मर’वरून पुरविण्यात येणाºया विजेचे ‘आॅडिट’ करणे हा आहे. ‘ट्रान्सफॉर्मर’मधून किती वीज जात आहे आणि प्रत्यक्षात किती वापरात आहे, हे या ‘मीटर्स’च्या ‘रीडिंग’वरून स्पष्ट होते. दोन्हीमध्ये फरक दिसून आल्यास वीजचोरी होत असल्याचे संकेत मिळतात. प्रत्येक ग्राहकावर लक्ष ठेवणेदेखील या माध्यमातून शक्य आहे.

अनेक चोरी झाल्या उघड‘महावितरण’च्या क्षेत्रात ज्या ‘डीटीसी मीटर्स’वर लक्ष दिले जात नाही, त्याच ‘मीटर्स’च्या मदतीने ‘एसएनडीएल’ने मागील महिन्यात लाखो रुपयांची वीजचोरी पडकली. २००५ मध्ये याच ‘महावितरण’ने ‘डीटीसी मीटर्स’च्या मदतीने वीज नुकसानीवर नियंत्रण आणले होते. ‘महावितरण’चे अधिकारी जाणूनबुजून ‘डीटीसी मीटर्स’कडे लक्ष देण्यास व वीजचोरी थांबविण्याबाबत गंभीर नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण