शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

दुर्गंधी पसरणार नाही तर काय? २५० मेट्रिक टन कचरा रोज पडूनच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 12:30 IST

शहरालगतच्या परिसरात ढिगारे : फ्लॅटमधील कचरा उचलणार कोण?

नागपूर : नागपूर शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी बीव्हीजी व एजी एन्व्हायरो या दोन कंपन्यांकडे आहे. शहरातून दररोज ११०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. परंतु, यातील जवळपास २५० मेट्रिक टन कचरा उचललाच जात नाही. शहराच्या विविध भागात हा कचरा तसाच पडून राहतो. प्रामुख्याने शहरालगतच्या परिसरात फेरफटका मारला तर जागोजागी कचरा साचलेला दिसतो. कंपन्यांचे कचरा संकलन कोलमडल्याचे चित्र आहे.

शहराच्या सर्व भागातील कचरा उचलला जावा, या हेतूने बीव्हीजी व एजी एन्व्हायरो या दोन कंपन्यांकडे प्रत्येकी पाच झोनमधील कचरा उचलण्याची जबाबदारी सोपविली आहे. मात्र, यापेक्षा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे ही जबाबदारी ठेवून मनुष्यबळ उपलब्ध केले असते तर शहरातील कचऱ्याची समस्या निकाली निघाली असती. परंतु, खासगी कंत्राटदारांकडे जबाबदारी असल्याने समस्या कायम आहे. दुसरीकडे वजन वाढविण्यासाठी कचऱ्यात माती आणि सिमेंटयुक्त रेतीची भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. गतकाळात हा प्रकार उघडकीस आला होता. कंपनीवर कारवाईसुद्धा झाली होती. परंतु, अजूनही हा प्रकार थांबलेला नाही.

क्यू आर कोडचा प्रकल्प बारगळला

घरातील कचरा उचलला की नाही याची इत्यंभूत माहिती क्यू आर कोडच्या माध्यमातून मिळणार होती. दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून तेलंगखेडी येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. परंतु, हा प्रकल्प काही दिवसांतच बारगळला आहे. नागरिकांच्या घरांवर लावलेल्या कोडच्या स्टिकरवरून कचरा उचलला की नाही याची माहिती मनपा प्रशासनाला मिळणार होती.

फ्लॅटमधील कचरा कोण उचलणार?

कंपन्याकडून शहरातील फ्लॅट स्किममधील कचरा उचलला जात नाही. यामुळे कचरा तसाच पडून राहतो. काही फ्लॅटधारक कचरा रस्त्यांवर आणून टाकतात. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आले आहे. याला कंपन्याच जबाबदार असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

दोन कोटींच्या डस्टबिन चोरीला

स्वच्छ शहरासाठी महापालिकेकडून विविध उपक्रमांसोबतच प्रकल्पही राबविण्यात येतात. शहरातील प्रमुख रस्त्यावर दोन कोटी खर्च करून ४०० डस्टबिन लावण्यात आल्या होत्या. परंतु, सद्य:स्थितीत या डस्टबिनची दुरवस्था झाली आहे. यातील कचरा उचलला जात नाही, तर काही ठिकाणच्या डस्टबिन चोरीला गेलेल्या आहेत.

ओला-सुका कचरा एकत्रच

कंपन्यांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करणे आवश्यक आहे. परंतु, अजूनही ६० टक्के कचरा एकत्रच गोळा केला जातो. परिणामी संकलन केंद्रावर ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करताना अडचणी येतात.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका