शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यात जे ही घडले ते राज्याच्या आणि समाजाच्या हिताचे नाही

By कमलेश वानखेडे | Updated: August 17, 2024 14:39 IST

शरद पवार : पंतप्रधानाचा महाराष्ट्रबाबतचा निवडणुकीचा निर्णय विरोधाभासी

नागपूर : बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाले. त्यासाठी उठाव केला गेला. त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उमटत आहे. बांगलादेश मध्ये जे घडले त्याचे परिणाम महाराष्ट्रातून येतील असे काही वाटले नाही. त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. महाराष्ट्रात काही ठिकाणी जे काही घडले ते राज्याच्या आणि समाजाच्या हिताचे नाही. आज शांततेची गरज आहे. यासाठी राजकारण, समाजकारणातील लोकांनी संयमाचा पुरस्कार करावा व शांतता कशी राहील याबद्दलची खबरदारी घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी दिला.

शनिवारी नागपुरात एका सत्कार सोहळ्यासाठी आले असता शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, बांगलादेशमध्ये हे घडले त्याप्रकारे येथे घडण्याचे काही कारण नाही. अन्य देशात घडलेल्या गोष्टींसाठी आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांचे जीवन उद्धवस्त होईल किंवा संकटातील असे काही करू नये. शासनाची भूमिका आणि गृह खात्याची जबाबदारी यावर भाष्य करता येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी भाषण देताना सर्व देशाच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्या या पद्धतीची भूमिका मांडली. जम्मू-काश्मीर आणि हरियाणाची निवडणूक जाहीर झाली. झारखंड आणि महाराष्ट्राची मात्रा निवडणूक जाहीर झाली नाही. पंतप्रधानाचा महाराष्ट्र बद्दलचा निर्णय हा एक प्रकारचा विरोधाभास आहे. याबद्दल आणखी काय सांगायचे, असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारnagpurनागपूर