शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात जे ही घडले ते राज्याच्या आणि समाजाच्या हिताचे नाही

By कमलेश वानखेडे | Updated: August 17, 2024 14:39 IST

शरद पवार : पंतप्रधानाचा महाराष्ट्रबाबतचा निवडणुकीचा निर्णय विरोधाभासी

नागपूर : बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाले. त्यासाठी उठाव केला गेला. त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उमटत आहे. बांगलादेश मध्ये जे घडले त्याचे परिणाम महाराष्ट्रातून येतील असे काही वाटले नाही. त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. महाराष्ट्रात काही ठिकाणी जे काही घडले ते राज्याच्या आणि समाजाच्या हिताचे नाही. आज शांततेची गरज आहे. यासाठी राजकारण, समाजकारणातील लोकांनी संयमाचा पुरस्कार करावा व शांतता कशी राहील याबद्दलची खबरदारी घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी दिला.

शनिवारी नागपुरात एका सत्कार सोहळ्यासाठी आले असता शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, बांगलादेशमध्ये हे घडले त्याप्रकारे येथे घडण्याचे काही कारण नाही. अन्य देशात घडलेल्या गोष्टींसाठी आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांचे जीवन उद्धवस्त होईल किंवा संकटातील असे काही करू नये. शासनाची भूमिका आणि गृह खात्याची जबाबदारी यावर भाष्य करता येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी भाषण देताना सर्व देशाच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्या या पद्धतीची भूमिका मांडली. जम्मू-काश्मीर आणि हरियाणाची निवडणूक जाहीर झाली. झारखंड आणि महाराष्ट्राची मात्रा निवडणूक जाहीर झाली नाही. पंतप्रधानाचा महाराष्ट्र बद्दलचा निर्णय हा एक प्रकारचा विरोधाभास आहे. याबद्दल आणखी काय सांगायचे, असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारnagpurनागपूर