शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

कामच बंद तर खाणार काय ? रोजगाराच्या विवंचनेत आम्ही जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 11:06 IST

मनपा आयुक्त आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून पुन्हा एकदा टाळेबंदी लागण्याचे संकेत प्राप्त होताच संपूर्ण बाजारात धास्तीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देहातावर पोट भरणाऱ्यांचा सवाल, टाळेबंदी लागण्याच्या संकेताने सगळेच धास्तावले

प्रवीण खापरे, संजय लचुरिया।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तब्बल अडीच-तीन महिन्यांच्या टाळेबंदीनंतर सरकारने बाजारातील व्यवहारात शिथिलता प्रदान केली आणि हातावर पोट असणाऱ्यांसह व्यापारी वर्गाने सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र, मनपा आयुक्त आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून पुन्हा एकदा टाळेबंदी लागण्याचे संकेत प्राप्त होताच संपूर्ण बाजारात धास्तीचे वातावरण पसरले आहे. तीन महिन्यात संपूर्ण अर्थव्यवस्था मोडकळीस आल्यानंतर कसेतरी पोट भरण्याचे प्रयत्न करणाऱ्या वर्गाकडून... ‘आता आम्ही जगायचे कसे?’ असा भयप्रद सवाल उपस्थित केला जात आहे.

मेकॅनिकला गाडी थांबण्याची भीतीसंक्रमण वाढते आहे आणि सरकारकडून जो निर्णय घेतला जाईल, तो मान्य करणेच योग्य ठरेल. मात्र, तीन महिन्याचा काळ आठवला की अजूनही अंगावर काटा उभा राहतो. गाड्या पुन्हा थांबतील आणि माझ्यासारख्या मेकॅनिकला पुन्हा अडचणीत जगावे लागेल, अशी भावना अतुल मेकॅनिकने व्यक्त केली.

दुसरा पर्याय नाही का?रोज कमावतो तेव्हा घराचा रहाटगाडा चालतो. काम नसेल तर कुटुंबाची अवस्था काय असते, याचा अनुभव गेल्या तीन महिन्यात घेतला आहे. आता पुन्हा टाळेबंदी लागली तर काय होईल, याची भीती आहे. टाळेबंदीपेक्षा संसर्ग रोखण्यासाठी दुसरा पर्याय नाही का, असा सवाल इतवारी भागात काम करणारे नरेश मोचीवाला यांनी उपस्थित केला.

उपाशीच मरावे लागेलडे टू डे पुढे भुट्टा विकणाऱ्या भुट्टावाला यांना रोजगाराची चिंता आहे. वातावरणानुसार हंगामी व्यवसाय निवडणाऱ्यात येणारे हे भुट्टेवाले आधीच विक्री होत नसल्याने चिंतेत आहेत. पावसाळा पूर्ण असाच चालला आणि पुन्हा टाळेबंदी असेल तर मरणयातना भोगण्यासारखीच स्थिती निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस