शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

त्या बालकांचे काय चुकले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:12 IST

नागपूर : कालडोंगरी बेड्यावर शाळाबाह्य असलेली ७४ मुले बालरक्षकांनी शोधली. त्या मुलांच्या जन्मतारखेची यादी केंद्र प्रमुखाच्या उपस्थितीत मुख्याध्यापकाला दिली. ...

नागपूर : कालडोंगरी बेड्यावर शाळाबाह्य असलेली ७४ मुले बालरक्षकांनी शोधली. त्या मुलांच्या जन्मतारखेची यादी केंद्र प्रमुखाच्या उपस्थितीत मुख्याध्यापकाला दिली. पण या मुलांना शाळेने दाखल करून घेतले नाही. एकीकडे कुणीही बालक शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी मोहीम राबविण्यात येते. अशात ७४ बालके शोधूनही शाळेत दाखल केले नाही, या बालकांचे काय चुकले, असा सवाल बालरक्षकांनी केला आहे.

पटसंख्येच्या अभावी सरकारी शाळा बंद पडत आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालके शाळाबाह्य आहेत. कालडोंगरी परिसरातील बेड्यावरील ७४ मुले बालरक्षक प्रसेनजित गायकवाड आणि माधुरी सेलोकर यांनी महिनाभर प्रयत्न करून शोधली आणि त्यांच्या जन्माच्या नोंदींसह यादी रामा जोगराणा यांच्याकरवी केंद्र प्रमुखांच्या उपस्थितीत कालडोंगरी जि.प. प्राथमिक शाळेत नाव दाखल करण्यासाठी दिली. मागील महिन्यात मुलांना आणि पालकांना प्रवेशासाठी शाळेत उपस्थित केले. त्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक आणि सहशिक्षक यांनी मुलांना शाळेत दाखल करीत असल्याचे नाटक केले. परंतु दुसरेच दिवशी गावातील पालक विरोध करीत असल्याचे सांगून, सदर मुलांना शाळेत प्रवेश देता येणार नसल्याचे सांगितले.

मुलांना शाळेत प्रवेश देण्यासंदर्भात स्थानिक पालकांना काय अडचण आहे, हे जाणून घेण्यासाठी बालरक्षक गायकवाड यांनी समन्वय सभा घेऊन पालक, शिक्षक आणि केंद्र प्रमुख यांना शाळाबाह्य मुलांच्या शाळाप्रवेशाची कायदेशीर बाजू समजावून सांगितली. या मुलांना तात्काळ प्रवेश देण्यासाठी विनंती केली. लगेच प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले. शिक्षणाधिकारी यांनी लगेच पत्र काढून गटशिक्षणाधिकारी यांना सूचित केले. तथापि, अजूनही या शाळाबाह्य मुलांचा शाळाप्रवेश झाला नाही.

- आरटीईच्या कायद्यानुसार एकही मूल शाळाबाह्य राहू नये. त्यानुसार शिक्षक व मुख्याध्यापकांनी कार्य करणे गरजेचे आहे. मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेच्या परिसरातील शाळाबाह्य मुले शोधून त्यांना तात्काळ प्रवेश देणे गरजेचे आहे. कुणाच्या दबावात मुख्याध्यापक या मुलांना प्रवेश देत नसेल तर शिक्षण विभागाने अशा मुख्याध्यापकांचे प्रबोधन करावे. त्यांचे कार्य समजवून सांगावे.

प्रसेनजित गायकवाड, बालरक्षक

- आम्ही मुलांना शाळेपर्यंत घेऊन गेलो. त्यांच्या जन्मतारखेचे दाखले मुख्याध्यापकांना दिले. पण मुलांना प्रवेशित करून घेतले नाही. या मुलांनाही शैक्षणिक सोयी-सवलती मिळाव्यात, त्यांना शालेय पोषण आहाराचा लाभ, गणवेश, पुस्तके मिळावेत, ही मुलेही शिक्षणाच्या प्रवाहात यावीत, अशी आमची अपेक्षा आहे.

रामा जोगराणा, सामाजिक कार्यकर्ते