शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जवानांच्या मानवाधिकाराबाबत विरोधाभास का ?

By admin | Updated: September 16, 2015 03:35 IST

दहशतवाद्याच्या शिक्षेच्यावेळी अनेक संघटनांकडून मानवाधिकाराचा प्रश्न उपस्थित केला जातो.

पी.जी. कामत : विधी महाविद्यालयाच्या परिषदेचा समारोपनागपूर : दहशतवाद्याच्या शिक्षेच्यावेळी अनेक संघटनांकडून मानवाधिकाराचा प्रश्न उपस्थित केला जातो. उद्योजकाचे हितसंबंध असलेल्या व्यक्तीबाबतही संवेदना उमटतात. माध्यमांमध्येही यावर भरभरून चर्चा रंगते. मात्र दंतेवाडासारख्या घटनेत मारल्या गेलेल्या सुरक्षा जवानांच्या कुटुंबीय किंवा दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या मानव अधिकाराबाबत या संघटना गप्प राहतात. व्यावसायिकांच्या हातात असलेल्या माध्यमांमध्येही याची फारशी चर्चा होत नाही. यावरून सुरक्षा जवानांच्या मानव अधिकाराबाबत समाज व माध्यमांमध्येही विरोधाभासी भूमिका असल्याचे मत लेफ्टनंट जनरल पी.जी. कामत यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात आयोजित परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमांतर्गत बौध्दिक सत्राचे सूत्रसंचालन करतांना पी.जी. कामत बोलत होते. ‘निमलष्करी दल, समाज आणि मानव अधिकार’ या विषयावर आयोजित बौध्दिक सत्राला आयपीएस छाया शर्मा आणि आयपीएस ममता सिंग प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. या विषयांतर्गत ‘सामाजिक न्याय आणि पोलीस व्यवस्था’ या मुद्यावर छाया शर्मा यांनी विचार मांडले. तर ‘संवेदनशीलतेचे प्रश्न, पोलिसांचा व्यवहार आणि मानवाधिकार’ या विषयावर ममता सिंग यांनी मार्गदर्शन केले. बौध्दिक सत्राला मानवाधिकार आयोगाचे संयुक्त सचिव कर्नल डॉ. रणजित सिंग, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार, परिसंवादाच्या समन्वयक डॉ. अधरा देशपांडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. निर्भया प्रकरणानंतर बदल घडतोय : छाया शर्मादिल्लीतील निर्भया प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या छाया शर्मा म्हणाल्या, सर्वच जाती, धर्म आणि वर्गाच्या मानवाधिकाराला धक्का लागू नये म्हणून संविधानात कायदा व सुव्यवस्थेला अधिक महत्त्व आहे. मात्र नागरिक आणि पोलिसांमध्ये समन्वय नसण्याची अनेक कारणे आहेत. यातील प्रमुख म्हणजे लोकांमध्ये असलेली निरक्षरता, कायद्याबदलचे अज्ञान व गरिबी हे होय. दुसरीकडे पोलीस विभागाची प्रतिमा चांगली नसल्याने लोक पोलिसांपर्यंत जात नाही. गुंडांची भीती आणि लोकलाजेमुळेही लोक पोलिसांकडे जायला धजावत नाही. मात्र लोकांचे गप्प राहणेच कायदा व्यवस्थेला अपंग करत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देशातील कायदा अतिशय मजबूत आहे, मात्र कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर हा बदल घडत असल्याचे छाया शर्मा यांनी सांगितले.पोलीस प्रशासनात ई-गव्हर्नन्सने बदल : ममता सिंगमानवाधिकाराच्या दृष्टीने हरियाणा राज्यात पोलीस प्रशासनात महत्त्वाची आयपीएस ममता सिंग म्हणाल्या, लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी आहे. यातही २४ तास कामाचा दबाव, वरिष्ठांचा दबाव आणि समाजातील अनुभवामुळे पोलिसांचा व्यवहार कठोर वाटतो, मात्र त्यांच्यातही संवेदनशीलता आहे. यादृष्टीने पोलीस प्रशासनात बदलाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. समाजाचा सहभाग वाढविण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंगवर जोर दिला जात आहे. पूर्वी एका पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगाराची माहिती दुसऱ्या स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना होत नव्हती. मात्र ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून देशातील सर्व पोलीस ठाणी आॅनलाईन जोडल्या जाणार आहेत. हरियाणा राज्यात ही प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगत, यामुळे अनेक बदल दिसून येत असल्याचे ममता सिंग म्हणाल्या. महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहेत. अनेक बाबी चांगल्या होत आहेत, मात्र मीडियामध्ये चांगल्या गोष्टी ऐवजी वाईट दाखविण्याची स्पर्धा आहे. बदल हा घडत आहे, मात्र समाजाने भूमिका बदलवून पोलीस विभागाला सहकार्य करावे आणि माध्यमांनीही या गोष्टी हायलाईट कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.