शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जवानांच्या मानवाधिकाराबाबत विरोधाभास का ?

By admin | Updated: September 16, 2015 03:35 IST

दहशतवाद्याच्या शिक्षेच्यावेळी अनेक संघटनांकडून मानवाधिकाराचा प्रश्न उपस्थित केला जातो.

पी.जी. कामत : विधी महाविद्यालयाच्या परिषदेचा समारोपनागपूर : दहशतवाद्याच्या शिक्षेच्यावेळी अनेक संघटनांकडून मानवाधिकाराचा प्रश्न उपस्थित केला जातो. उद्योजकाचे हितसंबंध असलेल्या व्यक्तीबाबतही संवेदना उमटतात. माध्यमांमध्येही यावर भरभरून चर्चा रंगते. मात्र दंतेवाडासारख्या घटनेत मारल्या गेलेल्या सुरक्षा जवानांच्या कुटुंबीय किंवा दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या मानव अधिकाराबाबत या संघटना गप्प राहतात. व्यावसायिकांच्या हातात असलेल्या माध्यमांमध्येही याची फारशी चर्चा होत नाही. यावरून सुरक्षा जवानांच्या मानव अधिकाराबाबत समाज व माध्यमांमध्येही विरोधाभासी भूमिका असल्याचे मत लेफ्टनंट जनरल पी.जी. कामत यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात आयोजित परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमांतर्गत बौध्दिक सत्राचे सूत्रसंचालन करतांना पी.जी. कामत बोलत होते. ‘निमलष्करी दल, समाज आणि मानव अधिकार’ या विषयावर आयोजित बौध्दिक सत्राला आयपीएस छाया शर्मा आणि आयपीएस ममता सिंग प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. या विषयांतर्गत ‘सामाजिक न्याय आणि पोलीस व्यवस्था’ या मुद्यावर छाया शर्मा यांनी विचार मांडले. तर ‘संवेदनशीलतेचे प्रश्न, पोलिसांचा व्यवहार आणि मानवाधिकार’ या विषयावर ममता सिंग यांनी मार्गदर्शन केले. बौध्दिक सत्राला मानवाधिकार आयोगाचे संयुक्त सचिव कर्नल डॉ. रणजित सिंग, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार, परिसंवादाच्या समन्वयक डॉ. अधरा देशपांडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. निर्भया प्रकरणानंतर बदल घडतोय : छाया शर्मादिल्लीतील निर्भया प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या छाया शर्मा म्हणाल्या, सर्वच जाती, धर्म आणि वर्गाच्या मानवाधिकाराला धक्का लागू नये म्हणून संविधानात कायदा व सुव्यवस्थेला अधिक महत्त्व आहे. मात्र नागरिक आणि पोलिसांमध्ये समन्वय नसण्याची अनेक कारणे आहेत. यातील प्रमुख म्हणजे लोकांमध्ये असलेली निरक्षरता, कायद्याबदलचे अज्ञान व गरिबी हे होय. दुसरीकडे पोलीस विभागाची प्रतिमा चांगली नसल्याने लोक पोलिसांपर्यंत जात नाही. गुंडांची भीती आणि लोकलाजेमुळेही लोक पोलिसांकडे जायला धजावत नाही. मात्र लोकांचे गप्प राहणेच कायदा व्यवस्थेला अपंग करत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देशातील कायदा अतिशय मजबूत आहे, मात्र कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर हा बदल घडत असल्याचे छाया शर्मा यांनी सांगितले.पोलीस प्रशासनात ई-गव्हर्नन्सने बदल : ममता सिंगमानवाधिकाराच्या दृष्टीने हरियाणा राज्यात पोलीस प्रशासनात महत्त्वाची आयपीएस ममता सिंग म्हणाल्या, लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी आहे. यातही २४ तास कामाचा दबाव, वरिष्ठांचा दबाव आणि समाजातील अनुभवामुळे पोलिसांचा व्यवहार कठोर वाटतो, मात्र त्यांच्यातही संवेदनशीलता आहे. यादृष्टीने पोलीस प्रशासनात बदलाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. समाजाचा सहभाग वाढविण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंगवर जोर दिला जात आहे. पूर्वी एका पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगाराची माहिती दुसऱ्या स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना होत नव्हती. मात्र ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून देशातील सर्व पोलीस ठाणी आॅनलाईन जोडल्या जाणार आहेत. हरियाणा राज्यात ही प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगत, यामुळे अनेक बदल दिसून येत असल्याचे ममता सिंग म्हणाल्या. महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहेत. अनेक बाबी चांगल्या होत आहेत, मात्र मीडियामध्ये चांगल्या गोष्टी ऐवजी वाईट दाखविण्याची स्पर्धा आहे. बदल हा घडत आहे, मात्र समाजाने भूमिका बदलवून पोलीस विभागाला सहकार्य करावे आणि माध्यमांनीही या गोष्टी हायलाईट कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.