शहरं
Join us  
Trending Stories
1
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
2
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
3
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
4
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
5
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
6
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
7
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
8
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
9
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
10
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
11
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
12
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
13
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
14
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
15
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
18
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
19
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
20
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST

शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेबाबत अजूनपर्यंत कुठलीही घोषणा केली नाही. कोरोनाच्या परिस्थितीमुळे व ...

शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेबाबत अजूनपर्यंत कुठलीही घोषणा केली नाही. कोरोनाच्या परिस्थितीमुळे व तिसऱ्या लाटेबाबत वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिल्या गेलेल्या अलर्टनुसार बारावीच्या परीक्षेबाबत साशंकताच आहे. बारावीचे महत्त्वाचे वर्ष असल्याने परीक्षा घेणे गरजेचे आहे. लोकमतने यासंदर्भात शहरातील शिक्षकांकडून मत जाणून घेतले. त्यांचे म्हणणे आहे की, बोर्डाने परीक्षेबाबत लवकर निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होत आहे. बोर्डाने ठरविल्यास परीक्षा परीक्षेचे नियोजन यशस्वी करता येऊ शकते.

राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेची तयारी एप्रिल महिन्यात केली होती. तारीख आणि टाइमटेबलही घोषित केला होता. पण एप्रिल महिन्यात राज्यात कोरोनाने चांगलाच कहर केला. सरकारला लॉकडाऊन लावावे लागले. अजूनही राज्यात लॉकडाऊन सुरूच आहे. त्यानंतर परीक्षेबाबत कुठलीही घोषणा झाली नाही. या सर्व परिस्थितीत विद्यार्थी मात्र संभ्रमित झाला आहे. परीक्षेचेच काही नक्की नसल्याने अभ्यासापासून तो कंटाळला आहे. शहरातील काही तज्ज्ञ शिक्षकांचे मत आहे की, बारावीची परीक्षा बोर्डाला घ्यावीच लागेल. या शिक्षकांनी काही फाॅर्म्युलेही सुचविले आहेत.

- दृष्टिक्षेपात

बारावीच्या परीक्षेत नागपूर बोर्डातून प्रविष्ट झालेले विद्यार्थी - १,४६,९९१

- सरकार व बोर्ड जर परीक्षेचे आयोजन करीत असेल तर ५०-५० चा फाॅर्म्युला उत्तम आहे. या फाॅर्म्युल्यानुसार ५० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात यावी व ५० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन करावे. प्रश्नांच्या संख्येनुसार वेळ निर्धारित करावा. या फाॅर्म्युल्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अधिक वेळ थांबावे लागणार नाही.

आशनारायण तिवारी, प्राचार्य, श्रीमती सी.बी.आदर्श विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज, गांधीबाग

- कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना सरकार जर निवडणुका घेऊ शकते, तर परीक्षा घ्यायला काय हरकत आहे. उलट लॉकडाऊनच्या काळात परीक्षा यशस्वी होऊ शकतात. विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना, परीक्षेच्या कामातील शिक्षकांना विशेष पास देण्यात यावी. शाळाच सेंटर ठेवण्यात यावे. एकेका वर्गात २० विद्यार्थी झिगझॅग पद्धतीने नियोजन करावे. जिल्ह्यात शाळा भरपूर आहेत. परीक्षा यशस्वी होऊ शकतात.

प्रा. सपन नेहरोत्रा, शिक्षक तज्ज्ञ

- बारावीच्या परीक्षा बोर्डाने घेणे गरजेचे आहे, कारण बारावीनंतर अनेक स्पर्धात्मक परीक्षेसाठी त्यांचे योग्य मूल्यमापन हा एक निकष असतो. प्रत्येक पेपरमध्ये तीन दिवसाचे अंतर ठेवल्यास विद्यार्थ्याला स्वत:ची हेल्थ मॉनिटरिंग ठेवता येईल व शाळांनादेखील निर्जंतुकीकरण करणे व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी इतर पूर्वतयारी करण्यास पुरेसा वेळ मिळेल. त्याचप्रमाणे होम सेंटर दिल्यास एकाच ठिकाणी केंद्रावर गर्दी होणे ही बाबदेखील टाळता येईल.

डॉ. निशांत नारनवरे, संचालक, सेंट्रल प्रोव्हिन्शियल स्कूल

- काय म्हणतात विद्यार्थी...

- आम्ही विद्यार्थी खरंच कन्फ्युज आहोत. परीक्षेचा टाइमटेबल घोषित होतो, तारखा ठरतात, आम्ही अभ्यासाला लागतो आणि अचानक परीक्षा रद्द होतात. मग निराशा येते. एकदा परीक्षा घेऊन टाकलेली बरी. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरविता येते. बारावा वर्ग शिक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना ध्येयनिश्चिती करण्यास पसंतीनुसार शाखा निवडण्यास मदत होते.

रूपाली पटले, विद्यार्थिनी, ज्योतिबा ज्युनि. कॉलेज

- एकदा सरकारने निर्णय घेऊन मोकळे करावे. १४ महिने होत आहे. अभ्यासातला तोच तो पणा वाचूनही कळत नाही. अभ्यासापासून मन उडाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बोर्डाने नियोजन करावे. शाळा भरपूर आहेत. १० ते १५ विद्यार्थ्यांचे एका वर्गात नियोजन करावे. आम्हीही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणारच आहोत.

पारुल राऊत, विद्यार्थिनी, ज्युपिटर ज्युनि. कॉलेज