शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकांमधील ठेवींचे काय?

By admin | Updated: May 25, 2014 01:00 IST

जिल्हा बँकेवर अवसायक नियुक्त करण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकार खात्याला दिल्यानंतर बँकेच्या आर्थिक व्यवहारावर पूर्णत: निर्बंंंंध आले आहे. त्यामुळे खातेदार व ठेवीदारांना फक्त एक

आर्थिक व्यवहारावर निर्बंंंध : हवी रोख मदत

मोरेश्‍वर मानापुरे - नागपूर

जिल्हा बँकेवर अवसायक नियुक्त करण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकार खात्याला दिल्यानंतर बँकेच्या आर्थिक व्यवहारावर पूर्णत: निर्बंंंंध आले आहे. त्यामुळे खातेदार व ठेवीदारांना फक्त एक हजारापेक्षा जास्त रक्कम विड्राल करण्यावर बंधन आले आहे. आर्थिक परवान्याचा तिढा लवकरच न सुटल्यास याआधी नागपुरात बंद पडलेल्या नागरी बँकांमधील ठेवींप्रमाणे जिल्हा बँकेतील ठेवी बुडणार तर नाही ना? असा प्रश्न ठेवीदारांना सतावत आहे.

बँकेच्या ८६ शाखा आहेत. सर्वच शाखांमध्ये खातेदार आणि ठेवीदार गर्दी करू लागले आहेत. त्यांची समज घालताना अधिकार्‍यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यांच्या संयमाचा बांध फुटल्यास अधिकार्‍यांना त्यांना समजावणे कठीण जाईल. अधिकार्‍यांना संरक्षण देण्याची बँकेच्या कर्मचारी असोसिएशनची मागणी आहे. रिझर्व्ह बँकेला शासनाची कागदोपत्री हमी नको. शासनाने मदतीच्या स्वरूपात बँकेच्या खात्यात तातडीने रोख रक्कम जमा करणे, हाच अंतिम पर्याय आहे. आर्थिक परवाना मिळविण्यासाठी बँकेला हवी असलेली रक्कम बँकेच्या खात्यात जमा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने पावले उचलायची हवी. त्यानंतरच रिझर्व्ह बँक जिल्हा बँकेच्या आर्थिक परवान्यावर गांभीर्याने विचार करू शकेल. यासाठी शासनाची इच्छाशक्ती हवी, असे मत अर्थतज्ज्ञाने लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

खातेदार व ठेवीदारांना हवी

बँकेची स्थिती नाजूक असल्याने ३१ मे २0१४ नंतर खातेदार आणि ठेवीदारांना रक्कम काढता येईल, असा मोठय़ा अक्षरातील नोटीस बँकेबाहेर आणि बँकेच्या आत प्रत्येक माळ्यावर झळकत होता. आज ना उद्या बँक सुस्थितीत येईल आणि रक्कम परत मिळेल, असा ग्राहकांना विश्‍वास होता. पण जसे दिवस जात आहेत, तसा त्यांचा तोल सुटत चालला आहे. कुणाला पाल्याच्या शाळेची वा कॉलेजची

फी’साठी रक्कम‘फी’ भरायची आहे तर कुणाला मुलाचे वा मुलीच्या लग्नासाठी तर काहींना उपचारासाठी रक्कम हवी आहे. शासनाकडून लवकरच मदत मिळेल आणि बँक ताळ्यावर येईल, त्यानंतरच सर्वांंंना रक्कम मिळेल, असे आश्‍वासन अधिकारी खातेदार व ठेवीदारांना देत आहेत.