शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

‘ते’ प्राचार्य गुन्हेगार होते का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:15 IST

नवनिर्वाचित सदस्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधीसभेची बैठक विद्वत् परिषदेवरील नामनिर्देशनाच्या मुद्यावरून तापली. विद्वत् परिषदेसाठी पहिल्या यादीतील प्राचार्यांना डावलण्यासंदर्भात कळविण्यात आले नाही. हे प्राचार्य गुन्हेगार होते का, असा संतप्त सवाल विधीसभा सदस्य डॉ. बबन तायवाडे यांनी उपस्थित केला. विधीसभेची बैठक सुरू होण्याअगोदर महाआघाडीच्या सदस्यांनी सभागृहाबाहेर प्रशासनाविरोधात निदर्शने केली.

ठळक मुद्देविधीसभेच्या आत व बाहेर विरोधकांची आक्रमक भूमिका : विद्यापीठ विद्वत् परिषद नामनिर्देशन तापले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवनिर्वाचित सदस्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधीसभेची बैठक विद्वत् परिषदेवरील नामनिर्देशनाच्या मुद्यावरून तापली. विद्वत् परिषदेसाठी पहिल्या यादीतील प्राचार्यांना डावलण्यासंदर्भात कळविण्यात आले नाही. हे प्राचार्य गुन्हेगार होते का, असा संतप्त सवाल विधीसभा सदस्य डॉ. बबन तायवाडे यांनी उपस्थित केला. विधीसभेची बैठक सुरू होण्याअगोदर महाआघाडीच्या सदस्यांनी सभागृहाबाहेर प्रशासनाविरोधात निदर्शने केली.विधीसभेच्या बैठकीला सुरुवात झाल्यावर लागलीच अ‍ॅड.मनमोहन बाजपेयी यांनी सूचनेचा मुद्दा उपस्थित केला. विद्वत् परिषदेत कुलगुरूनामित ११ सदस्यांच्या नावाला राज्यपाल कार्यालयाने मान्यता कळविली होती. या सदस्यांसोबत विद्यापीठाने पत्रव्यवहारदेखील केला. परंतु त्यांना काहीही न कळवता अचानक यादी बदलण्यात आली. असे का करण्यात आले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मृत्युंजय सिंह, डॉ.प्रदीप बुटे यांनीदेखील यात कुलगुरुंवर प्रश्नांचा भडिमार केला. डॉ. बबन तायवाडे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाने पहिल्या यादीतील सर्व सदस्य व प्राचार्यांचा अपमानच केल्याचा आरोप केला. एका प्राचार्यांच्या महाविद्यालयाच्या ‘नॅक’ प्रमाणनाचा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाला. परंतु इतर प्राचार्य तर पात्र होते. त्यांना दूर सारून विद्यापीठाने त्यांची बदनामीच केली आहे. शिवाय त्यांना पत्र पाठविण्याची तसदी घेतली नाही, असे डॉ. तायवाडे म्हणाले. यावेळी डॉ.आर.जी.भोयर यांनी कुलगुरूंच्या भूमिकेला समर्थन दिले. ही यादी गोपनीय असताना ती बाहेर आलीच कशी, असा प्रश्न उपस्थित करत याची चौकशी करण्याची मागणी विष्णू चांगदे यांनी केली. संदीप जोशी यांनी या मुद्यावर अकारण वेळ जात असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. अखेर कुलगुरूंनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. विद्यापीठाने त्या प्राचार्यांना केवळ पत्राद्वारे कळविले होते. त्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध झाली नव्हती. विद्वत् परिषदेतील नामनिर्देशित सदस्यांची निवड करण्याचे कुलगुरूंकडे पूर्ण अधिकार नाहीत. ही राज्यपालांशी सल्लामसलत करुनच करावी असे विद्यापीठ कायद्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. जर कुलगुरूंनी पाठविलेले नाव राज्यपालांना पटले नाही, तर ते त्यात बदल करू शकतात, असे कुलगुरूंनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठagitationआंदोलन