शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

एका टीसीवर १३ कोचचा भार

By admin | Updated: January 16, 2017 01:51 IST

रेल्वेगाड्यांची संख्या दरवर्षी वाढत असून, त्यात काम करणाऱ्या टीसींची संख्या मात्र मागील अनेक

तोकड्या संख्येंची प्रवाशांना डोकेदुखी : नागपूर विभागात ६०० टीसींची आवश्यकता दयानंद पाईकराव   नागपूर रेल्वेगाड्यांची संख्या दरवर्षी वाढत असून, त्यात काम करणाऱ्या टीसींची संख्या मात्र मागील अनेक वर्षांपासून वाढली नसल्यामुळे प्रवाशांच्या समस्यांत मोठी वाढ झाली आहे. एका टीसीला १३ कोच सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सध्या १२०० टीसींची गरज असताना केवळ ६२५ टीसी कार्यरत आहेत. रेल्वे बोर्डाने टीसीला उत्पन्न वाढविण्याचे ‘टार्गेट’ वाढवून दिले. परंतु हे ‘टार्गेट’ पूर्ण करताना प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. गाडीत एकच टीसी असल्यामुळे अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असून, रेल्वे प्रशासनाच्या महसुलाचेही मोठे नुकसान होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. रेल्वेगाडी आपल्या नियोजित ठिकाणावरून सुटल्यानंतर प्रवासी आणि टीसी यांचा ताळमेळ असणे गरजेचे असते. परंतु मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात टीसींची संख्या दुपटीने कमी आहे. यामुळे एका टीसीला १२ ते १३ कोच सांभाळण्याची वेळ आली आहे. प्रवाशांना प्रवासात अनेक समस्या येतात. रेल्वेगाडी कधी अस्वच्छ असते. प्रवासी अनेकदा चेनपुलिंग करतात. कधी असामाजिक तत्त्व प्रवाशांच्या बर्थचा ताबा मिळवितात. कधी प्रवाशांची प्रकृती बिघडल्यास टीसीच पुढील स्थानकावर कळवून डॉक्टरची सुविधा उपलब्ध करून देतो. परंतु टीसीला रेल्वे बोर्डाने उत्पन्नाचे टार्गेट वाढवून दिल्यामुळे तो आपले टार्गेट पूर्ण करण्यात व्यस्त असतो. प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास त्याला वेळच मिळत नाही. अशा स्थितीत प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यातील टीसींची संख्या वाढविण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.