शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजार बंद, भाज्यांचे भाव उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:06 IST

नागपूर : वाढत्या कोरोना रुग्णामुळे शहरातील आठवडी बाजाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा बाजार बंद झाल्याने अनेकांचा रोजगार ...

नागपूर : वाढत्या कोरोना रुग्णामुळे शहरातील आठवडी बाजाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा बाजार बंद झाल्याने अनेकांचा रोजगार हिरावला असून सुरू करण्याची किरकोळ भाजी विक्रेत्यांची मागणी आहे.

मनपा प्रशासनाने आठवडी बाजार भरविण्यास बंदी घातल्याने भाज्यांच्या विक्रीत घसरण झाली आहे. स्थानिक उत्पादकांकडून आवक वाढली, पण विक्री कमी असल्याने भाव उतरले आहेत. किरकोळ विक्रेते गल्लीबोळात ठेल्यावर फिरून विक्री करताना दिसत आहेत. भाव मिळत नसल्याने अनेक विक्रेते चारचाकी वाहनांवर चौकाचौकात भाज्यांची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. कमी भावामुळे उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शहरातील आठवडी बाजार सुरू करण्याची विक्रेत्यांची मागणी आहे. पण वाढत्या रुग्ण संख्येमुळे मनपा प्रशासनाने मनाई केली आहे. सध्या कळमना भाजी बाजार आणि कॉटन मार्केट बाजारात भाज्यांची आवक पूर्वीपेक्षा दुपटीवर गेली आहे. दोन्ही बाजार सकाळी ९ पर्यंत सुरू राहात असल्याने विक्री कमी झाली आहे. याशिवाय कोरोना रुग्णांचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याने दोन्ही बाजारात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. याच कारणांनी गेल्यावर्षी दोन्ही बाजार मनपा आयुक्तांनी बंद करून मैदानात बाजार सुरू केले होते. हीच स्थिती सध्या उद्भवली असून रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास दोन्ही बाजार बंद होतील, अशी भीती ठोक भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली.

आठवडी बाजार बंद असल्यामुळे फूलकोबी, पत्ता कोबी, पालक, मेथी, टोमॅटो आदींचे भाव उतरले आहेत. फूलकोबी व पत्ता कोबी १० रुपये, पालक ५ रुपये, मेथी १० रुपये, टोमॅटो ५ ते १० रुपये, कोथिंबीर १० रुपये, हिरवी मिरची १० रुपये किलो भाव आहेत. याशिवाय कळमना बाजारातही कांदे, बटाटे आणि लसणाचे भाव कमी झाले आहेत. विक्रीत घसरण झाल्याने दररोज ३० ते ४० टक्के माल पडून राहत आहे. मात्र, दररोज आवक तेवढीच आहे. त्यामुळे माल कुठे साठवून ठेवायचा, असा प्रश्न ठोक विक्रेते आणि अडतिया यांच्यासमोर उभा राहिला आहे. कळमना बाजारात पांढरे कांदे १० ते १२ रुपये किलो, लाल कांदे १२ ते १३ रुपये, बटाटे ९ ते ११ रुपये आणि लसूण ६० ते ७० रुपये किलो भाव आहेत. भाव कमी असले तरीही किरकोळमध्ये दुपटीत विकल्या जात आहेत.