शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

शेतकऱ्यांनाे, पिकांची काळजी घ्या, ५ दिवस ढगाळ; शेतातील पिकांवर फवारणी टाळा

By निशांत वानखेडे | Updated: December 5, 2023 16:46 IST

मंगळवारी सकाळपासून आकाश पूर्णपणे ढगांनी व्यापले असून वातावरणात गारवा वाढला आहे.

नागपूर : भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार पुढील पाच दिवस म्हणजे ५ ते ९ डिसेंबरदरम्यान आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील दाेन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणीला आलेला माल सुरक्षित ठेवण्याचे व शेतातील पिकांवर फवारणी टाळण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

मंगळवारी सकाळपासून आकाश पूर्णपणे ढगांनी व्यापले असून वातावरणात गारवा वाढला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ६ व ७ डिसेंबरला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. त्यानंतर दाेन दिवस वातावरण काेरडे राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता आंतरमशागतीची कामे, कृषी रसायनांच्या फवारणीची कामे, तसेच उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे २-३ दिवस पुढे ढकलावी, असा सल्ला कृषी विभागाने जारी केला आहे. परिपक्व अवस्थेतील धान पिकाची कापणी व मळणी करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. मळणीची कामे शक्य नसल्यास आणि परिपक्व अवस्थेतील कापणी केलेले धान पिक शेतात पसरून ठेवले असल्यास शेतामध्ये उंचवटा असलेल्या ठिकाणी गोळा करून कापणी केलेला शेतमाल प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा.

स्थानिक स्वच्छ हवामान परिस्थीतीचा अंदाज घेऊन कापूस वेचणी सुरु ठेवावी. वेचणी तसेच वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. वेचणी केलेला कापूस कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. गहू, मोहरी, जवस, फळबागा तसेच भाजीपाला पिकामध्ये ओलित करणे २ ते ३ दिवस पुढे ढकलावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता, कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदीदार व इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारा विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्या जागेवर व न ठेवता शेड मध्येच साठवावा, अशी सुचनाही विभागाने दिली आहे.

किडीचा प्रादुर्भाव वाढला

दरम्यान गेल्या दाेन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या रबी हंगामातील गहु, हरभरा, तुर, मोहरी, जवस, फळबागा शेतात आहेत. या पिकांवर किडीचा हल्ला हाेत असल्याने शेतकऱ्यांसमाेर संकट आहे.

टॅग्स :nagpurनागपूरFarmerशेतकरी