शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनाे, पिकांची काळजी घ्या, ५ दिवस ढगाळ; शेतातील पिकांवर फवारणी टाळा

By निशांत वानखेडे | Updated: December 5, 2023 16:46 IST

मंगळवारी सकाळपासून आकाश पूर्णपणे ढगांनी व्यापले असून वातावरणात गारवा वाढला आहे.

नागपूर : भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार पुढील पाच दिवस म्हणजे ५ ते ९ डिसेंबरदरम्यान आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील दाेन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणीला आलेला माल सुरक्षित ठेवण्याचे व शेतातील पिकांवर फवारणी टाळण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

मंगळवारी सकाळपासून आकाश पूर्णपणे ढगांनी व्यापले असून वातावरणात गारवा वाढला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ६ व ७ डिसेंबरला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. त्यानंतर दाेन दिवस वातावरण काेरडे राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता आंतरमशागतीची कामे, कृषी रसायनांच्या फवारणीची कामे, तसेच उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे २-३ दिवस पुढे ढकलावी, असा सल्ला कृषी विभागाने जारी केला आहे. परिपक्व अवस्थेतील धान पिकाची कापणी व मळणी करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. मळणीची कामे शक्य नसल्यास आणि परिपक्व अवस्थेतील कापणी केलेले धान पिक शेतात पसरून ठेवले असल्यास शेतामध्ये उंचवटा असलेल्या ठिकाणी गोळा करून कापणी केलेला शेतमाल प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा.

स्थानिक स्वच्छ हवामान परिस्थीतीचा अंदाज घेऊन कापूस वेचणी सुरु ठेवावी. वेचणी तसेच वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. वेचणी केलेला कापूस कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. गहू, मोहरी, जवस, फळबागा तसेच भाजीपाला पिकामध्ये ओलित करणे २ ते ३ दिवस पुढे ढकलावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता, कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदीदार व इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारा विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्या जागेवर व न ठेवता शेड मध्येच साठवावा, अशी सुचनाही विभागाने दिली आहे.

किडीचा प्रादुर्भाव वाढला

दरम्यान गेल्या दाेन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या रबी हंगामातील गहु, हरभरा, तुर, मोहरी, जवस, फळबागा शेतात आहेत. या पिकांवर किडीचा हल्ला हाेत असल्याने शेतकऱ्यांसमाेर संकट आहे.

टॅग्स :nagpurनागपूरFarmerशेतकरी