शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

शेतकऱ्यांनाे, पिकांची काळजी घ्या, ५ दिवस ढगाळ; शेतातील पिकांवर फवारणी टाळा

By निशांत वानखेडे | Updated: December 5, 2023 16:46 IST

मंगळवारी सकाळपासून आकाश पूर्णपणे ढगांनी व्यापले असून वातावरणात गारवा वाढला आहे.

नागपूर : भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार पुढील पाच दिवस म्हणजे ५ ते ९ डिसेंबरदरम्यान आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील दाेन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणीला आलेला माल सुरक्षित ठेवण्याचे व शेतातील पिकांवर फवारणी टाळण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

मंगळवारी सकाळपासून आकाश पूर्णपणे ढगांनी व्यापले असून वातावरणात गारवा वाढला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ६ व ७ डिसेंबरला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. त्यानंतर दाेन दिवस वातावरण काेरडे राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता आंतरमशागतीची कामे, कृषी रसायनांच्या फवारणीची कामे, तसेच उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे २-३ दिवस पुढे ढकलावी, असा सल्ला कृषी विभागाने जारी केला आहे. परिपक्व अवस्थेतील धान पिकाची कापणी व मळणी करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. मळणीची कामे शक्य नसल्यास आणि परिपक्व अवस्थेतील कापणी केलेले धान पिक शेतात पसरून ठेवले असल्यास शेतामध्ये उंचवटा असलेल्या ठिकाणी गोळा करून कापणी केलेला शेतमाल प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा.

स्थानिक स्वच्छ हवामान परिस्थीतीचा अंदाज घेऊन कापूस वेचणी सुरु ठेवावी. वेचणी तसेच वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. वेचणी केलेला कापूस कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. गहू, मोहरी, जवस, फळबागा तसेच भाजीपाला पिकामध्ये ओलित करणे २ ते ३ दिवस पुढे ढकलावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता, कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदीदार व इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारा विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्या जागेवर व न ठेवता शेड मध्येच साठवावा, अशी सुचनाही विभागाने दिली आहे.

किडीचा प्रादुर्भाव वाढला

दरम्यान गेल्या दाेन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या रबी हंगामातील गहु, हरभरा, तुर, मोहरी, जवस, फळबागा शेतात आहेत. या पिकांवर किडीचा हल्ला हाेत असल्याने शेतकऱ्यांसमाेर संकट आहे.

टॅग्स :nagpurनागपूरFarmerशेतकरी