शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंतांवर पदकांचा वर्षाव

By admin | Updated: September 26, 2014 01:17 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १००वा दीक्षांत समारंभ २६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीत गुणवंत

शैक्षणिक-औद्योगिक विकास सोबत व्हावा : प्रियंका बेरत्रमनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १००वा दीक्षांत समारंभ २६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यात १७ पदके प्राप्त करणारी प्रियंका बेरत्रम व १५ पदके प्राप्त करणारी खुशबू दिलीप छाजेड यांचा समावेश आहे. अभ्यासातील सातत्य आणि कठोर परिश्रमातून हे यश मिळविल्याचे मत दोघींनीही व्यक्त केले आहे.शुक्रवारचा दिवस प्रियंका विक्टर बेरत्रम हिच्यासाठी अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०० व्या दीक्षांत समारंभात तिला १७ पदके व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. एसएफएस महाविद्यालयातून बी.एसस्सी.चे शिक्षण पूर्ण करणारी प्रियंका गणितामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ‘लोकमत’सोबत बोलताना प्रियंकाने विद्यापीठाच्या शैक्षणिक स्तराबाबत आपले मत व्यक्त केले व एकूणच प्रणालीमध्ये तत्काळ सुधारणेची आवश्यकता का आहे याचादेखील खुलासा केला.विद्यापीठातील विद्यार्थी देशातील उत्कृष्ट विद्यापीठांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर क्षमता आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत अडचण आहे. शिक्षणाच्या स्तराचा ज्यावेळी मुद्दा येतो, तेव्हा आजदेखील विद्यार्थी योग्य प्रणाली, अनुभवी शिक्षक व इतर आवश्यक सुविधांच्या कमतरतेचा सामना करत असल्याचे दिसून येते. जर अनुकूल शैक्षणिक वातावरण मिळाले तरच विद्यार्थी आपल्या क्षमतांचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करू शकतात, असे मत प्रियंकाने व्यक्त केले.इतक्या साऱ्या अडचणींचा सामना करीत प्रियंकाने यश कसे मिळविले, असा प्रश्न विचारला असता एकाग्रता व दृढनिश्चयामुळे मार्ग सोपा होता असे अतिशय साधेपणाने तिने उत्तर दिले. परीक्षांसाठी तयारी करत असताना प्रियंकाने स्वत:चा वेगळा मार्ग निवडला होता. ंपाठ्यपुस्तकातील माहितीपासून मी कधीच संतुष्ट होत नव्हती. जास्तीत जास्त पुस्तकांची मदत घेऊन आणखी सखोल उत्तर शोधते. उत्तर देताना सुस्पष्ट विचार आणि योग्य प्रकारे खुलासा करण्याचा प्रयत्न असायला हवा. ज्या नोट्सवर माझे सहपाठी निर्भर रहायचे, मी कधीच त्यांचा आधार घेतला नाही असे प्रियंका हिने सांगितले. नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधीबाबत प्रश्न केला असता तिने परखडपणे आपले मत व्यक्त केले. विद्यार्थी याबाबत अनेकदा अंधारात राहतात. त्यामुळे ते एक तर बेरोजगार राहतात किंवा अत्यंत तुटपुंज्या वेतनावर काम करण्यास तयार होतात. मिहानसारख्या प्रकल्पांमुळे आपल्या क्षेत्रात वेगाने विकास होण्याची शक्यता आहे. औद्योगिक व शैक्षणिक विकास सोबत सोबत व्हायला हवा, अशी अपेक्षा प्रियंकाने व्यक्त केली. आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रियंकाला ‘नेट-सेट’ परीक्षा देऊन प्राध्यापक व्हायचे आहे. माझे असे ठाम मत आहे की प्रत्येकाला नेहमी काही ना काही नवीन करत रहायला हवे. नेहमी नवनवीन माहिती मिळविण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळे मी पदव्युत्तर शिक्षणानंतर संशोधनदेखील करू शकते, असे प्रियंका हिने सांगितले.कष्टातून मिळाला यशाचा मार्ग : खुशबू छाजेडमाजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मान होणार असल्याने विधी अभ्यासक्रमातील यशाबद्दल १५ पदके व पुरस्कार मिळविणारी खुशबू दिलीप छाजेड प्रचंड उत्साहात आहे. विशेषत: हा सन्मान विद्यापीठाच्या ऐतिहासिक १०० व्या दीक्षांत समारंभात मिळणार असल्यामुळे तर दुग्धशर्करा योगच आला आहे. प्रचंड मेहनत व दिवसरात्र केलेल्या अभ्यासातून तिने हा सन्मान प्राप्त केला आहे. विधीच्या ५ वर्षीय अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयात तिला पदक मिळणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाला समान वागणूक व न्याय मिळाला पाहिजे, या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन खुशबूने सिव्हील सर्व्हिसेस ऐवजी कायद्याच्या अभ्यासाला प्राधान्य दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापासून प्रेरणा घेऊन हा निर्णय घेतला असल्याचे खुशबू हिने सांगितले. कायद्याचा अभ्यास करताना दिवसरात्र मेहनत केली. अगदी ‘सोशल लाईफ’चादेखील त्याग केला. महाविद्यालयात १०० टक्के उपस्थिती होती. अनेकदा तर वर्गात केवळ तिच उपस्थित असायची. तरीदेखील शिक्षक तिला शिकवायचे. तिच्या शिक्षिका आरती कलावत यांनी नेहमीच तिला प्रोत्साहन दिले व या यशात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे खुशबू सांगते. २०१२ मध्ये जी.एच.रायसोनी लॉ स्कूल येथून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर अभ्यासासाठी खुशबू युनायटेड किंगडम येथील मॅन्चेस्टर येथे गेली. तेथे तिने ‘एमएलएम’ची (इंटरनॅशनल बिझनेस अ‍ॅन्ड कमर्शिअल लॉ) पदवी मिळवली. या विद्यापीठाला तेथील सर्वात मोठे विद्यापीठ मानण्यात येते. विशेष म्हणजे तेथेदेखील तिने गुणवत्ता यादीत स्थान मिळवत उपराजधानीचे नाव मोठे केले आहे. जगातील निरनिराळ्या देशांतील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करताना खुशबू हिने ‘एमएलएम’दरम्यान प्रभावी संशोधन करुन ‘इंटरनॅशनल बेस्ट रिसर्चर’चा पुरस्कारदेखील मिळविला. ‘लोकमत’सोबत बोलताना खुशबूने आपल्या भावना व्यक्त केल्या. खुशबूला गायन व पाककलेत रुची आहे. प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड व सोनाली राठोड यांच्याकडून तिने गायनकलेचे धडे घेतले आहेत. बँकॉक व अन्य ठिकाणी तिने गायन सादर केले आहे. राठोड यांचे संगीत प्रेरणा देते. मला लिहिण्याचीदेखील आवड आहे असे खुशबूने सांगितले. ‘लोकमत टाइम्स’सोबत ‘फ्री लान्स पत्रकार’ म्हणूनदेखील ती काही काळ जुळली होती. भविष्यात मला एक यशस्वी ‘सॉलिसिटर’ होऊन कॉर्पोरेट जगताचा हिस्सा व्हायचे आहे. सध्या खुशबू मुंबईतील एका प्रतिष्ठित कायदा संस्थेसोबत काम करते आहे. यशाचे श्रेय तिने पालक, नातेवाईक, मित्र, रायसोनी महाविद्यालयातील शिक्षक, प्राचार्य व चेअरमन यांना दिले आहे. (प्रतिनिधी)