हम लड़ेंगे और जीतेंगे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:40 AM2017-11-20T01:40:12+5:302017-11-20T01:40:23+5:30

देश एकसंघ राहिला पाहिजे यासाठी इंदिरा गांधी यांनी बलिदान दिले. त्या प्रभावशाली पंतप्रधान होत्या. भारत शक्तिशाली देश असल्याचा त्यांनी जगाला संदेश दिला.

We will fight and win ... | हम लड़ेंगे और जीतेंगे...

हम लड़ेंगे और जीतेंगे...

Next
ठळक मुद्देअशोक चव्हाण यांचा निर्धार : इंदिरा गांधी जन्मशताब्दी सांगता सोहळा

ऑनलाईन लोकमत 
नागपूर : देश एकसंघ राहिला पाहिजे यासाठी इंदिरा गांधी यांनी बलिदान दिले. त्या प्रभावशाली पंतप्रधान होत्या. भारत शक्तिशाली देश असल्याचा त्यांनी जगाला संदेश दिला. परंतु गेल्या तीन वर्षात देशातील लोकशाहीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाला एकसंघ ठेवण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. १९७७ च्या पराभवानंतर इंदिरा गांधी यांनी नागपुरात ‘हम हारे तो क्या हुआ, फिर जितेंगे’ असा विश्वास व्यक्त केला होता. याच नागपुरात ‘हम लड़ेंगे और जीतेंगे’ असा निर्धार करून पुढील निवडणुकीत सरकारला खाली खेचा, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी केले.
नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्यावतीने सिव्हील लाईन येथील चिटणवीस सेंटरच्या मैदानावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्मशताब्दी सांगता सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी स्वातंत्र्य सेनानी लीलाताई चितळे, काँग्रेसचे विधानसभेचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, माजी मंत्री वसंत पुरके, राजेंद्र मुळक, माजी खासदार भीमराराज भाटी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी यांच्यासारख्या नेत्यांनी हा देश घडविला. परंतु शासनकर्ते सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून इतिहासात बदल करून या नेत्यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुस्तकातून पुसाल परंतु लोकांच्या मनातून या नेत्यांना पुसता येणार नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामुळे भाजपा हादरला आहे. गुजरात निवडणुकीत सोनिया गांंधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस शंभर टक्के निवडून येईल. या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये तळ ठोकून असल्याची टीका चव्हाण यांनी केली.
देशात परिवर्तनाचे वारे सुरू झाले आहे. नांदेड, भिवंडी, मालेगाव, गुरुदासपूर व चित्रकूट येथील निकाल याचे द्योतक आहे. व्यापारीही आता‘कमल का फूल एकही भूल’ असे म्हणत आहे. इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा दिला होता. परंतु भाजपा सरकार गरिबाला हटविण्याचा प्रयत्न करीत आहे. इंदिराजींना कठीण काळात
‘लोकमत’चे जाहीर आभार
इंदिरा गांधी एकविसाव्या शतकातील वादळी व्यक्तिमत्त्व होते. या पोलादी महिलेच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ‘लोकमत’ने त्यांच्या जीवनावर आधारित विशेषांक काढला. या माध्यमातून नवीन पिढीला त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली. या उपक्रमाचे कौतुक करून अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणातून लोकमतचे जाहीर आभार मानले.

Web Title: We will fight and win ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.