शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही चपलाही उचलायला तयार होतो पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 21:00 IST

नाट्यसंमेलनात आम्ही चपलाही उचलायला तयार होतो, पण तो अधिकारही आम्हाला दिला नाही, अशी ओरड नाट्य परिषदेच्या महानगर शाखेकडून होत आहे. संमेलनाच्या आयोजनात महानगर शाखेला डावलल्या जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मानसन्मानावरून नाट्यसंमेलनाच्या आयोजनात वादाची ठिणगी पडली आहे.

ठळक मुद्देमानसन्मानावरून नाट्यसंमेलनात वादाची ठिणगी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाट्यसंमेलनात आम्ही चपलाही उचलायला तयार होतो, पण तो अधिकारही आम्हाला दिला नाही, अशी ओरड नाट्य परिषदेच्या महानगर शाखेकडून होत आहे. संमेलनाच्या आयोजनात महानगर शाखेला डावलल्या जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मानसन्मानावरून नाट्यसंमेलनाच्या आयोजनात वादाची ठिणगी पडली आहे.नागपुरात अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या दोन शाखा आहेत. एका नाट्य परिषदेची नागपूर शाखा आणि दुसरी महानगर शाखा. नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेने संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी दोन्ही शाखेला दिली. संमेलनाच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी नागपूर शाखेला दिली आणि संमेलनाच्या विविध आयोजनात महानगर शाखेला समावून घेण्यात येणार होते. पण संमेलनाच्या आयोजनासंदर्भात गेल्या काही दिवसात झालेल्या बैठकांमध्ये महानगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही. संमेलनाच्या आयोजनासाठी ज्या काही २०-२२ समित्या तयार करण्यात आल्या, त्या समितीच्या अध्यक्षपदाची, निर्णय घेण्याची जबाबदारी महानगर शाखेला दिली नाही. त्यामुळे महानगर शाखेने नाराजी व्यक्त करीत संमेलन आयोजकाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. संमेलनावर बहिष्कार न घालता, आयोजनात सहभागी होणार नाही, अशी भूमिका महानगर शाखेने घेतली आहे.आयोजकांच्या कारभाराला विरोधआतापर्यंतच्या इतिहासात जिथे संमेलन झाले, तिथे जर दोन शाखा असतील तर दोघांनी मिळून संमेलन पार पाडले. पण ९९ व्या नाट्यसंमेलनाच्या आयोजनात आमच्या शाखेला डावलले जात आहे. यासंदर्भात मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रसाद कामडी यांच्याकडे तक्रार केली. तेव्हा कामडी यांनी गिरीश गांधी यांच्यासमोर सन्मानजनक वागणूक देऊ, हवी ती समिती देऊ असा शब्द दिला होता. पुढे संयोजन समितीत माझे नाव टाकले. पण एकाही बैठकीला बोलावले नाही. जेव्हा समित्या ठरविण्याची बैठक झाली तेव्हा नागपूर शाखेने १५ समित्या पूर्वीच ठरवून टाकल्या होत्या. समित्या ठरविताना आम्हाला सन्मानजनक वागणूक दिली गेली नाही. समितीचे अध्यक्ष म्हणून निर्णय घेण्याचे अधिकार दिले नाही. त्यामुळे संमेलनाची जबाबदारी पार पाडणाऱ्या मध्यवर्ती व नागपूर शाखा ज्या पद्धतीने कारभार करीत आहे, त्याला आमचा विरोध आहे. संमेलनादरम्यान घटनात्मक मार्गाने त्याचा आम्ही विरोध करू.सलीम शेख, अध्यक्ष , महानगर शाखा महानगर शाखेच्या ज्या काही तक्रारी होत्या, त्यांनी माझ्याकडे मांडायला हव्या होत्या. पण त्यांच्याकडून कुठल्याच तक्रारी माझ्यापर्यंत आल्या नाही. ऐन संमेलनाच्या तोंडावर तक्रारी पुढे करून, संमेलन वादातीत आणणे योग्य नाही. बऱ्याच वर्षानंतर नागपुरात संमेलन होत आहे, ते चांगले पार पडावे हा माझा हेतू आहे.प्रसाद कामडी, अध्यक्ष, मध्यवर्ती शाखा.

 

टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी