शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आम्ही चपलाही उचलायला तयार होतो पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 21:00 IST

नाट्यसंमेलनात आम्ही चपलाही उचलायला तयार होतो, पण तो अधिकारही आम्हाला दिला नाही, अशी ओरड नाट्य परिषदेच्या महानगर शाखेकडून होत आहे. संमेलनाच्या आयोजनात महानगर शाखेला डावलल्या जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मानसन्मानावरून नाट्यसंमेलनाच्या आयोजनात वादाची ठिणगी पडली आहे.

ठळक मुद्देमानसन्मानावरून नाट्यसंमेलनात वादाची ठिणगी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाट्यसंमेलनात आम्ही चपलाही उचलायला तयार होतो, पण तो अधिकारही आम्हाला दिला नाही, अशी ओरड नाट्य परिषदेच्या महानगर शाखेकडून होत आहे. संमेलनाच्या आयोजनात महानगर शाखेला डावलल्या जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मानसन्मानावरून नाट्यसंमेलनाच्या आयोजनात वादाची ठिणगी पडली आहे.नागपुरात अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या दोन शाखा आहेत. एका नाट्य परिषदेची नागपूर शाखा आणि दुसरी महानगर शाखा. नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेने संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी दोन्ही शाखेला दिली. संमेलनाच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी नागपूर शाखेला दिली आणि संमेलनाच्या विविध आयोजनात महानगर शाखेला समावून घेण्यात येणार होते. पण संमेलनाच्या आयोजनासंदर्भात गेल्या काही दिवसात झालेल्या बैठकांमध्ये महानगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही. संमेलनाच्या आयोजनासाठी ज्या काही २०-२२ समित्या तयार करण्यात आल्या, त्या समितीच्या अध्यक्षपदाची, निर्णय घेण्याची जबाबदारी महानगर शाखेला दिली नाही. त्यामुळे महानगर शाखेने नाराजी व्यक्त करीत संमेलन आयोजकाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. संमेलनावर बहिष्कार न घालता, आयोजनात सहभागी होणार नाही, अशी भूमिका महानगर शाखेने घेतली आहे.आयोजकांच्या कारभाराला विरोधआतापर्यंतच्या इतिहासात जिथे संमेलन झाले, तिथे जर दोन शाखा असतील तर दोघांनी मिळून संमेलन पार पाडले. पण ९९ व्या नाट्यसंमेलनाच्या आयोजनात आमच्या शाखेला डावलले जात आहे. यासंदर्भात मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रसाद कामडी यांच्याकडे तक्रार केली. तेव्हा कामडी यांनी गिरीश गांधी यांच्यासमोर सन्मानजनक वागणूक देऊ, हवी ती समिती देऊ असा शब्द दिला होता. पुढे संयोजन समितीत माझे नाव टाकले. पण एकाही बैठकीला बोलावले नाही. जेव्हा समित्या ठरविण्याची बैठक झाली तेव्हा नागपूर शाखेने १५ समित्या पूर्वीच ठरवून टाकल्या होत्या. समित्या ठरविताना आम्हाला सन्मानजनक वागणूक दिली गेली नाही. समितीचे अध्यक्ष म्हणून निर्णय घेण्याचे अधिकार दिले नाही. त्यामुळे संमेलनाची जबाबदारी पार पाडणाऱ्या मध्यवर्ती व नागपूर शाखा ज्या पद्धतीने कारभार करीत आहे, त्याला आमचा विरोध आहे. संमेलनादरम्यान घटनात्मक मार्गाने त्याचा आम्ही विरोध करू.सलीम शेख, अध्यक्ष , महानगर शाखा महानगर शाखेच्या ज्या काही तक्रारी होत्या, त्यांनी माझ्याकडे मांडायला हव्या होत्या. पण त्यांच्याकडून कुठल्याच तक्रारी माझ्यापर्यंत आल्या नाही. ऐन संमेलनाच्या तोंडावर तक्रारी पुढे करून, संमेलन वादातीत आणणे योग्य नाही. बऱ्याच वर्षानंतर नागपुरात संमेलन होत आहे, ते चांगले पार पडावे हा माझा हेतू आहे.प्रसाद कामडी, अध्यक्ष, मध्यवर्ती शाखा.

 

टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी