शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही नक्षलवादी हाेऊ इच्छित नाही पण अस्तित्व मान्य करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2023 08:00 IST

Nagpur News सरकारने १५ काेटी जनतेच्या अस्तित्वाला किमान ओळख तरी द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय विमुक्त भटक्या जमातीचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांनी केली आहे.

ठळक मुद्देभटक्या विमुक्तांना ओळख नाही, कशाचा अमृत महाेत्सव?

निशांत वानखेडे

नागपूर : एखाद्याचा पाय पडला तर मुंगीही चावा घेण्यास मागेपुढे पाहत नाही. राज्यकर्ते आणि सरकारी यंत्रणांच्या अनास्थेमुळे चावा घेण्याच्या वृत्तीचा उगम व्हावा, अशी अवस्था भटक्या विमुक्तांची झाली आहे. मात्र, आम्ही नक्षलवादी हाेऊ इच्छित नाही, कारण डाॅ. आंबेडकर यांच्या प्रेरणेतून लाेकशाहीवर प्रेम आणि राज्यघटनेचा प्रभाव आमच्यावर आहे. मात्र, सरकारने १५ काेटी जनतेच्या अस्तित्वाला किमान ओळख तरी द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय विमुक्त भटक्या जमातीचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांनी केली आहे.

२००६ साली तत्कालीन सरकारने रेणके यांच्या अध्यक्षतेत राष्ट्रीय विमुक्त भटक्या जमाती आयाेगाची स्थापना केली हाेती. देशातील भटक्या विमुक्तांच्या जवळपास १,६०० जाती-जमातींचा अभ्यास करून २००८ला आयाेगाने अहवाल सादर केला हाेता. या अहवालाला तात्विक मान्यता मिळाली पण कृतीच्या पातळीवर लागू झाला नाही. सरकारने अहवालाची सूत्रबद्ध मांडणी करण्यासाठी स्थापन केलेल्या अभ्यास समितीनेही अहवालातील वास्तव मान्य केले हाेते. मात्र, कितीही आयाेग नेमले, याेजना आणल्या व निधीची तरतूद केली तरी त्याचा लाभ भटक्यांना हाेणार नाही. कारण मूळ प्रश्न अनुत्तरीत आहे, असे मत बाळकृष्ण रेणके यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना व्यक्त केले.

शेकडाे जाती-जमाती अदृश्यात

महाराष्ट्रात भटक्या विमुक्तांच्या ५० च्यावर जाती व जवळपास ३०० पाेटजाती आहेत. देशामध्ये १,६००च्यावर जाती-जमाती असून, १५ काेटींच्या आसपास लाेकसंख्या आहे. या काळात २२७ नवीन जमाती शाेधल्या आहेत, ज्यांची सरकार दरबारी कधी नाेंदच झाली नाही. हीच मूळ समस्या आहे. जंगला, पहाडाट, शहराबाहेर, गावाबाहेर पाल टाकून राहणाऱ्या या माणसांजवळ नागरिक म्हणून आवश्यक असलेले मतदान कार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड असे काेणतेच ओळखपत्र नाही. मग या जमातींना सवलती व सरकारी याेजनांचा लाभ कसा मिळेल?

हे यंत्रणेचेच पाप

भटक्या विमुक्तांच्या अनेक जाती एससी, एसटी व ओबीसीमध्ये आहेत. काही कुठेच नाहीत. मात्र, कुठल्याच प्रवर्गातील सवलतींचा लाभ या जमाती घेऊ शकत नाहीत. किंबहुना त्यांना लाभ घेऊ दिला जात नाही. भटक्यांना विकासाच्या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणाच काम करते, अशी टीका रेणके यांनी केली. जे करायला हवे त्याकडे दुर्लक्ष करून कागदाेपत्री घाेडे नाचविले जात आहेत.

सरकारचे काम केवळ शाे-बाजी

सरकारने आता विमुक्त भटके कल्याण मंडळाची स्थापना केली व त्यात ४० काेटींची तरतूद केली. फेब्रुवारी २०२२मध्ये सरकारने ‘सीड’ याेजना आणून २०० काेटींची तरतूद केली. या याेजनेला वर्ष झाले असून, आस्थापना वगळता समाजासाठी एक काेटीही खर्च झाला नाही. नागरिकांना ओळखपत्रच नाही तर कसा लाभ मिळणार? राहायला घर आणि पाेटात अन्न नसलेल्या तळातील बांधवांना काेणताही लाभ मिळणार नसेल तर स्वातंत्र्याचा अमृत महाेत्सव कसा साजरा करता? ते मूलनिवासी आहेत पण अस्तित्वहिन आहेत. त्यांना आधी कागदपत्र देणे जरूरीचे आहे, अशी भावना बाळकृष्ण रेणके यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Socialसामाजिक